कोल्हापुरात ‘झिरो पेंडन्सी’च्या ताणामुळे कर्मचाºयाचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 18:46 IST2017-07-30T18:42:32+5:302017-07-30T18:46:31+5:30

कोल्हापूर : कामाच्या अतिताणामुळे जिल्ह्यातील करवीर पंचायत समितीच्या आरोग्य विभागातील कनिष्ठ सहायक बाळकृष्ण गुरव (वय ४६) यांनी विषारी औषध प्राशन केल्यानंतर नदीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला. यानंतर संतप्त झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या कर्मचाºयांनी हा प्रकार केवळ ‘झिरो पेंडन्सी’ कामाच्या अतिरेकामुळे झाल्याचा आरोप करून, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकाºयांचाही निषेध केला आहे.

kaolahaapauraata-jhairao-paendanasaicayaa-taanaamaulae-karamacaaoyaacaa-atamahatayaecaa-parayatana | कोल्हापुरात ‘झिरो पेंडन्सी’च्या ताणामुळे कर्मचाºयाचा आत्महत्येचा प्रयत्न

कोल्हापुरात ‘झिरो पेंडन्सी’च्या ताणामुळे कर्मचाºयाचा आत्महत्येचा प्रयत्न

ठळक मुद्देप्रकृती गंभीर : कर्मचाºयांचा ‘काम बंद’चा इशारा,विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकाºयांचा निषेध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

कोल्हापूर : कामाच्या अतिताणामुळे जिल्ह्यातील करवीर पंचायत समितीच्या आरोग्य विभागातील कनिष्ठ सहायक बाळकृष्ण गुरव (वय ४६) यांनी विषारी औषध प्राशन केल्यानंतर नदीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला. यानंतर संतप्त झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या कर्मचाºयांनी हा प्रकार केवळ ‘झिरो पेंडन्सी’ कामाच्या अतिरेकामुळे झाल्याचा आरोप करून, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकाºयांचाही निषेध केला आहे.


‘झिरो पेंन्डसी’साठी आज, सोमवार ही अखेरची मुदत आहे. त्यासाठी गेले काही दिवस जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने कर्मचाºयांना रविवारची सुटीही दिली नाही. अशातच चार दिवसांपूर्वी या कामाच्या पाहणीसाठी पुण्याहून आलेले सहायक आयुक्त विलास जाधव यांच्या पाहणीनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी एका कर्मचाºयाला निलंबित केले, तर एकाला ‘कारणे दाखवा’ नोटीस काढली.


गुरव हे दोन दिवस तणावाखालीच होते. हे काम आपल्याला झेपत नसल्याचे ते सहकाºयांना सांगत होते. मात्र ‘आपण सर्वजण मिळून तुमचे काम करू,’ असे सांगून इतरांनी त्यांची समजूत काढली. रविवारी सकाळी गुरव हे घरातून साडेनऊ वाजता बाहेर पडले. त्यांनी बाचणी येथील छोट्या पुलाजवळ मोटारसायकल लावली आणि ‘ग्रामोझोन’ या तणनाशकाचे प्राशन केले. ते पिऊन त्यांनी तुळशी नदीत उडी घेतली. तेथील शेतकºयांनी हा प्रकार पाहून त्यांना तातडीने नदीतून बाहेर काढून कोल्हापुरातील शासकीय आणि नंतर खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर बनली होती.


ही बातमी समजताच जिल्हा परिषदेच्या कर्मचाºयांच्या विविध संघटनांचे पदाधिकारी, कर्मचारी करवीर पंचायत समितीमध्ये एकत्र आले. यावेळी सर्वांनी ‘झिरो पेंडन्सी’ उपक्रमावर सडकून टीका केली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, गटविकास अधिकारी सचिन घाडगे यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत त्यांनी ‘काम बंद’चे आंदोलन जाहीर केले.

केवळ प्रसिद्धीसाठी हा उपक्रम


जिल्हा परिषदेचे दैनंदिन काम बंद ठेवून गेल्या अनेक वर्षांपूर्वीचे रेकॉर्ड काढण्याचा हा उपक्रम केवळ प्रसिद्धीसाठी असल्याचा आरोप कर्मचाºयांनी यावेळी केला. आम्ही फाईल्स बनवून दिल्यानंतर आठ-पंधरा दिवस हे अधिकारी त्यांवर सह्या करीत नाहीत; त्यांच्यावर निलंबनाची कारवाई कोण करणार, असा सवाल यावेळी कर्मचाºयांनी उपस्थित केला.

 

Web Title: kaolahaapauraata-jhairao-paendanasaicayaa-taanaamaulae-karamacaaoyaacaa-atamahatayaecaa-parayatana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.