शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

‘कडकनाथ' फसवणूकप्रकरणी मतदानावर बहिष्काराचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 6:46 PM

सांगली जिल्ह्यातील महारयत अ‍ॅग्रो इंडिया प्रा. लि. कंपनीकडून हजारो शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे; त्यामुळे शेतकऱ्यांनी न्यायासाठी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.

ठळक मुद्दे कोल्हापूर जिल्हा कडकनाथ कोंबडी पालक संघर्ष समिती न्याय मिळत नसल्याने सामूहिक आत्महत्येचीही मागितली परवानगी

कोल्हापूर : सांगली जिल्ह्यातील महारयत अ‍ॅग्रो इंडिया प्रा. लि. कंपनीकडून हजारो शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे; त्यामुळे शेतकऱ्यांनी न्यायासाठी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. तसेच न्याय मिळाला नाही, तर सामूहिक आत्महत्या करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी कडकनाथ कोंबडी पालक संघर्ष समितीतर्फे सोमवारी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.निवेदनात म्हटले आहे की, कंपनी चालकांवर कारवाई करण्यास टाळाटाळ होत आहे; त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास दोन हजार कुटुंबांच्या वतीने २५ आॅक्टोबरपासून बेमुदत ठिय्या आंदोलनाचा इशाराही दिला आहे. तसेच न्याय मिळाला नाही तर राज्यपाल यांनी सामूहिक आत्महत्या करण्याची मागणीही शिष्टमंडळाने केली आहे. याचबरोबर कंपनीच्या लोकांनी कागदपत्रांमध्ये फेरफार, अंडी व खाद्य खरेदी-विक्रीतून अपहार केला आहे; त्यामुळे त्यांना लवकर अटक करण्यात यावी.शिष्ठमंडळामध्ये कॉ. दिग्विजय पाटील, विजय आमते, जिशान गोलंदाज, संदीप पाटील, उदय पाटील, बबन मुल्लानी, सागर दिंडे, अशोक नायकवडी, जीवन कांबळे, आनंदा खोत, बाळकृष्ण शिरसटे, आदी सहभागी होते.‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांना हद्दपारीच्या नोटिसा निषेधार्हस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष महेश खराडे व वाळवा तालुकाध्यक्ष भागवत जाधव यांना पोलीस प्रशासनाने चार जिल्ह्यांतून हद्दपारीची नोटीस बजावली आहे. त्याचा कोल्हापूर जिल्हा कडकनाथ कोंबडी पालक संघर्ष समितीतर्फे निषेध करण्यात आला.

 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर