शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
2
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
3
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
4
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
5
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...
6
'द फॅमिली मॅन' सीझन ३ 'या' तारखेला होणार प्रदर्शित; 'नोव्हेंबर'मध्ये थरार पाहण्यासाठी सज्ज व्हा!
7
Yogi Adityanath: आता यूपीतील लोकांना उपचारांसाठी दिल्लीला जाण्याची गरज नाही: योगी आदित्यनाथ 
8
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
9
२०२५ मध्ये तिसऱ्यांदा डिविडेंड देणार 'ही' डिफेन्स कंपनी, एका शेअरवर ६ रुपयांचा फायदा; पटापट चेक करा डिटेल्स
10
लाडकी बहीण योजनेसाठी सरकार किती निधी देते? ‘इतके’ कोटी होतात खर्च, आकडा पाहून व्हाल अवाक्
11
तुम्ही देखील सोने-चांदी खरेदी करुन घरात ठेवलंय? CA नितीन कौशिक म्हणतात ही गुंतवणूक नाही तर...
12
राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका पडणार लांबणीवर? समोर येतंय असं कारण 
13
Suryakumar Yadav: श्रेयसच्या दुखापतीची बातमी मिळताच सूर्याचा फिजिओला फोन, आता कशी आहे त्याची तब्येत?
14
"पुन्हा मलाच...", तिसरी वेळ राष्ट्राध्यक्ष बनण्याची इच्छा; स्वतःचं कौतुक करत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...
15
प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात
16
"पुढच्या दीड वर्षात सिनेमा बंद होईल...", महेश मांजरेकरांनी केलं भाकीत; असं का म्हणाले?
17
समस्त ओला ईलेक्ट्रीक स्कूटर मालकांसाठी महत्वाची बातमी! तुमचे तुम्हीच स्पेअर पार्ट घ्या, मेकॅनिककडून दुरुस्त करा...
18
२५ देशामध्ये अफाट संपत्ती, मॉलचेही आहेत मालक; 'हे' आहेत UAE चे सर्वात श्रीमंत भारतीय, ५० हजार कोटींपेक्षा अधिक नेटवर्थ
19
मंदीच्या काळातही ‘या’ 8 क्षेत्रांत कर्मचारी कपातीचा धोका नाही, भविष्यात मोठी संधी; जाणून घ्या...
20
VIRAL : महिला प्रवासी रिक्षात विसरली इयरफोन; वस्तू परत करण्यासाठी रिक्षा चालकाने लढवली 'अशी' शक्कल! होतंय कौतुक

शाहूंच्या जयंतीदिनी ‘स्वाभिमानी’ची ‘कैफियत’ पदयात्रा; शक्तिपीठ महामार्ग, शेतकऱ्यांच्या उर्वरित १०० रुपयांची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2024 13:03 IST

'चंद्रकांतदादांनी नुसते बोलू नये, विषय संपवावा'

कोल्हापूर : मागील (२०२२-२३) गळीत हंगामातील एफआरपी सोडून ५० व १०० रुपये देण्याच्या आश्वासनांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विसर पडला असून, शक्तिपीठ महामार्गाच्या आडून शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचे षडयंत्र आखले जात आहे. याविरोधात राजर्षी शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंतीदिनी बुधवारी जनकस्थळ (कागल) ते स्मृतिस्थळ (कोल्हापूर)पर्यंत ‘कैफियत’ पदयात्रा काढणार असल्याची माहीती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.राजू शेट्टी म्हणाले, राजर्षी शाहू महाराज यांच्या दूरदृष्टीमुळेच शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती झाली, त्यांची शतकोत्तर सुवर्ण जयंती मोठ्या धामधुमीत साजरी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबद्दल आम्हाला आनंदच आहे; पण त्यांच्या विचाराने सरकारचे काम सुरू आहे का? मागील गळीत हंगामात साखरेचे दर चांगले राहिल्याने एफआरपी सोडून साखर कारखान्यांकडे जादा पैसे राहिले होते. ते पैसे मिळावेत, यासाठी राष्ट्रीय महामार्ग रोखला होता, त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करत तोडगा काढला होता. ज्या साखर कारखान्यांनी तीन हजार पेक्षा कमी पैसे दिले आहेत, त्यांनी शंभर तर तीन हजार पेक्षा जास्त दिलेल्या कारखान्यांनी ५० रुपये शेतकऱ्यांना देण्याचे ठरले होते. अनेक कारखान्यांनी साखर आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवले आहेत, सरकारकडून त्याला मान्यता दिली जात नाही. त्याचबरोबर कोणाचीही मागणी नसताना शक्तिपीठ महामार्गाचे घाट घातला जात आहे. एकीकडे शेतकऱ्यांना चिरडायचे आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी शेतकऱ्यांना उभे करण्याचे काम केले, त्या राजर्षी शाहू महाराजांची जयंती मोठ्या दिमाखात साजरी केली जात आहे.

सरकारची संवेदनशीलता संपली असून, त्याला जाग आणण्यासाठी कागल ते कोल्हापूर ‘कैफियत पदयात्रा’ काढणार आहे. ‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, जनार्दन पाटील, वैभव कांबळे आदी उपस्थित होते.शेतकऱ्यांची दीडशे मुले सहभागी होणारबुधवारी सकाळी आठ वाजता राजर्षी शाहू महाराज यांच्या कागल येथील जन्मस्थळाला अभिवादन करून कैफियत पदयात्रेला सुरुवात होणार आहे. दुपारपर्यंत कोल्हापुरात येणार असून, यामध्ये शेतकऱ्यांची दीडशे मुले सहभागी होणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

दादांनी नुसते बोलू नये, विषय संपवावाशक्तिपीठाचा प्रश्न संपवल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील सांगत आहेत. त्यांनी नुसते बोलू नये. महामार्ग रद्द करून तो विषय संपवावा, असा टोला शेट्टी यांनी हाणला.

पदयात्रेने काहीतरी पदरात पडतेचयापूर्वी पंढरपूरला विठ्ठलाला साकडे घालून बारामतीपर्यंत यासह अनेक पदयात्रा काढल्या त्या त्यावेळी शेतकऱ्यांच्या पदरात काहीतरी पडले आहे. प्रामाणिकपणे प्रयत्न केला तर निश्चित यश मिळते, याही वेळेला काहीना काही पदरात पडेल, असा विश्वास शेट्टी यांनी व्यक्त केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टीShahu Maharaj Jayantiशाहू महाराज जयंतीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना