शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

कोल्हापूर : अतिसार कार्यक्रमाचा २ लाख ३६ हजार बालकांना होणार लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 17:19 IST

देशात पाच वर्षांपर्यंतच्या बालकांच्या मृत्यूमागे अतिसार हे प्रमुख कारण असून १० टक्के बालके अतिसाराने दगावतात. म्हणूनच अतिसार नियंत्रण पंधरवड्यात जिल्ह्यातील २ लाख ३६ हजार बालकांना लाभ देण्यासाठी नियोजन केले असल्याची माहिती प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांनी दिली.

ठळक मुद्देअतिसार कार्यक्रमाचा २ लाख ३६ हजार बालकांना होणार लाभ आरोग्य विभागाचे नियोजन

कोल्हापूर : देशात पाच वर्षांपर्यंतच्या बालकांच्या मृत्यूमागे अतिसार हे प्रमुख कारण असून १० टक्के बालके अतिसाराने दगावतात. म्हणूनच अतिसार नियंत्रण पंधरवड्यात जिल्ह्यातील २ लाख ३६ हजार बालकांना लाभ देण्यासाठी नियोजन केले असल्याची माहिती प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांनी दिली.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत २८ मे ते ९ जून या कालावधीमध्ये अतिसार नियंत्रण पंधरवडा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. एस. पाटील, जिल्हा प्रशासनाधिकारी नितीन देसाई, अतिरिक्त जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. सुहास कोरे, डॉ. विलास देशमुख, महानगरपालिकेचे डॉ. रमेश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.काटकर यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा घेऊन ज्या उद्देशामुळे शासनाने या कार्यक्रमाची आखणी केली आहे, तो उद्देश सफल व्हावा यासाठी यंत्रणांनी प्रभावी अंमलबजावणी करावी, असे सांगून ओआरएस सॅचेट व झिंक सल्फेट औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवावा. भरारी आरोग्य पथकांमार्फत नियंत्रण करण्यात यावे, अशाही सूचना दिल्या.

या पंधरवड्यामध्ये पाच वर्षांखालील बालकांना २७५९ ‘आशां’द्वारे घरभेटी देऊन ओआरएस पाकिटांचे वाटप करण्यात येणार आहे. ओआरएस व झिंक कॉर्नर प्रस्थापित करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ४३९७ अंगणवाड्यांमधील व २९४४ शाळांमधील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय बालस्वास्थ्य अभियानांतर्गत हात धुण्याबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHealthआरोग्यzpजिल्हा परिषद