शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : चालकाच्या चुकीमुळे बस दुर्घटना :चंद्रकांतदादा पाटील, शिवाजी पुलावरील वाहतुकीबाबत सर्वांनी मिळून व्यवहार्य निर्णय घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 17:37 IST

शिवाजी पुलावरील मिनीबस दुर्घटना ही वाहनचालकाच्या चुकीमुळे घडली आहे. त्यामुळे नवीन शिवाजी पूल वाहतुकीसाठी सुरू होईपर्यंत लागणाऱ्या कालावधीत जुना पूल वाहतुकीसाठी सुरू ठेवावा, अथवा बंद करावा याबाबत प्रशासन, लोकप्रतिनिधी व जनता यांनी एकत्रित निर्णय घ्यावा लागेल, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले आहे.

ठळक मुद्देशिवाजी पुलावरील मिनीबस दुर्घटना ही वाहनचालकाच्या चुकीमुळे स्ट्रक्चरल आॅडिटमध्ये शिवाजी पूल धोकादायक नसल्याचे सिद्ध पुरातत्त्व खात्याच्या नियमानुसार नवीन पुलाचे काम रखडलेनवीन पुलाचे ८० टक्के कामही पूर्ण वाहतुकीबाबत प्रशासन, लोकप्रतिनिधी व जनता यांनी एकत्रित निर्णय घ्यावा

कोल्हापूर : शिवाजी पुलावरील मिनीबस दुर्घटना ही वाहनचालकाच्या चुकीमुळे घडली आहे. त्यामुळे नवीन शिवाजी पूल वाहतुकीसाठी सुरू होईपर्यंत लागणाऱ्या कालावधीत जुना पूल वाहतुकीसाठी सुरू ठेवावा, अथवा बंद करावा याबाबत प्रशासन, लोकप्रतिनिधी व जनता यांनी एकत्रित निर्णय घ्यावा लागेल, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले आहे.

पालकमंत्री पाटील म्हणाले, गेल्या पाच ते सहा वर्षांपासून शिवाजी पुलाच्या बांधकामाचा विषय प्रलंबित असून, नवीन पुलाचे ८० टक्के कामही पूर्ण झाले आहे. तथापि, या ठिकाणी जुनी लेणी असल्याने पुरातत्त्व खात्याच्या नियमानुसार २०० मीटरपर्यंत कोणतेही बांधकाम करता येत नाही. त्यामुळे या नवीन पुलाचे काम रखडले.

या कायद्यात बदल करून हे अंतर २०० मीटरवरून ५० मीटरपर्यंत कमी करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. राज्यसभेमध्ये हे विधेयक मंजुरीसाठी आहे. ते मंजूर होऊन कायद्यात रूपांतरित होईपर्यंत हा पूल पूर्ण होऊ शकत नाही.

जरी या पुलाचे काम २० टक्के अपूर्ण असले, तरी बराच काळ हा पूल अपूर्ण असल्याने त्याची मजबूती तपासावी लागेल. हा पूल पूर्ण होऊन वाहतुकीसाठी उपलब्ध होईपर्यंत बराच कालावधी जाईल. त्यासाठी या पुलावरून वाहतुकीबाबत प्रशासन, लोकप्रतिनिधी व जनता यांनी एकत्रित निर्णय घ्यावा.शिवाजी पूल जरी १४० वर्षे जुना असला, तरी वेळोवेळी करण्यात आलेल्या स्ट्रक्चरल आॅडिटमध्ये हा पूल धोकादायक नसल्याचे सिद्ध झाले आहे. शुक्रवारची घटना ही वाहनचालकाच्या चुकीमुळे घडलेली आहे. जुन्या पुलावरून वाहतुकीबाबत सर्वांनी मिळून व्यवहार्य निर्णय घेणे आवश्यक असल्याचेही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले. 

 

टॅग्स :Chandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटीलkolhapurकोल्हापूरAccidentअपघात