शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
4
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
5
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
6
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
7
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
8
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
9
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
10
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
11
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
12
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
13
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
14
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
15
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
16
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
17
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
18
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
19
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
20
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!

कोल्हापूर जिल्ह्यातील खरीप क्षेत्र ४ हजारांनी कमी, ऊस १६ हजार हेक्टरने वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2024 13:08 IST

कडधान्याला दर नसल्याचा परिणाम : मान्सूनचे वेळेवर आगमन; शेतकऱ्यांची लगबग वाढली

कोल्हापूर : गेल्या पाच-सहा वर्षांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील खरिपाचे क्षेत्र हळूहळू कमी होऊ लागले आहे. खरिपात घेण्यात येणाऱ्या अन्नधान्य व कडधान्याच्या बेभरवशाच्या दरामुळे शेतकऱ्यांची मानसिकता बदलली आहे. त्या तुलनेत उसाला चांगला भाव मिळू लागल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत जिल्ह्यातील खरिपाचे क्षेत्र ४ हजार हेक्टरने कमी झाले, तर उसाचे क्षेत्र तब्बल १६ हजार हेक्टरने वाढले आहे.कोल्हापूर जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र हे ७ लाख ७६ हजार हेक्टर आहे. त्यापैकी ५ लाख ७ हजार हेक्टर हे लागवडीलायक आहे. निव्वळ पेरा क्षेत्र ४ लाख ७७ हजार हेक्टर आहे. खरीप हंगामात भात, ज्वारी, नागली, साेयाबीन, भुईमूग, तूर, मूग, उडीद ही पिके घेतली जातात. खरिपात सर्वाधिक भात पीक हे ९२ हजार हेक्टरवर घेतले जाते. त्यापाठोपाठ सोयाबीन, भुईमूग या तेलबियांचे उत्पादन घेतले जाते.मात्र, गेल्या दोन वर्षांत सोयाबीनच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. खाद्यतेलाच्या दरात घसरणीमुळे भुईमुगालाही अपेक्षित दर मिळाला नाही. त्या तुलनेत उसाला बऱ्यापैकी तेही एकरकमी दर मिळत असल्याने उसाचे क्षेत्र वाढले आहे.अक्षय तृतीया झाल्याने खरीप तयारीसाठी शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे. त्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून वळीव पाऊस जोरदार कोसळत असल्याने मशागतीला मदत होत आहे. (पूर्वार्ध)

घरी खाण्यापुरता भात पिकविण्याकडे कलभाताचा उत्पादन खर्च आणि काढणीनंतर बाजारातील दर पाहता, शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडत नाही. त्यामुळे अलीकडील चार-पाच वर्षांत घरी खाण्यापुरताच भात पिकविण्याकडे बहुतांशी शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

तुलनात्मक पीक क्षेत्रातील घट-वाढ हेक्टरमध्ये -

पीक             २०२२-२३                    २०२३-२४खरीप          १ लाख ९६ हजार ४६६  १ लाख ९२ हजार ६३६रब्बी            २२ हजार ७०                 २१ हजार ०७ऊस             १ लाख ७२ हजार ४६३  १ लाख ८८ हजार ४५९

गेल्या पाच वर्षांतील पर्जन्यमान मिली मीटरमध्ये असे-वर्ष                 पाऊस          टक्के२०१९             २३८८             १२८२०२०             १९४४             ९९२०२१             २११९             १२४२०२२             १९३२             ९८२०२३             ११०३             ५६

मान्सूनचे आगमन; पेरणी अशी करा..

यंदा मान्सूनचे आगमन जूनच्या पहिल्या आठवड्यात होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यानुसार खरिपाच्या पेरणीचे नियोजन करावे. मध्यम खोल प्रमाणात भाताची धूळवाफ पेरणी, तर पाऊस सुरु झाल्यानंतर सोयाबीन, भुईमुगाची खोलवर पेरणी करावी.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी