शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

Kerala Floods : कोल्हापुरातील केरळवासीयांचा अस्वस्थतेशी सामना, निधी संकलनाचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 11:36 IST

कोल्हापूर मल्याळी फौंडेशनच्या वतीने केरळवासीयांच्या मदतीसाठी निधी संकलनास सुरुवात करण्यात आली आहे.

ठळक मुद्देकोल्हापुरातील केरळवासीयांचा अस्वस्थतेशी सामनानिधी संकलनाचे काम सुरू, रोज साधला जातोय संपर्क

समीर देशपांडेकोल्हापूर : होत्याचे नव्हते झाल्यासारखी स्थिती निर्माण झाल्याने कोल्हापूरमध्ये वास्तव्यास असणारे केरळवासीय अतिशय अस्वस्थ बनले आहेत. धड इकडचे व्यवसाय बंदही करता येत नाहीत आणि तेथे जाऊनही फार उपयोग नाही, अशा परिस्थितीमध्ये रोज घरच्या मंडळींची खुशाली विचारणे एवढेच या मंडळींच्या हातात आहे. तरीही कोल्हापूर मल्याळी फौंडेशनच्या वतीने केरळवासीयांच्या मदतीसाठी निधी संकलनास सुरुवात करण्यात आली आहे.कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात केरळमधील सुमारे साडेतीनशेहून अधिक कुटुंबे आहेत. बेकरी, टायर विक्री आणि पंक्चर काढण्याच्या व्यवसायामध्ये प्रामुख्याने ही मंडळी कार्यरत आहेत. येथील मुक्त सैनिक वसाहतीनजीक या सर्वांनी आयप्पा मंदिर उभारले असून, तेथे ही मंडळी एकत्र येत असतात.पोलीस दलामध्ये सेवा करून निवृत्त झालेले मोहन नायर म्हणाले, आलट्टी जिल्ह्यामध्ये संपूर्ण पुराचे पाणी आहे. माझी बहीण आणि अन्य नातेवाइकांना निवारा शिबिरामध्ये दाखल करण्यात आले आहे. मी सेवानिवृत्त आहे. मी तेथे जाऊन फार काही करू शकत नाही. त्यामुळे वस्तू आणि निधीचे संकलन सुरू आहे. ते आम्ही चार दिवसांत तिकडे पाठविणार आहोत.बेकरी व्यावसायिक मनिकुट्टम म्हणाले, कौटेम जिल्ह्यामध्येही दुर्दशा झाली आहे. तेथे माझी आई, वडील, भाऊ राहतात; परंतु तेथील स्थिती बघून खूप वाईट वाटते. आम्ही तेथे जाऊन काही करू शकणार नाही, याची आम्हांला जाणीव आहे. म्हणून ती स्थितीही पाहवत नाही आणि प्रत्यक्ष जाऊन काही करताही येत नाही, अशी स्थिती आहे. म्हणूनच शक्य ती मदत येथूनच करणार आहोत.

केरळमधील मलिपुरम शहरातील बंगल्यांची पुरामुळे अशी अवस्था झाली आहे.बेकरी व्यावसायिक शरद पी म्हणाले, आमच्या कन्नूर जिल्ह्यामध्ये पुराचा धोका नाही; परंतु आमच्या हयातीमध्ये आम्ही असले संकट पाहिले नव्हते. आमच्या प्रदेशामधील ही अवस्था पाहून वाईट वाटते. टायरच्या विक्री दुकानामध्ये अकौंटंट म्हणून काम करणारे जयकृष्णन, बेकरीमध्ये काम करणारे सुदीशबाबू यांच्यासारखे युवक केरळमधील या प्रलयाने अस्वस्थ आहेत.

विचित्र स्थितीचा अनुभवकेरळवासीयांशी बोलताना या आठवडाभरामध्ये विचित्र स्थितीचा सामना त्यांना करावा लागल्याचे जाणवले. टीव्हीवरून, वृत्तपत्रांतून तेथील संकटा

ची भीषणता कळत होती. व्हॉट्स अ‍ॅपवरून जे फोटो येत होते, ते पाहून अस्वस्थता येत होती. वाहतूक यंत्रणाही ठप्प असल्याने जाताही येणे शक्य नव्हते. आमच्याच घरचे जिथे शिबिरांमध्ये राहतात, जिथे सरकारच्या मदतकार्यावरही मर्यादा आल्या, तेथे आम्ही जाऊन काय करणार? यामुळेच केवळ परिस्थिती आणखी बिघडू नये एवढीच अपेक्षा आम्ही व्यक्त करीत होतो. आता जरा पुराचे पाणी कमी होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र झालेले नुकसान पाहवत नाही, अशा प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या.

‘व्हाईट आर्मी’चे मदतकार्य सुरूयेथील ‘व्हाईट आर्मी’ने गेल्या चार दिवसांपासून केरळमध्ये मदतकार्याला सुरुवात केली आहे. नऊ डॉक्टरांसह सुमारे २५ जणांचे पथक केरळला गेले असून तेथे प्रथमोपचारासह सर्व कामे या पथकाने सुरू केली आहेत. नागरिकांना स्थलांतरित करण्यापासून ते रांगा लावण्यापर्यंत सर्व कामे या पथकाकडून केली जात आहेत. 

 

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरkolhapurकोल्हापूर