शहरं
Join us  
Trending Stories
1
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
2
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
3
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
4
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
5
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
7
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
8
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
9
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
10
Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
12
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
13
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
14
मुंबईत शिंदेसेना फक्त ६५ ते ७० जागाच लढवणार?; भाजपानं कंबर कसली, 'अबकी बार १५० पार'चा नारा
15
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास
16
कोण आहे सतीश शाह यांची पत्नी? दोघांना नव्हते मूल; जोडीदाराच्या निधनाने बसला धक्का
17
सामनावीर अन् मालिकावीर! रोहित शर्मा दुहेरी सन्मानावर म्हणाला- "मालिका हरलो असलो तरीही..."
18
Virat Kohli: 'रन मशीन' विराटची गगनभरारी! संगकाराला पछाडलं, आता फक्त सचिन तेंडुलकर पुढे
19
IND vs AUS: रोहितच्या सेंच्युरीसह किंग कोहलीची फिफ्टी; ऑस्ट्रेलिया विरुद्ध अखेरच्या वनडेत अविस्मरणीय शो!
20
मंगळ गोचर २०२५: २७ ऑक्टोबर रोजी मंगळ गोचर; पुढचे दोन महिने 'या' ५ राशींसाठी असणार खास!

Kirnotsav: अंबाबाईच्या कमरेपर्यंत पोहोचली सूर्यकिरणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 14:05 IST

किरणोत्सवाला तीन मिनिटे आधीच प्रारंभ : हवेतील आर्द्रता योग्य प्रमाणात

कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई दक्षिणायन किरणोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी शुक्रवारी ढगांचा अडथळा न आल्याने मावळतीची सूर्यकिरणे अंबाबाईच्या कमरेपर्यंत पोहोचली. हवेतील आद्रेतेचे प्रमाणही ४० टक्के म्हणजे योग्य असल्यामुळे किरणे महाद्वारातून आत येत शेवटी देवीच्या कमरेपर्यंत पोहाचली. गरुड मंडपाची कमान नसल्यामुळे यंदा किरणोत्सव तीन मिनिटे आधीपासूनच अनुभवता आला, हे विशेष. यामुळे दोनशे वर्षांपूर्वी किरणोत्सवाची स्थिती कशी असेल याचा अभ्यास यंदा अभ्यासकांना नोंदवता आला.दक्षिणायणाच्या कालखंडातील किरणोत्सवास शुक्रवारी प्रारंभ झाला. सायंकाळी ४ वाजून ५७ मिनिटांनी सूर्यकिरणे पश्चिमेकडील महाद्वारातून मंदिराच्या दिशेने गरुड मंडपाच्या मागे आली. ५ वाजून ०१ मिनिटांनी किरणांनी चबुतरा पार केला. ५ वाजून २३ मिनिटांनी किरणे गणपती मंदिरापर्यंत चौकात पोहोचली. ५ वाजून ३० मिनिटांनी सूर्यकिरणांनी गरुड मंडप गाठले. किरणांनी ५ वाजून ३४ मिनिटांनी चांदीचा उंबरा पार केला. यानंतर ५ वाजून ३९ मिनिटांनी किरणे गाभाऱ्यापर्यंत पोहोचली. ५ वाजून ४१ मिनिटांनी सूर्यकिरणे मूर्तीच्या चरणाखाली असलेल्या कटांजनापर्यंत पोहोचली होती. ५ वाजून ४३ मिनिटांनी किरणांनी श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीचा चरणस्पर्श केला. ५ वाजून ४५ मिनिटांनी किरणे गुडघ्यापर्यंत पोहोचली. त्यानंतर ५ वाजून ४७ मिनिटांनी किरणे मूर्तीच्या कमरेपर्यंत पोहोचली आणि डावीकडे लुप्त झाली.यावेळी सचिव शिवराज नाईकवाडे, व्यवस्थापक महादेव दिंडे, धर्मशास्त्र अभ्यासक गणेश नेर्लीकर-देसाई, विवेकानंद महाविद्यालयाच्या पदार्थविज्ञान विभागाचे प्राध्यापक, किरणोत्सव अभ्यासक प्रा. डॉ. मिलिंद कारंजकर, सुदर्शन निवास कुटाले उपस्थित होते. गुरुवारपेक्षा शुक्रवारी किरणांची तीव्रता चांगली होती त्यामुळे यावेळी, किरणोत्सव पूर्ण क्षमतेने होईल, अशी अपेक्षा खगोल अभ्यासक प्रा. डॉ. मिलिंद कारंजकर यांनी व्यक्त केली.

किरणोत्सवादरम्यान आता एकच अडथळा बाकीकिरणोत्सव मार्गातील बहुतांशी अडथळे देवस्थान व्यवस्थापन समितीने यापूर्वीच काढलेले आहे. महाद्वाराजवळील आणखीन एक अडथळा या किरणोत्सवावेळी उपस्थित असलेल्या महापालिकेच्या शाखा अभियंता अभिलाषा दळवी यांच्या लक्षात आणून दिला असून तो काढण्यात येणार आहे.

स्वच्छ वातावरणाची साथस्वच्छ वातावरण आणि निरभ्र आकाशामुळे शनिवारी किरणोत्सवाची तीव्रता चांगली होती. गाभाऱ्यातील आर्द्रता ३५ च्या आत होती. आता देवीच्या खांद्यापर्यंत, त्यानंतर मुखकमल, खांद्यावर आणि शेवटी चरणस्पर्श होऊन या सोहळ्याची सांगता होईल, असे प्रा. कारंजकर म्हणाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर