शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
2
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
3
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
4
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
5
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
6
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
7
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
8
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
10
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
11
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
12
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
13
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
14
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
15
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
17
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
18
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?
19
'चांगल्यापैकी पोटगी मिळतेय'; मासिक १० लाख मिळवण्यासाठी हसीन जहाँ सुप्रीम कोर्टात, मोहम्मद शमीला नोटीस
20
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव

कोल्हापूर : भव्यदिव्यतेतून चित्रपटाची सौंदर्यानुभूती : नितीन देसाई, कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 19:40 IST

येणाऱ्या  प्रेक्षकाला चित्रपटातून ‘लार्जर दॅन लाईफ’ अनुभूती हवी असते. कथानकानुरूप बनविलेले नेपथ्य कलादिग्दर्शन रसिकांना भावते. त्यातून चित्रपटाची सौंदर्यानुभूती मिळते. ही भव्यदिव्यता कलामहर्षी बाबूराव पेंटर, भालजींच्या चित्रपटांपासून चालत आली आहे. कलेचे संचित सोबत ठेवून नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार केला पाहिजे, असे मत प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी गुरुवारी व्यक्त केले.

ठळक मुद्दे कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी पत्रकारांशी संवाद छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट बनविण्यात येणार इतिहासाचे विकृतीकरण ही मार्केटिंग स्ट्रॅटेजीच

कोल्हापूर : येणाऱ्या  प्रेक्षकाला चित्रपटातून ‘लार्जर दॅन लाईफ’ अनुभूती हवी असते. कथानकानुरूप बनविलेले नेपथ्य कलादिग्दर्शन रसिकांना भावते. त्यातून चित्रपटाची सौंदर्यानुभूती मिळते. ही भव्यदिव्यता कलामहर्षी बाबूराव पेंटर, भालजींच्या चित्रपटांपासून चालत आली आहे. आज डिजिटल आणि स्पेशल इफेक्टचे युग असले तरी मानवी भावनांचा आविष्कार, कलेचे संचित सोबत ठेवून नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार केला पाहिजे, असे मत प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी गुरुवारी व्यक्त केले.कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनात आयोजित कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, चित्रपटाचे कथानक डोळ्यांसमोर ठेवून त्याचे नेपथ्य आणि कलादिग्दर्शन केले जाते.

बाबूराव पेंटर यांनी साकारलेली मयसभा समजण्यासाठी माझे दीड वर्ष गेले. आज सर्वांना ‘बाहुबली’ चित्रपटाचे कौतुक असले तरी भालजींच्या ‘छत्रपती शिवाजी’ किंवा ‘चित्रलेखा’ सारख्या चित्रपटांच्या भव्यतेपुढे आणि सौंदर्यापुढे ते थिटेच पडेल. त्यांच्या चित्रपटांची भव्यता पाहिल्यानंतर वाटते की आपण काहीच केले नाही. मी करीत असलेले काम माझ्यासाठी तपस्या आणि ध्यास आहे.मी ज्या संघर्षातून पुढे आलो, तो संघर्ष नव्या पिढीच्या वाटेला येऊ नये यासाठी मुंबईत भव्य स्टुडिओ उभारण्यात आला आहे. त्याद्वारे नव्या पिढीला व्यासपीठ मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट बनविण्यात येणार असून, त्याचे लेखन आत्ता पूर्ण झाले आहे.

अमेरिकेतील तंत्रज्ञांच्या साहाय्याने त्याचे चित्रीकरण करण्यात येणार असून, शिवाजी महाराजांची ओळख जागतिक पातळीवर नेण्याच्या दृष्टीने तो महत्त्वाकांक्षी चित्रपट आहे. चंद्रकांत जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

इतिहासाचे विकृतीकरण ही मार्केटिंग स्ट्रॅटेजीच‘पद्मावती’ चित्रपटावरून सुरू असलेल्या वादाबद्दल ते म्हणाले, इतिहासातील व्यक्तिमत्त्वांना आपण देवासमान मानतो. त्यांनी गाजविलेल्या पराक्रमाला आणि कर्तृत्वाला विकृत रूपात दाखवून नागरिकांच्या भावना दुखावण्याचा अधिकार कुणालाही नाही.

पद्मावती तसेच बाजीराव मस्तानी, छत्रपती शिवाजी महाराज या मालिका बनविताना मी त्यांच्या इतिहासाचा अभ्यास केला. सत्यतेत मोठी ताकद असते. ते पाहण्यासाठी रसिकांनी चित्रपटगृहापर्यंत येण्यासाठी खोट्या मसाल्याची किंवा प्रतिमा बदलण्याची गरज नसते. चित्रपटाबद्दलसुरू असलेला वाद ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे. ‘बॅड पब्लिसिटी इज गुड पब्लिसिटी’ या फंड्यानुसार चित्रपटाचा प्रवास सुरू आहे. 

 

टॅग्स :Nitin Chandrakant Desaiनितीन चंद्रकांत देसाईkolhapurकोल्हापूर