शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

कोल्हापूर : आमिषे दाखविणाऱ्या रक्तपेढ्यांवर होणार कारवाई, नियमांच्या अधीन राहून काम करण्याच्या सूचना : ब्लड बॅँक असोसिएशनची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 18:39 IST

राज्य सरकारच्या नियमांच्या अधीन राहून रक्तदान शिबिरांचे आयोजन करा, रक्तदात्यांना प्रलोभने दाखवून रक्तदान शिबिरे घेणाऱ्यांवर थेट कारवाई करण्याची तयारी अन्न व औषध प्रशासनानी केली आहे. याबाबत रक्तपेढ्यांची असोसिएशन तयार करण्यात आली असून, चुकीचे काम करणाऱ्या बॅँकांची थेट तक्रार अन्न-औषध प्रशासन विभागाकडे केली जाणार आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील रक्तपेढीचालकांची कोल्हापुरात तातडीची बैठक ‘कोल्हापूर जिल्हा ब्लड बॅँक असोसिएशन’ची स्थापनाऐच्छिक रक्तदानासाठी पुढाकार

कोल्हापूर : राज्य सरकारच्या नियमांच्या अधीन राहून रक्तदान शिबिरांचे आयोजन करा, रक्तदात्यांना प्रलोभने दाखवून रक्तदान शिबिरे घेणाऱ्यांवर थेट कारवाई करण्याची तयारी अन्न व औषध प्रशासनानी केली आहे. याबाबत रक्तपेढ्यांची असोसिएशन तयार करण्यात आली असून, चुकीचे काम करणाऱ्यां बॅँकांची थेट तक्रार अन्न-औषध प्रशासन विभागाकडे केली जाणार आहे.रक्तसंकलन करण्याच्या स्पर्धेमुळे त्यात व्यावसायिकपणा आला असून, रक्तदात्यांना मोठमोठी प्रलोभने दाखवून सर्रास कॅम्पचे आयोजन केले जात आहे. या प्रकारामुळे रक्ताची गुणवत्ता ढासळत चालली आहे. रुग्णांच्या जिवाशी राजरोसपणे खेळले जाते.

याबाबत ‘लोकमत’च्या गुरुवार (दि. २१)च्या अंकात ‘रक्तदात्यांना प्रलोभने’ असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली. त्याची दखल अन्न व औषध प्रशासनाने घेतली. रक्तदात्यांना प्रलोभने दाखविणाºया रक्तपेढ्यांवर थेट कारवाई करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, तशा सूचना वरिष्ठ कार्यालयाकडून दिल्या गेल्या आहेत.

जिल्ह्यातील रक्तपेढीचालकांची गुरुवारी कोल्हापुरात तातडीची बैठक झाली. यामध्ये रक्तपेढीच्या व्यावसायिकपणाची जोरदार चर्चा झाली. एक-दोन रक्तपेढ्यांमुळे सर्वच रक्तपेढ्या बदनाम होत आहेत. यासाठी ‘कोल्हापूर जिल्हा ब्लड बॅँक असोसिएशन’ची स्थापना करण्यात आली. असोसिएशनच्या माध्यमातून बॅँकांच्या कामकाजावर अंकुश ठेवला जाणार आहे.

रक्तदानाच्या घोषणा असणारे व सरकारच्या नियमांच्या अधीन राहून पेन, किचेन, टोप्या शिवाय भेटवस्तू वाटप करता येणार नाही. त्याचबरोबर मोठ्या भेटवस्तू देऊन रक्तदान कॅम्प घेणाऱ्यांची थेट तक्रार अन्न व औषध प्रशासन विभागाकडे केली जाणार आहे.

ऐच्छिक रक्तदानासाठी पुढाकाररक्तदान हे ऐच्छिक आहे. त्यासाठी आमिषे दाखवणे चुकीचे आहे. रक्तदात्यांबरोबरच ब्लड बॅँकांनी राष्ट्रीय काम म्हणून रक्तदान व रक्त संकलन करणे गरजेचे आहे.

काही ब्लड बॅँकांमुळे इतरांना त्रास होत आहे. यासाठी असोसिएशची स्थापना केली असून त्याच्या माध्यमातून नियंत्रण ठेवले जाणार आहे.- डॉ. राजेंद्र चिंचणीकर,सदस्य, ब्लड बॅँक असोसिएशन) 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल