शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

Kolhapur: कागल सीमा नाका ८ दिवसांत कार्यान्वित, अदानी समूहाकडे व्यवस्थापन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 12:04 IST

जे. एस. शेख कागल : गेली सात ते आठ वर्षे सुरू होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या खासगी तत्त्वावरील येथील बहुचर्चित एकात्मिक ...

जे. एस. शेखकागल : गेली सात ते आठ वर्षे सुरू होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या खासगी तत्त्वावरील येथील बहुचर्चित एकात्मिक सीमा तपासणी नाका येत्या आठ ते दहा दिवसांत सुरू करण्यासंदर्भात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. रंगरंगोटी व मार्गदर्शक पट्टे मारले आहेत. लाईट व सिग्नल सुरू केले आहेत. महामार्गावरून जाणारी-येणारी सर्व वाहने या आधुनिक तंत्रज्ञाने सुसज्ज असलेल्या नाक्यातून तपासणी होऊनच पुढे जाणार आहेत.सुरुवातीला गुजरातमधील सदभाव कंपनीकडे हा नाका उभारणी करण्याचे काम होते. नाका उभारणी पूर्ण होता होता सद्भावकडून हा नाका अदानी समूहाने आपल्याकडे घेतला. त्यानंतर तो सुरू करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली असतानाच बांधकामाचे पैसे थकबाकी असल्याच्या कारणावरून एका कंपनीने न्यायालयात धाव घेतली व जोपर्यंत आपले पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत हा नाका सुरू करण्यास परवानगी देऊ नये अशी न्यायालयाला विनंती केली होती. त्यामुळे गेली तीन वर्षे हा नाका न्यायालयीन प्रक्रियेत अडकला होता.विधानसभा निवडणुकीच्या आधी एक महिना हा न्यायालयीन तिढा सुटला आणि चेक पोस्ट सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र, चेक पोस्ट सुरू केल्यानंतर वाहनधारकांच्या मध्ये नाराजी निर्माण होईल तसेच स्थानिक पातळीवरही रोष निर्माण झाला तर त्याचा निवडणुकीवर परिणाम होईल म्हणून तो सुरू करण्यात आला नव्हता असे समजते.विविध कारणांवरून झाला विरोधया नाक्यासाठी जमीन संपादन करण्यापासून संघर्ष सुरू आहे. यासाठी दहा ते बारा वर्षांचा कालावधी लोटला आहे. येथे उभारण्यात आलेले दुकानगाळे तसेच कर्मचारी घेण्यावरूनही स्थानिक लोक आणि कंपनीमध्ये वाद निर्माण झाला होता. नंतर नाका सुरू करण्याच्यावेळी जिल्ह्यातील मालवाहतूक ट्रकचालक मालक संघटनेने या ठिकाणी मोठे आंदोलन करून हा नाका सुरू करण्यास विरोध दर्शविला होता.

असा आहे तपासणी नाका

  • महामार्गाच्या दोन्ही बाजूस मिळून ५२ एकर जमीन यासाठी संपादित करण्यात आली आहे. दोन्ही बाजूला प्रत्येकी १० लेन असून ०७ मोठ्या वाहनांसाठी ०३ लहान वाहनांसाठी आहेत.
  • यामधून मालवाहतूक व इतर वाहने जाणार आहेत. त्यावेळी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वजन व वाहन तपासणीसह मालवाहतुकीचे अन्य नियम तपासले जातील. दुचाकी व बैलगाडीसुद्धा यातूनच घेण्याची आहे. त्यामुळे महामार्गावरून कागलकडे येताना आणि निपाणीकडे जाताना प्रत्येक वाहनाला येथे वळावे लागणार आहे. मात्र, मालवाहतूक वाहने वगळता इतर वाहनांवर कोणता कर आकारला जाणार नाही.
  • आरटीओ (परिवहन) तपासणीबरोबरच राज्य उत्पादन शुल्क व जीएसटी या तपासण्याही या एकाच नाक्यावर होणार आहेत. खाजगी कंपनी हा नाका चालवेल आणि शासनाचे अधिकारी त्यावर नियंत्रण ठेवतील.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरAdaniअदानी