शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

शाहूंच्या जयंतीदिनी ‘स्वाभिमानी’ची ‘कैफियत’ पदयात्रा; शक्तिपीठ महामार्ग, शेतकऱ्यांच्या उर्वरित १०० रुपयांची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2024 13:03 IST

'चंद्रकांतदादांनी नुसते बोलू नये, विषय संपवावा'

कोल्हापूर : मागील (२०२२-२३) गळीत हंगामातील एफआरपी सोडून ५० व १०० रुपये देण्याच्या आश्वासनांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विसर पडला असून, शक्तिपीठ महामार्गाच्या आडून शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचे षडयंत्र आखले जात आहे. याविरोधात राजर्षी शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंतीदिनी बुधवारी जनकस्थळ (कागल) ते स्मृतिस्थळ (कोल्हापूर)पर्यंत ‘कैफियत’ पदयात्रा काढणार असल्याची माहीती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.राजू शेट्टी म्हणाले, राजर्षी शाहू महाराज यांच्या दूरदृष्टीमुळेच शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती झाली, त्यांची शतकोत्तर सुवर्ण जयंती मोठ्या धामधुमीत साजरी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबद्दल आम्हाला आनंदच आहे; पण त्यांच्या विचाराने सरकारचे काम सुरू आहे का? मागील गळीत हंगामात साखरेचे दर चांगले राहिल्याने एफआरपी सोडून साखर कारखान्यांकडे जादा पैसे राहिले होते. ते पैसे मिळावेत, यासाठी राष्ट्रीय महामार्ग रोखला होता, त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करत तोडगा काढला होता. ज्या साखर कारखान्यांनी तीन हजार पेक्षा कमी पैसे दिले आहेत, त्यांनी शंभर तर तीन हजार पेक्षा जास्त दिलेल्या कारखान्यांनी ५० रुपये शेतकऱ्यांना देण्याचे ठरले होते. अनेक कारखान्यांनी साखर आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवले आहेत, सरकारकडून त्याला मान्यता दिली जात नाही. त्याचबरोबर कोणाचीही मागणी नसताना शक्तिपीठ महामार्गाचे घाट घातला जात आहे. एकीकडे शेतकऱ्यांना चिरडायचे आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी शेतकऱ्यांना उभे करण्याचे काम केले, त्या राजर्षी शाहू महाराजांची जयंती मोठ्या दिमाखात साजरी केली जात आहे.

सरकारची संवेदनशीलता संपली असून, त्याला जाग आणण्यासाठी कागल ते कोल्हापूर ‘कैफियत पदयात्रा’ काढणार आहे. ‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, जनार्दन पाटील, वैभव कांबळे आदी उपस्थित होते.शेतकऱ्यांची दीडशे मुले सहभागी होणारबुधवारी सकाळी आठ वाजता राजर्षी शाहू महाराज यांच्या कागल येथील जन्मस्थळाला अभिवादन करून कैफियत पदयात्रेला सुरुवात होणार आहे. दुपारपर्यंत कोल्हापुरात येणार असून, यामध्ये शेतकऱ्यांची दीडशे मुले सहभागी होणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

दादांनी नुसते बोलू नये, विषय संपवावाशक्तिपीठाचा प्रश्न संपवल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील सांगत आहेत. त्यांनी नुसते बोलू नये. महामार्ग रद्द करून तो विषय संपवावा, असा टोला शेट्टी यांनी हाणला.

पदयात्रेने काहीतरी पदरात पडतेचयापूर्वी पंढरपूरला विठ्ठलाला साकडे घालून बारामतीपर्यंत यासह अनेक पदयात्रा काढल्या त्या त्यावेळी शेतकऱ्यांच्या पदरात काहीतरी पडले आहे. प्रामाणिकपणे प्रयत्न केला तर निश्चित यश मिळते, याही वेळेला काहीना काही पदरात पडेल, असा विश्वास शेट्टी यांनी व्यक्त केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टीShahu Maharaj Jayantiशाहू महाराज जयंतीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना