शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

कोल्हापूर : व्यवस्थापन परिषदेवरील अधिसभा सदस्यांच्या निवडी बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 19:25 IST

नवीन विद्यापीठ कायद्यानुसार निवडणूक झाल्यानंतर शिवाजी विद्यापीठ अधिसभेची (सिनेट) विशेष बैठक सोमवारी पार पडली. यामध्ये व्यवस्थापन परिषद, विद्या परिषदेसह विविध समितींसाठी निवडणूक झाली. यातील तक्रार निवारण समिती वगळता अन्य निवडणुका बिनविरोध पार पडल्या. या निवडणुकांमध्ये विद्यापीठ विकास आघाडीचे वर्चस्व राहिले.

ठळक मुद्देव्यवस्थापन परिषदेवरील अधिसभा सदस्यांच्या निवडी बिनविरोधअधिसभेची विशेष बैठक‘तक्रार निवारण’च्या निवडणुकीत निखिल गायकवाड यांची बाजी

कोल्हापूर : नवीन विद्यापीठ कायद्यानुसार निवडणूक झाल्यानंतर शिवाजी विद्यापीठ अधिसभेची (सिनेट) विशेष बैठक सोमवारी पार पडली. यामध्ये व्यवस्थापन परिषद, विद्या परिषदेसह विविध समितींसाठी निवडणूक झाली. यातील तक्रार निवारण समिती वगळता अन्य निवडणुका बिनविरोध पार पडल्या. या निवडणुकांमध्ये विद्यापीठ विकास आघाडीचे वर्चस्व राहिले.विद्यापीठातील राजर्षी शाहू सभागृहात कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली अधिसभेची बैठक झाली. सचिवपदी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, तर प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के उपस्थित होते. यात प्रारंभी कुलगुरू डॉ. शिंदे यांनी विद्यापीठाच्या कामगिरीचा आणि अन्य उपक्रमांचा आढावा सादर केला.

यानंतर कुलसचिव डॉ. नांदवडेकर यांनी अधिसभेच्या बैठकीचे कामकाज सुरू केले. यात सुरुवातीला विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेवर अधिसभा सदस्यांची निवडणूक झाली.

यात विकास आघाडीच्या धनाजी कणसे, चंद्रशेखर कारंडे (प्राचार्य गट), निखिल गायकवाड (शिक्षक), धैर्यशील पाटील, राजूबाबा आवळे (व्यवस्थापन प्रतिनिधी) आणि संजय जाधव, लोभाजी भिसे (नोंदणीकृत पदवीधर) यांची, तर विद्यापीठ शिक्षक संघाचे (सुटा) प्रकाश कुंभार (शिक्षक) यांची बिनविरोध निवड झाली.

विद्या परिषदेवर प्रताप माने (व्यवस्थापन प्रतिनिधी) यांची, विद्यापीठ संलग्न महाविद्यालये व मान्यताप्राप्त संस्था तपासणीसाठीच्या सदस्यत्वासाठी विकास आघाडीच्या किशोर जाधव, तर स्थायी समितीवर एल. जी. जाधव (प्राचार्य), मधुकर पाटील (नोंदणीकृत गट) यांची बिनविरोध निवड झाली. अध्यापक गटातील एका जागेसाठी सुटाच्या प्रा. ईला जोगी आणि विकास आघाडीचे वसंत पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली.

यावर विकास आघाडीचे प्रताप माने, मोहन राजमाने यांनी वसंत पाटील यांना बिनविरोध निवडून देण्याचे आवाहन केले. यावर प्रा. जोगी यांनी उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे वसंत पाटील यांची बिनविरोध निवड झाली. विद्यापीठ तक्रार निवारण समितीवरील शिक्षक सदस्यत्वासाठी निवडणूक झाली.

यात सुटाचे नीळकंठ खंदारे आणि विकास आघाडीचे निखिल गायकवाड यांच्यात लढत झाली. सुरुवातीला सुटा आणि विकास आघाडीकडून आपापल्या उमेदवाराच्या बिनविरोध निवडीसाठी एकमेकांना आवाहन करण्यात आले. १५ मिनिटांहून अधिक वेळ चर्चा झाली; मात्र बिनविरोधचे प्रयत्न फोल ठरले. अखेर निवडणूक झाली.

अधिसभा सदस्यांचे हात उंचावून मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत ३६ मतांसह निखिल गायकवाड यांनी बाजी मारली. नीळकंठ खंदारे यांना आठ मते मिळाली. विद्यापीठ गुणवत्ता शिष्यवृत्ती निवड व छाननी समितीवर सदस्यत्वासाठी विकास आघाडीचे सतीश घाटगे आणि सुटाचे ए. बी. पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली. यात पाटील यांनी उमेदवारी मागे घेतल्याने घाटगे यांची बिनविरोध निवड झाली.

विद्यापीठाला नवी ओळख द्यावीसहकार्य, संवाद आणि सहभागाद्वारे विद्यापीठाला अधिसभा आणि विविध अधिकार मंडळांवरील सदस्यांनी नवी ओळख द्यावी, असे आवाहन कुलगुरू डॉ. शिंदे यांनी केले. ते म्हणाले, अधिकार मंडळाच्या सभांचे कामकाज आयटीसी बेस्ड् होणार आहे. त्याची सुरुवात या अधिसभेसाठी आलेल्या सदस्यांचा टीए-डीए भत्ता आॅनलाईन जमा करून केली आहे. यात विद्यापीठ राज्यात आदर्श ठरेल. विद्यापीठात प्लास्टिक बंदी राबविण्यात येत आहे. विद्यापीठाच्या विविध उपक्रमांना सदस्यांनी सहकार्य करावे. 

 

टॅग्स :universityविद्यापीठkolhapurकोल्हापूर