शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

Kerala Floods : कोल्हापुरातील केरळवासीयांचा अस्वस्थतेशी सामना, निधी संकलनाचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 11:36 IST

कोल्हापूर मल्याळी फौंडेशनच्या वतीने केरळवासीयांच्या मदतीसाठी निधी संकलनास सुरुवात करण्यात आली आहे.

ठळक मुद्देकोल्हापुरातील केरळवासीयांचा अस्वस्थतेशी सामनानिधी संकलनाचे काम सुरू, रोज साधला जातोय संपर्क

समीर देशपांडेकोल्हापूर : होत्याचे नव्हते झाल्यासारखी स्थिती निर्माण झाल्याने कोल्हापूरमध्ये वास्तव्यास असणारे केरळवासीय अतिशय अस्वस्थ बनले आहेत. धड इकडचे व्यवसाय बंदही करता येत नाहीत आणि तेथे जाऊनही फार उपयोग नाही, अशा परिस्थितीमध्ये रोज घरच्या मंडळींची खुशाली विचारणे एवढेच या मंडळींच्या हातात आहे. तरीही कोल्हापूर मल्याळी फौंडेशनच्या वतीने केरळवासीयांच्या मदतीसाठी निधी संकलनास सुरुवात करण्यात आली आहे.कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात केरळमधील सुमारे साडेतीनशेहून अधिक कुटुंबे आहेत. बेकरी, टायर विक्री आणि पंक्चर काढण्याच्या व्यवसायामध्ये प्रामुख्याने ही मंडळी कार्यरत आहेत. येथील मुक्त सैनिक वसाहतीनजीक या सर्वांनी आयप्पा मंदिर उभारले असून, तेथे ही मंडळी एकत्र येत असतात.पोलीस दलामध्ये सेवा करून निवृत्त झालेले मोहन नायर म्हणाले, आलट्टी जिल्ह्यामध्ये संपूर्ण पुराचे पाणी आहे. माझी बहीण आणि अन्य नातेवाइकांना निवारा शिबिरामध्ये दाखल करण्यात आले आहे. मी सेवानिवृत्त आहे. मी तेथे जाऊन फार काही करू शकत नाही. त्यामुळे वस्तू आणि निधीचे संकलन सुरू आहे. ते आम्ही चार दिवसांत तिकडे पाठविणार आहोत.बेकरी व्यावसायिक मनिकुट्टम म्हणाले, कौटेम जिल्ह्यामध्येही दुर्दशा झाली आहे. तेथे माझी आई, वडील, भाऊ राहतात; परंतु तेथील स्थिती बघून खूप वाईट वाटते. आम्ही तेथे जाऊन काही करू शकणार नाही, याची आम्हांला जाणीव आहे. म्हणून ती स्थितीही पाहवत नाही आणि प्रत्यक्ष जाऊन काही करताही येत नाही, अशी स्थिती आहे. म्हणूनच शक्य ती मदत येथूनच करणार आहोत.

केरळमधील मलिपुरम शहरातील बंगल्यांची पुरामुळे अशी अवस्था झाली आहे.बेकरी व्यावसायिक शरद पी म्हणाले, आमच्या कन्नूर जिल्ह्यामध्ये पुराचा धोका नाही; परंतु आमच्या हयातीमध्ये आम्ही असले संकट पाहिले नव्हते. आमच्या प्रदेशामधील ही अवस्था पाहून वाईट वाटते. टायरच्या विक्री दुकानामध्ये अकौंटंट म्हणून काम करणारे जयकृष्णन, बेकरीमध्ये काम करणारे सुदीशबाबू यांच्यासारखे युवक केरळमधील या प्रलयाने अस्वस्थ आहेत.

विचित्र स्थितीचा अनुभवकेरळवासीयांशी बोलताना या आठवडाभरामध्ये विचित्र स्थितीचा सामना त्यांना करावा लागल्याचे जाणवले. टीव्हीवरून, वृत्तपत्रांतून तेथील संकटा

ची भीषणता कळत होती. व्हॉट्स अ‍ॅपवरून जे फोटो येत होते, ते पाहून अस्वस्थता येत होती. वाहतूक यंत्रणाही ठप्प असल्याने जाताही येणे शक्य नव्हते. आमच्याच घरचे जिथे शिबिरांमध्ये राहतात, जिथे सरकारच्या मदतकार्यावरही मर्यादा आल्या, तेथे आम्ही जाऊन काय करणार? यामुळेच केवळ परिस्थिती आणखी बिघडू नये एवढीच अपेक्षा आम्ही व्यक्त करीत होतो. आता जरा पुराचे पाणी कमी होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र झालेले नुकसान पाहवत नाही, अशा प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या.

‘व्हाईट आर्मी’चे मदतकार्य सुरूयेथील ‘व्हाईट आर्मी’ने गेल्या चार दिवसांपासून केरळमध्ये मदतकार्याला सुरुवात केली आहे. नऊ डॉक्टरांसह सुमारे २५ जणांचे पथक केरळला गेले असून तेथे प्रथमोपचारासह सर्व कामे या पथकाने सुरू केली आहेत. नागरिकांना स्थलांतरित करण्यापासून ते रांगा लावण्यापर्यंत सर्व कामे या पथकाकडून केली जात आहेत. 

 

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरkolhapurकोल्हापूर