शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

Kolhapur: काळम्मावाडी धरणात तब्बल सोळा वर्षांनंतर निचांकी पाणीसाठा, गळतीचे काम अपूर्णच; पाऊस लांबल्याने चिंतेचे सावट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 11:57 IST

महाराष्ट्र-कर्नाटक राज्याला वरदायी ठरलेल्या काळम्मावाडी धरणात तब्बल सोळा वर्षांनंतर निचांकी पाणीसाठा

सोळांकूर : महाराष्ट्र-कर्नाटक राज्याला वरदायी ठरलेल्या काळम्मावाडी धरणात तब्बल सोळा वर्षांनंतर निचांकी पाणीसाठा असल्याने व पाऊस लांबल्याने चिंतेचे सावट दिसत आहे. या धरणावर अवलंबून असणाऱ्या पिकांना पाणी मिळत नसल्याने काही ठिकाणी पिके वाळली आहेत तर काहींनी उस पिकाची कापणी सुरू केली आहे. अत्यंत भयानक वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित विभागाने पाण्याचे नियोजन करावे, अशी मागणी होत आहे.आज धरणामध्ये मृतसाठा शिल्लक राहिला आहे. त्यातील ५०० क्युसेस पाणी पिण्यासाठी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. पाणी कमी असल्याने विद्युत जनित्र केंद बंद असून डाव्या व उजव्या कालव्यातील पाणी प्रवाह बंद करण्यात आला आहे. ऊस पिके वाळली असून भात पिकांची दुबार पेरणी करावी लागणार आहे.याचवर्षीप्रमाणे १३ जून २००७ रोजी केवळ असाच मृतसाठा शिल्लक राहिला होता. पाऊस वेळेवर लागल्याने अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली नव्हती. २० जून २०१९ रोजी २.७३ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता . मात्र योग्य नियोजन व पावसाची सुरुवात वेळेत झाल्याने कोणतीही हानी झाली नाही.यावर्षी पाऊस लांबल्याने धरणावर अवलंबून असणारी पिके वाळू लागली आहेत. पाणी वेळेत न मिळाल्याने काही पिके वाळली आहेत. ती पिके शेतकरी कापून जनावरांना घालू लागले आहेत.

मुख्य भिंतीच्या गळतीचे काम अपूर्णच..धरणाच्या मुख्य भिंतीला मोठ्या प्रमाणात गळती आहे. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करून या गळतीला वाचा फोडली होती .यावर्षी काम करण्याच्या उद्देशाने पाठवलेला प्रस्ताव मंजूर न झाल्याने गळती काम अपूर्णच राहणार असे दिसत आहे. यावर्षी गळतीचे काम करण्याची संधी उपलब्ध असताना केवळ निधीअभावी रखडणार असल्याचे चित्र दिसत आहे. पिण्याचे पाणी जपून वापरावे म्हणून गावांमध्ये दवंडी देत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDamधरणWaterपाणी