शहरं
Join us  
Trending Stories
1
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
2
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
3
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
4
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
5
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
6
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
7
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
8
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
9
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
10
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
11
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
12
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
13
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
14
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
15
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
16
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
17
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
18
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
19
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
20
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीचा मार्ग मोकळा, प्रभाग रचना अधिकाराला आक्षेप घेणारी याचिका निकाली

By समीर देशपांडे | Updated: September 30, 2025 17:38 IST

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या प्रभाग रचनेच्या अधिकाराला आक्षेप घेणाऱ्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने मंगळवारी निकाली काढल्या. ...

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या प्रभाग रचनेच्या अधिकाराला आक्षेप घेणाऱ्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्याकोल्हापूर सर्किट बेंचने मंगळवारी निकाली काढल्या. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जाते. या निवडणुका विशिष्ट मुदतीत घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्याने या प्रक्रियेत आता हस्तक्षेप करता येणार नाही. आवश्यकता वाटल्यास निवडणुकीनंतर स्वतंत्र याचिका दाखल करता येईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.प्रभाग रचनेबाबत गेले दोन महिने सुनावण्या सुरू होत्या. सुरुवातीला मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावण्या गेल्या महिनाभरापासून कोल्हापूर सर्किट बेंचसमोर सुरू होत्या. १८ सप्टेंबरला शेवटची सुनावणी झाली. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल, करवीर आणि आजरा तालुक्यातील प्रभाग रचनेबद्दल याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या तीनही याचिकांचे कामकाज एकत्रच सुरू होते. यातील एका याचिकेमध्ये प्रभाग रचनेच्या अधिकारालाच आक्षेप घेण्यात आला होता. राज्य निवडणूक आयोगाने जरी प्रभाग रचनेचे अधिकार महाराष्ट्र शासनाला दिलेले असले तरीही जो अधिकारी ही रचना अंतिम करतो तोच त्यावरील आक्षेपांवर निर्णय कसा घेऊ शकतो, असा मुद्दा याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी उपस्थित केला होता.या संपूर्ण प्रक्रियेमध्ये याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. श्रीकृष्ण गणबावले व ॲड. ऋतुराज पवार, राज्य शासनाच्या वतीने ॲड. अनिल साखरे, राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने ॲड. अतुल दामले व ॲड. सचिंद्र शेट्ये यांनी न्यायमूर्ती मकरंद कर्णिक व न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या डिव्हिजनल बेंचसमोर झालेल्या सुनावणीत सातत्याने युक्तिवाद केला.याचिकाकर्त्यांच्या वतीने मुळात प्रभाग रचनेचा अधिकार राज्य शासनाला नाही. हे काम निवडणूक आयोगाचे आहे. परंतु शासनाने ही प्रक्रिया केल्याने यामध्ये राजकीय हस्तक्षेपाची भीती व्यक्त केली होती. यावर राज्य शासनाच्या वतीने युक्तिवाद करताना असे सांगण्यात आले होते की, निवडणूक आयोगाने दिलेल्या अधिकारानुसारच ही प्रक्रिया राज्य शासनाने राबविली आहे. तर निवडणूक आयोगाकडे आवश्यक मनुष्यबळ आणि यंत्रणा नसल्याने अधिसूचनेच्या माध्यमातून हे अधिकार राज्य शासनाला दिल्याचे आयोगाच्या वकिलांनी याआधी स्पष्ट केले होते.

पंधरा दिवसांत आरक्षण प्रक्रियेची शक्यतायाआधीच छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर खंडपीठांनी याबाबतच्या याचिका निकाली काढल्या आहेत. केवळ कोल्हापूरच्या याचिकेचे कामकाज सुरू होते. ही याचिकाही निकाली निघाल्याने आता येत्या १५ दिवसांत आरक्षण प्रक्रिया होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. प्रशासनाच्या पातळीवर याबाबत तयारी पूर्ण झाल्याचे सांगण्यात येते.

चूक की बरोबर नंतर ठरवता येईलसर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश पाहता वेळेअभावी याचिकेमध्ये मांडलेल्या मुद्द्यांवर आता निर्णय देता येणार नाही. परंतु निवडणुकीनंतर त्यावर विचार होऊ शकतो. राज्य निवडणूक आयोगाची निर्भय वातावरणात निवडणूक घेण्यासाठी आणि त्यासाठीचे त्यांनी हस्तांतरित केलेले अधिकार हे चूक की बरोबर हे नंतर ठरवता येईल.

आजरा, कागल, करवीरच्या तीनही याचिका निकालीआजरा तालुक्यातील एक गट रद्द होणे, कागल तालुक्यातील मतदारसंघाच्या नावात बदल आणि करवीर तालुक्यातील प्रभाग रचना याबाबत आक्षेप घेणाऱ्या तीन याचिकांवर हे काम चालले. परंतु या तीनही याचिका निकाली काढण्यात आल्या आहेत.