शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

पूरग्रस्तांसाठी किसान सभा रस्त्यावर, धडक मोर्चा, ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 16:26 IST

विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या ठिकाणी निदर्शने करुन आंदोलकांनी काही काळ ठिय्या मारला.

ठळक मुद्दे पूरग्रस्तांसाठी किसान सभा रस्त्यावर, धडक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या

कोल्हापूर : महापुरामुळे झालेल्या नुकसानीच्या तुलनेत शासनाकडून झालेली मदत ही तोकडी आहे. त्यामुळे पूरग्रस्त भागाची पुन्हा पाहणी करुन पुरग्रस्तांना शंभर टक्के नुकसान भरपाई देण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या ठिकाणी निदर्शने करुन आंदोलकांनी काही काळ ठिय्या मारला.दुपारी एकच्या सुमारास दसरा चौक येथून किसान सभेचे नेते डॉ. उदय नारकर, ‘सिटू’चे नेते प्रा. सुभाष जाधव यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाला सुरुवात झाली. जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातून नागरिक यामध्ये सहभागी झाले होते. घोषणाबाजी करत आंदोलकांचा हा मोर्चा व्हिनस कॉर्नर, बसंत-बहार टॉकीजमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आला. या ठिकाणी निदर्शने करुन आंदोलकांनी ठिय्या मारला. यानंतर शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना सादर करण्यात आले.निवेदनातील मागण्या अशा, जिल्ह्यातील महापूर आणि अतिवृृष्टीने पडझड झालेल्या घरांची पूर्णत: बांधणी व दुरुस्ती शासनामार्फत करावी. पिक नुकसानीचे पंचनामे करुन बागायतीसाठी एकरी एक लाख रुपये तर जिरायतीसाठी एकरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, जिल्ह्यातील महापूर व अतिवृष्टीग्रस्त गावातील शेतमजूर व गरीब शेतकऱ्यांना खावटी अनुदान म्हणून ५० किलो धान्य, ५ किलो तुरडाळ, ५ किलो हरभरा डाळ, ५ किलो साखर, एक गॅस सिलिंडर मोफत द्यावी, महापुराने दगावलेल्या पशुपक्ष्यांसाठी बाजारभावाप्रमाणे नुकसान भरपाई द्यावी, कुरुंदवाड येथील बेघर आणि इंगळीसह नियमित बाधित वसाहतींचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करावे, राजापूर-राजापूरवाडीसह वंचित पूरग्रस्त गावांना तात्काळ किसान सन्मान योजनेचा लाभ मिळाला पाहीजे, महापूरात गहाळ किंवा खराब झालेल्या महत्वाच्या कागदपत्रांसाठी गावांमध्ये खास शिबिरे घ्यावीत, शिरोळ तालक्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी योग्य उपाय योजना करावी.आंदोलनात विजयाराणी पाटील, मुमताज हैदर, भाऊसाहेब कसबे, आण्णासो रड्डे, पंकज खोत, सर्वेश सवाखंडे आदींसह पूरग्रस्त सहभागी झाले होते.

 

 

टॅग्स :Kisan Sabha Long Marchकिसान सभा लाँग मार्चcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर