शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

कोल्हापुरातील कळंबा तलाव ओव्हरफ्लो, पर्यटकांची गर्दी उसळली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 12:19 IST

अमर पाटील  कळंबा: दमदार पावसामुळे कळंबा तलावाच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने पाणी सांडव्यावरून ओसंडून वाहायला सुरवात झाली. सोशल मीडियावर याचे ...

अमर पाटील कळंबा: दमदार पावसामुळे कळंबा तलावाच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने पाणी सांडव्यावरून ओसंडून वाहायला सुरवात झाली. सोशल मीडियावर याचे व्हिडिओ आणि फोटो झळकू लागल्याने पर्यटकांनी गर्दी केली. तलावाचे मुख्य जलस्तोत्र असणारे कात्यायनी टेकड्यातुन वाहणारे सातही नैसर्गिक नाले पुर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागल्याने तलावाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. मोठया सांडव्यानजीकच्या लहान सांडव्यातून ही पाण्याचा मोठा विसर्ग वाढला आहे. एकंदरीत जुलैच्या मध्यापर्यंत अवघी चार फुटांवर स्थिरावलेली पाणीपातळी आठवड्याभराच्या मुसळधार पावसामुळे सत्तावीस फुटांवर गेली. तलाव भरल्याने उपनगरे व लगतच्या ग्रामीण जनतेच्या पाण्याची चिंता मिटल्याने ग्रामस्थांसह प्रशासनाकडून समाधान व्यक्त होत आहे. पर्यटकांनी सावधगिरी बाळगावी तलावाच्या मनोऱ्यानजीकचा पदपथ निसरडा झाला असून धोकादायक मनोऱ्याचे लोखंडी संरक्षक कठडे तुटले आहेत. सेल्फी काढण्याच्या नादात अनुचित प्रकार जीवावर बेतण्याची शक्यता असल्याने हौशी पर्यटकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. हौशी पर्यटकांनी ओसंडून वाहणाऱ्या सांडव्यावरून चालत जात वाहत्या पाण्यात पोहणे टाळावे.

तलाव सांडव्यावरून ओसंडून वाहू लागल्यानंतर परिसरात पर्यटकांची गर्दी होते. अशावेळी हुल्लडबाजांचा त्रास पर्यटकांना सहन करावा लागतो. त्यामुळे पोलिसांनी हुल्लडबाजांना पोलिसी खाक्या दाखवण्याची गरज आहे.  - पूनम उत्तम जाधव, ग्रा. प. सदस्या, कळंबा 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊस