शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
3
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
4
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
5
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका
6
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
7
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
8
Mumbai Robbery: मोबाईल आणि ब्रँडेड घड्याळांच्या दुकानात दरोडा; चार सराईत गुन्हेगारांना अटक!
9
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
10
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
11
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
12
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
13
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
14
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
15
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
16
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
17
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
18
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
19
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
20
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!

Kolhapur: काळम्मावाडी धरणात तब्बल सोळा वर्षांनंतर निचांकी पाणीसाठा, गळतीचे काम अपूर्णच; पाऊस लांबल्याने चिंतेचे सावट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 11:57 IST

महाराष्ट्र-कर्नाटक राज्याला वरदायी ठरलेल्या काळम्मावाडी धरणात तब्बल सोळा वर्षांनंतर निचांकी पाणीसाठा

सोळांकूर : महाराष्ट्र-कर्नाटक राज्याला वरदायी ठरलेल्या काळम्मावाडी धरणात तब्बल सोळा वर्षांनंतर निचांकी पाणीसाठा असल्याने व पाऊस लांबल्याने चिंतेचे सावट दिसत आहे. या धरणावर अवलंबून असणाऱ्या पिकांना पाणी मिळत नसल्याने काही ठिकाणी पिके वाळली आहेत तर काहींनी उस पिकाची कापणी सुरू केली आहे. अत्यंत भयानक वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित विभागाने पाण्याचे नियोजन करावे, अशी मागणी होत आहे.आज धरणामध्ये मृतसाठा शिल्लक राहिला आहे. त्यातील ५०० क्युसेस पाणी पिण्यासाठी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. पाणी कमी असल्याने विद्युत जनित्र केंद बंद असून डाव्या व उजव्या कालव्यातील पाणी प्रवाह बंद करण्यात आला आहे. ऊस पिके वाळली असून भात पिकांची दुबार पेरणी करावी लागणार आहे.याचवर्षीप्रमाणे १३ जून २००७ रोजी केवळ असाच मृतसाठा शिल्लक राहिला होता. पाऊस वेळेवर लागल्याने अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली नव्हती. २० जून २०१९ रोजी २.७३ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता . मात्र योग्य नियोजन व पावसाची सुरुवात वेळेत झाल्याने कोणतीही हानी झाली नाही.यावर्षी पाऊस लांबल्याने धरणावर अवलंबून असणारी पिके वाळू लागली आहेत. पाणी वेळेत न मिळाल्याने काही पिके वाळली आहेत. ती पिके शेतकरी कापून जनावरांना घालू लागले आहेत.

मुख्य भिंतीच्या गळतीचे काम अपूर्णच..धरणाच्या मुख्य भिंतीला मोठ्या प्रमाणात गळती आहे. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करून या गळतीला वाचा फोडली होती .यावर्षी काम करण्याच्या उद्देशाने पाठवलेला प्रस्ताव मंजूर न झाल्याने गळती काम अपूर्णच राहणार असे दिसत आहे. यावर्षी गळतीचे काम करण्याची संधी उपलब्ध असताना केवळ निधीअभावी रखडणार असल्याचे चित्र दिसत आहे. पिण्याचे पाणी जपून वापरावे म्हणून गावांमध्ये दवंडी देत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDamधरणWaterपाणी