शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण बनणार? सरसंघचालक मोहन भागवतांचं सूचक विधान, म्हणाले...    
2
३१ डिसेंबर आहे अखेरची तारीख, 'ही' २ कामं पटापट आटोपून घ्या; केली नाही तर समस्यांना सामोरं जावं लागेल
3
धक्कादायक! SMAT स्पर्धेसाठी निवड न झाल्याच्या रागातून कोचवर जीवघेणा हल्ला; तीन क्रिकेटपटूंवर आरोप
4
शिंदेंचा ‘वाघ’ थेट बिबट्याच्या वेशात विधान भवनात; हात जोडून सरकारला विनवणी, “गेली २० वर्षे...”
5
ममता बॅनर्जींनी केंद्र सरकारच्या आदेशाचा कागद फाडला! कशावरून रंगला 'हाय-व्होल्टेज' ड्रामा?
6
पाकिस्तानात शूट झालाय रणवीर सिंगचा 'धुरंधर'? अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला- "तिथले गँगस्टर..."
7
माणुसकी संपली! हेल्थ चेकअपमध्ये कॅन्सर झाल्याचे कळले; IT कंपनीने २१ वर्षांचा अनुभव असलेल्या कर्मचाऱ्याला काढले 
8
'वीर सावरकर पुरस्कार' नाकारला! काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी HRDS इंडियाचा प्रस्ताव फेटाळला; 'सहमतीशिवाय घोषणा केल्याने' वाद
9
Viral Video: अरे, हे चाललंय तरी काय? जोडप्यानं हायवेवर कार बाजूला लावली अन् रस्त्यावरच...
10
२०२६ मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर, भाऊबीजेला अतिरिक्त सुट्टी; सरकारकडून अधिसूचना जारी
11
कोण सरस...? टाटा नेक्सॉन आणि मारुती विक्टोरिसची समोरासमोर टक्कर झाली; दोन्ही ५ स्टार, कोणाची काय हालत...
12
रुपया गडगडल्यामुळे देशात महागाई वाढणार? आयातदारांची चिंता वाढली, RBI आता काय करणार?
13
Silver Price Today: चांदीचा दर विक्रमी उच्चांकावर, किंमत १.९० लाख रुपयांच्या पुढे; आता गुंतवणूक करणं योग्य होईल का?
14
Nana Patole: निवडणूक आयोगाच्या कारभारावर आक्षेप; आयुक्तांना पदावरून हटवण्याची पटोलेंची मागणी
15
याला म्हणतात नशीब! गरिबीशी लढणाऱ्या २ मित्रांचं आयुष्यच बदललं; सापडला ५० लाखांचा हिरा
16
धक्कादायक! लग्नासाठी जमीन विकली; २ वेळा बनला नवरदेव, पण दोन्ही वेळा फसला, चुना लावून वधू पसार
17
टेस्लाला मोठा झटका, VinFast बनली EV मार्केटची 'महाराणी'! आता असा आहे इलॉन मस्क यांच्या फ्यूचर प्लॅन
18
मालवणीतील वादाप्रकरणी मंत्री मंगलप्रभात लोढा आणि आमदार अस्लम शेख यांच्यात शाब्दिक चकमक
19
VIDEO: लग्नमंडपात काकूंचीच हवाsss... नवरा-नवरी वरमाला घालत असताना हवेत ५ राऊंड्स गोळीबार
Daily Top 2Weekly Top 5

Kirnotsav: अंबाबाईच्या कमरेपर्यंत पोहोचली सूर्यकिरणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 14:05 IST

