शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

गगनबावड्यातील निसर्ग संपदेला वृक्षतोडीचा शाप विकासाच्या नावाखाली कत्तल : पर्यावरण समतोल ढासळतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 00:23 IST

साळवण : निसर्गसंपन्न गगनबावडा तालुक्यातील निसर्ग संपदेला विकासाच्या नावाखाली वृक्षतोडीचा शाप लागला असून अनेक जैवविविधतेने संपन्न असणारी ठिकाणे एकतर नष्ट झाली आहेत अथवा नष्ट होण्याच्या मार्गावर

साळवण : निसर्गसंपन्न गगनबावडा तालुक्यातील निसर्ग संपदेला विकासाच्या नावाखाली वृक्षतोडीचा शाप लागला असून अनेक जैवविविधतेने संपन्न असणारी ठिकाणे एकतर नष्ट झाली आहेत अथवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. पर्यावरण ºहासामुळे निसर्गातील अनेक अन्नसाखळीतील दुवे निखळल्यामुळे अनेक अन्नसाखळ्या कमकुवत होऊन मौल्यवान वनस्पती व प्राणी नष्ट होऊन पर्यावरण ढासळत चालले आहे. तर जंगलतोड करून सपाटीकाण केल्यामुळे मुळचे जंगलातील पाणवठेच नष्ट झाल्याने वन्यप्राण्यांनी पाण्यासाठी आपला मोर्चा नागरी वस्तीकडे वळवला आहे.

एकीकडे शतकोटी वृक्ष लागवट , झाडे लावा झाडे जगवा, पर्यावरण वाचवा जीवन वाचवा, जल आहे तर कल आहे. अशा अनेकविध कार्यक्रमांवर सरकार कोट्यवधी रुपये खर्च करते आहे. तर दुसरीकडे घनदाट जंगलावर बेदरकारपणे कुºहाड चालवत हजारो वर्षांपासून सळसळणारे जंगल विकासाच्या नावाखाली सपाट करून डोंगरच्या डोंगर उघडे-बोडके केले जात आहेत. गगनबावडा तालुका राजरोसपणे पूर्वेकडून पश्चिमेकडे सपाट आणि उघडा बोडका होऊन रूक्ष होत चालला आहे.

तालुक्यात तामजाई, वळताई, कोदे, बोरबेट, अणदूर, गगनबावडा, पळसंबे अशी अनेक दुर्मीळ वनसंपदेने संपन्न व घनदाट झाडीने नटलेली ठीकाणे आहेत; पण, याकडे गर्भश्रीमंतांची नजर वळली आहे. तामजाईसारख्या घनदाट जंगलाच्या पठारावर शेकडो एकराचे सपाटीकरण करून कोट्यवधी रूपयांची जंगल संपत्ती डोळ्यादेखत नष्ट होताना वन खाते काय करते आहे. सामान्य शेतकऱ्याला आपल्या बांधावरचे एक झाड तोडताना नियम सांगणारे वन खाते अशा सपाटीकरणावेळी नियमात अर्थकारण शोधते काय ? असा प्रश्न सर्वसामान्य माणसांना पडला आहे. असे सपाटीकरण तालुक्याच्या अन्य भागातही मोठ्या प्रमाणात होत आहे.

तालुक्या बाहेरुन आलेल्यांनी कवडीमोल किमतीने सर्व सामान्यांच्या जमिनी घेऊन मालकी हक्क प्रस्तापित केला व संह्यांद्रिच्या संवेदनशील पर्वत रांगांत हजारो वर्षांच्या जंगलावर अमानुषपणे कुºहाड चालवायला सुरुवात केली आहे. आधुनिक शेतीच्या नावाखाली शेकडो एकर जमिनीचे सपाटीकरण होत असताना त्याला विरोध न करता आपण मात्र ‘पर्यावरण वाचवा देश वाचवा’ अशा घोषणा देत ५ जून हा ‘जागतिक पर्यावरण दिन’ही प्रत्येक वर्षाला मोठ्या उत्साहात साजरा करतो. शतकोटी वृक्षयोजना राबवतो. याचा काय फायदा ? तालुक्यातील जंगल क्षेत्र मात्र वाढण्याऐवजी प्रत्येक वर्षाप्रमाणे कमी कमी होत जाते आहे याचे गम्य काय ? कागदोपत्री लाखो वृक्षांची लागवड करून अनुदानात अर्थ शोधण्यापेक्षा दररोज हजारो रूपयांची प्राप्ती असणारी मंडळी वृक्षांची कत्तल करुन अधुनिक शेतीच्या नावाखाली भाजीपाला पिकवत वर्षाला कांही हजार रूपयांसाठी शेती करून काय साध्य करतात हे शोधून यावर प्रकाश टाकला तर वेगळीच माहिती उजेडात येईल. मालकी हक्कातील जंगलावर आधुनिक वनशेती केली तर आर्थिक प्राप्तीबरोबत पर्यावरण संरक्षण होईल.पाणवटे बंदिस्त : प्राणी मानवी वस्तीतमालकी हक्काच्या नावाखाली जमिनी भोवती काटेरी तारेचे कुंपणे केल्याने प्राण्यांचे पाणवटे बंदिस्त झाले आहेत. त्यामुळे त्यांचा मानवी वस्तीत वावर वाढला आहे.वृक्षतोड व जमीन सपाटीकरणामुळे जंगलातील अनेक अन्नसाखळीतीत दुवे निखळले. त्यामुळे अनेक वनस्पती व प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर  जंगल तोडुन आधुनिक शेतीसाठी अनेकांनी केली अनुदानाची उचलगगनबावडा तालुक्यातील तामजाई पठारावरील शेकडो एकर जमिनीवरील वृक्षांची कत्तल करून आधुनिक शेतीच्या नावाखाली सपाटीकरण करण्यात आले आहे.