शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
5
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
6
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
7
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
8
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
9
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
11
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
12
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
13
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
14
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
15
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
16
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
17
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
18
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
19
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
20
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

कोल्हापूर : चालकाच्या चुकीमुळे बस दुर्घटना :चंद्रकांतदादा पाटील, शिवाजी पुलावरील वाहतुकीबाबत सर्वांनी मिळून व्यवहार्य निर्णय घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 17:37 IST

शिवाजी पुलावरील मिनीबस दुर्घटना ही वाहनचालकाच्या चुकीमुळे घडली आहे. त्यामुळे नवीन शिवाजी पूल वाहतुकीसाठी सुरू होईपर्यंत लागणाऱ्या कालावधीत जुना पूल वाहतुकीसाठी सुरू ठेवावा, अथवा बंद करावा याबाबत प्रशासन, लोकप्रतिनिधी व जनता यांनी एकत्रित निर्णय घ्यावा लागेल, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले आहे.

ठळक मुद्देशिवाजी पुलावरील मिनीबस दुर्घटना ही वाहनचालकाच्या चुकीमुळे स्ट्रक्चरल आॅडिटमध्ये शिवाजी पूल धोकादायक नसल्याचे सिद्ध पुरातत्त्व खात्याच्या नियमानुसार नवीन पुलाचे काम रखडलेनवीन पुलाचे ८० टक्के कामही पूर्ण वाहतुकीबाबत प्रशासन, लोकप्रतिनिधी व जनता यांनी एकत्रित निर्णय घ्यावा

कोल्हापूर : शिवाजी पुलावरील मिनीबस दुर्घटना ही वाहनचालकाच्या चुकीमुळे घडली आहे. त्यामुळे नवीन शिवाजी पूल वाहतुकीसाठी सुरू होईपर्यंत लागणाऱ्या कालावधीत जुना पूल वाहतुकीसाठी सुरू ठेवावा, अथवा बंद करावा याबाबत प्रशासन, लोकप्रतिनिधी व जनता यांनी एकत्रित निर्णय घ्यावा लागेल, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले आहे.

पालकमंत्री पाटील म्हणाले, गेल्या पाच ते सहा वर्षांपासून शिवाजी पुलाच्या बांधकामाचा विषय प्रलंबित असून, नवीन पुलाचे ८० टक्के कामही पूर्ण झाले आहे. तथापि, या ठिकाणी जुनी लेणी असल्याने पुरातत्त्व खात्याच्या नियमानुसार २०० मीटरपर्यंत कोणतेही बांधकाम करता येत नाही. त्यामुळे या नवीन पुलाचे काम रखडले.

या कायद्यात बदल करून हे अंतर २०० मीटरवरून ५० मीटरपर्यंत कमी करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. राज्यसभेमध्ये हे विधेयक मंजुरीसाठी आहे. ते मंजूर होऊन कायद्यात रूपांतरित होईपर्यंत हा पूल पूर्ण होऊ शकत नाही.

जरी या पुलाचे काम २० टक्के अपूर्ण असले, तरी बराच काळ हा पूल अपूर्ण असल्याने त्याची मजबूती तपासावी लागेल. हा पूल पूर्ण होऊन वाहतुकीसाठी उपलब्ध होईपर्यंत बराच कालावधी जाईल. त्यासाठी या पुलावरून वाहतुकीबाबत प्रशासन, लोकप्रतिनिधी व जनता यांनी एकत्रित निर्णय घ्यावा.शिवाजी पूल जरी १४० वर्षे जुना असला, तरी वेळोवेळी करण्यात आलेल्या स्ट्रक्चरल आॅडिटमध्ये हा पूल धोकादायक नसल्याचे सिद्ध झाले आहे. शुक्रवारची घटना ही वाहनचालकाच्या चुकीमुळे घडलेली आहे. जुन्या पुलावरून वाहतुकीबाबत सर्वांनी मिळून व्यवहार्य निर्णय घेणे आवश्यक असल्याचेही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले. 

 

टॅग्स :Chandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटीलkolhapurकोल्हापूरAccidentअपघात