किरणोत्सवाला तीन मिनिटे आधीच प्रारंभ : हवेतील आर्द्रता योग्य प्रमाणात

कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई दक्षिणायन किरणोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी शुक्रवारी ढगांचा अडथळा न आल्याने मावळतीची सूर्यकिरणे अंबाबाईच्या कमरेपर्यंत पोहोचली. हवेतील आद्रेतेचे प्रमाणही ४० टक्के म्हणजे योग्य असल्यामुळे किरणे महाद्वारातून आत येत शेवटी देवीच्या कमरेपर्यंत पोहाचली. गरुड मंडपाची कमान नसल्यामुळे यंदा किरणोत्सव तीन मिनिटे आधीपासूनच अनुभवता आला, हे विशेष. यामुळे दोनशे वर्षांपूर्वी किरणोत्सवाची स्थिती कशी असेल याचा अभ्यास यंदा अभ्यासकांना नोंदवता आला.दक्षिणायणाच्या कालखंडातील किरणोत्सवास शुक्रवारी प्रारंभ झाला. सायंकाळी ४ वाजून ५७ मिनिटांनी सूर्यकिरणे पश्चिमेकडील महाद्वारातून मंदिराच्या दिशेने गरुड मंडपाच्या मागे आली. ५ वाजून ०१ मिनिटांनी किरणांनी चबुतरा पार केला. ५ वाजून २३ मिनिटांनी किरणे गणपती मंदिरापर्यंत चौकात पोहोचली. ५ वाजून ३० मिनिटांनी सूर्यकिरणांनी गरुड मंडप गाठले. किरणांनी ५ वाजून ३४ मिनिटांनी चांदीचा उंबरा पार केला. यानंतर ५ वाजून ३९ मिनिटांनी किरणे गाभाऱ्यापर्यंत पोहोचली. ५ वाजून ४१ मिनिटांनी सूर्यकिरणे मूर्तीच्या चरणाखाली असलेल्या कटांजनापर्यंत पोहोचली होती. ५ वाजून ४३ मिनिटांनी किरणांनी श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीचा चरणस्पर्श केला. ५ वाजून ४५ मिनिटांनी किरणे गुडघ्यापर्यंत पोहोचली. त्यानंतर ५ वाजून ४७ मिनिटांनी किरणे मूर्तीच्या कमरेपर्यंत पोहोचली आणि डावीकडे लुप्त झाली.यावेळी सचिव शिवराज नाईकवाडे, व्यवस्थापक महादेव दिंडे, धर्मशास्त्र अभ्यासक गणेश नेर्लीकर-देसाई, विवेकानंद महाविद्यालयाच्या पदार्थविज्ञान विभागाचे प्राध्यापक, किरणोत्सव अभ्यासक प्रा. डॉ. मिलिंद कारंजकर, सुदर्शन निवास कुटाले उपस्थित होते. गुरुवारपेक्षा शुक्रवारी किरणांची तीव्रता चांगली होती त्यामुळे यावेळी, किरणोत्सव पूर्ण क्षमतेने होईल, अशी अपेक्षा खगोल अभ्यासक प्रा. डॉ. मिलिंद कारंजकर यांनी व्यक्त केली.

किरणोत्सवादरम्यान आता एकच अडथळा बाकीकिरणोत्सव मार्गातील बहुतांशी अडथळे देवस्थान व्यवस्थापन समितीने यापूर्वीच काढलेले आहे. महाद्वाराजवळील आणखीन एक अडथळा या किरणोत्सवावेळी उपस्थित असलेल्या महापालिकेच्या शाखा अभियंता अभिलाषा दळवी यांच्या लक्षात आणून दिला असून तो काढण्यात येणार आहे.

स्वच्छ वातावरणाची साथस्वच्छ वातावरण आणि निरभ्र आकाशामुळे शनिवारी किरणोत्सवाची तीव्रता चांगली होती. गाभाऱ्यातील आर्द्रता ३५ च्या आत होती. आता देवीच्या खांद्यापर्यंत, त्यानंतर मुखकमल, खांद्यावर आणि शेवटी चरणस्पर्श होऊन या सोहळ्याची सांगता होईल, असे प्रा. कारंजकर म्हणाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर