शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कोल्हापूर: कणेरी मठावर कर्नाटक भवन उभारू देणार नाही, शिवसेनेचा आक्रमक पवित्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2022 18:01 IST

कणेरी (ता. करवीर) मठावर येऊन कर्नाटकचे मुख्यमंत्री जर कर्नाटक भवन बांधण्याची घोषणा करून मराठी माणसांच्या जखमेवर मीठ चोळणार असतील, तर शिवसेना त्याला विरोध करेल.

कोल्हापूर : कणेरी (ता. करवीर) मठावर येऊन कर्नाटकचेमुख्यमंत्री जर कर्नाटक भवन बांधण्याची घोषणा करून मराठी माणसांच्या जखमेवर मीठ चोळणार असतील, तर शिवसेना त्याला विरोध करेल. सीमाभागासाठी मराठी माणसांनी १०५ हुतात्म्यांचे बलिदान दिले आहे. त्यांच्यासाठी शिवसैनिक रस्त्यावर उतरुन जाब विचारेल, असा इशारा शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार आणि शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिला. या मठाच्या अदृष्य काडसिध्देश्वर महाराजांनीही मठाच्या आडून राजकीय पक्षाचे काम करू नये, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

कणेरी मठाच्या काडसिध्देश्वर महाराजांच्या माध्यमातून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरात मठावर पाच कोटी रुपये खर्चून कर्नाटक भवन बांधण्याची घोषणा केली. शिवसेनेने या घोषणेला विरोध केला असून, पत्रकार परिषदेत काडसिध्देश्वर महाराजांचा आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा निषेध केला. पवार म्हणाले, कर्नाटकने महाराष्ट्रात येऊन मराठी माणसांच्या नाकावर टिच्चून हे दाखवून दिले की, महाराष्ट्राचे सरकार कुचकामी आहे. विधायक काम करायला शिवसेनेचा विरोध नाही; पण धार्मिकतेच्या नावावर राजकारण खपवून घेणार नाही.

मराठी माणसावर वर्षानुवर्षे होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात तसेच सीमाभागासाठी बाळासाहेब ठाकरे, उध्दव ठाकरे आणि शिवसेना अखंडपणे लढत आली आहे. अशावेळी शेजारील राज्य कोल्हापुरात कर्नाटक भवन बांधण्याची घोषणा करत असेल, तर शिवसैनिक जाब विचारतील. उध्दव ठाकरे मुख्यमंत्री होते, तोपर्यंत महाराष्ट्रात पाऊल टाकण्याचे धाडस न करणाऱ्या कर्नाटकने आताच हे धाडस कसे केले, याची शंका येते.

रविकिरण इंगवले यांनी कणेरीच्या काडसिध्देश्वर महाराजांना एका विशिष्ट पक्षाच्या आडून राजकारण करू नका, असा इशारा दिला. कोणत्याआधारे कर्नाटक भवन बांधणार, याचा जाब आम्ही प्रत्यक्ष महाराजांना भेटून विचारणार असल्याचे इंगवले यांनी सांगितले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीही कर्नाटकात महाराष्ट्र भवन बांधून दाखवावे, तोपर्यंत कर्नाटक भवन स्थापन करू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. शिवजयंती उत्सव नाकारणारा, कन्नड भाषेची सक्ती करणारे, बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्यांचे दहन करणारे कानडी महाराष्ट्रात कशाला येतात, असाही सवाल त्यांनी केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरKarnatakकर्नाटकChief Ministerमुख्यमंत्रीShiv Senaशिवसेना