शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

pension day : पेन्शनसाठीही केएमटी कर्मचाऱ्यांच्या पदरी संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 14:26 IST

आयुष्यातील २५ ते ३0 वर्षे संस्थेसाठी प्रामाणिकपणे काम करायचे आणि उतारवयात दुसऱ्यावर अवलंबून राहायचे, अशी स्थिती केएमटीमधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची झाली आहे. कामावर असताना दर महिन्याच्या पगारासाठी प्रशासनाच्या पायऱ्या झिजविल्या. सेवानिवृत्तीनंतर पेन्शनसाठीही त्यांच्या पदरी संघर्ष आला आहे.

ठळक मुद्देपेन्शनसाठीही केएमटी कर्मचाऱ्यांच्या पदरी संघर्षतुटपुंज्या पेन्शनवर उदरनिर्वाह करायचा कसा : संतप्त कर्मचाऱ्यांचा सवाल

कोल्हापूर : आयुष्यातील २५ ते ३0 वर्षे संस्थेसाठी प्रामाणिकपणे काम करायचे आणि उतारवयात दुसऱ्यावर अवलंबून राहायचे, अशी स्थिती केएमटीमधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची झाली आहे. कामावर असताना दर महिन्याच्या पगारासाठी प्रशासनाच्या पायऱ्या झिजविल्या. सेवानिवृत्तीनंतर पेन्शनसाठीही त्यांच्या पदरी संघर्ष आला आहे.महापालिकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शनसाठी दर महिन्याला १0 तारखेची प्रतीक्षा करावी लागते. येथील कर्मचाऱ्यांना समाधानकारक पेन्शन आहे; मात्र केएमटी कर्मचाऱ्यांची वाईट स्थिती आहे. केवळ ८00 ते २५00 रुपये पेन्शनवरच त्यांना उदरनिर्वाह करावा लागत आहे. ही पेन्शन सुरू होण्यासाठी दोन ते तीन वर्षे प्रतीक्षा करावी लागते. तसेच संबंधितांचे हात ओले केल्याशिवाय पेन्शनची फाईल पुढे सरकत नाही.कोल्हापूर महापालिकेतील कर्मचाऱ्यांची पेन्शन वेळेवर होत नाही. याबद्दल सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेने तत्कालीन आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांची भेट घेतली. त्यांनी १ तारखेलाच पेन्शन देण्याचे आदेश दिले होते. काही महिने १ तारखेला पेन्शनही झाली. त्यांची बदली झाल्यानंतर काही महिन्यांतच हा नियम कागदावरच राहिला.

महापालिकेची आर्थिक स्थिती बेताची असल्याने पेन्शन वेळेवर होत नाही. १0 तारखेपर्यंत प्रतीक्षा करण्याची वेळ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर येत आहे. वास्तविक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना औषध उपचारासाठी पैशाची गरज असते. दुसऱ्यांकडे पैसे मागण्याची वेळ आता त्यांच्यावर आली आहे; त्यामुळे पूर्वीप्रमाणे १ तारखेलाच पेन्शन मिळावी, अशी मागणी जोर धरत आहे.केएमटी कर्मचाऱ्यांना तुटपुंजी पेन्शनकेएमटीच्या कर्मचाऱ्यांचा त्रास सेवानिवृत्तीनंतरही संपत नाही, अशी स्थिती आहे. कामावर असताना वेळेवर पगार नसल्यामुळे सावकाराच्या दारात जाण्याची वेळ त्यांच्यावर येत आहे, तर सेवानिवृत्तीनंतर ८00 ते २५00 रु. पेन्शन मिळते. तुटपुंज्या पेन्शनमुळे दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची नामुष्की त्यांच्यावर आली आहे. वास्तविक पगाराएवढी पेन्शन देण्याचा निर्णय झाला असताना याची अंमलबजावणी होत नाही. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर उतारवयातही संघर्ष सुटलेला नाही.

 

  • महापालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी- सुमारे ३000
  • केएमटी- एक हजार
  • केएमटी कर्मचाऱ्यांना पेन्शन-८00 ते २५00 रु.

पगाराएवढी पेन्शन मिळाली पाहिजे

केएमटी कर्मचाऱ्यांना इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच पेन्शन मिळाली पाहिजे. पेन्शन वाढीचा प्रस्ताव केंद्रीय पातळीवर मंजूर होऊनही अंमलबजावणी होत नाही. सेवानिवृत्त झाल्यानंतर त्वरित पेन्शन सुरू होत नाही. तीन वर्षांनंतर पेन्शन सुरू झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. पगाराएवढी पेन्शन मिळालीच पाहिजे.सुभाष सावंत, केएमटी सेवानिवृत्त कर्मचारी 

 

टॅग्स :Pensionनिवृत्ती वेतनkolhapurकोल्हापूर