शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
2
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
3
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा
4
अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत
5
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
6
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
7
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
8
८४ वर्षांपूर्वी दोन भावांनी McDonald'sची केलेली सुरुवात; आज ११९ देशांत ४२००० पेक्षा अधिक आऊटलेस्ट
9
सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी
10
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का
11
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
12
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
13
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
14
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
15
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
16
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
17
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
18
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
19
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
20
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'

एकमेकांची जिरवताना दोघांचीही जिरली : आवाडे-आवळे मनोमिलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2018 12:59 AM

हातकणंगले : काँग्रेसमध्ये एकमेकांची जिरवायच्या नादात दोघांचीही चांगलीच जिरली, अशी कबुली माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी शनिवारी चोकाक (ता. हातकणंगले) येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात दिली. त्यांनी माजी मंत्री जयवंतराव आवळे यांचा मुलगा राजूबाबा आवळे याला हातकणंगले मतदारसंघातून आमदार करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली. या मेळाव्यात ज्येष्ठ नेते कल्लाप्पाण्णा ...

ठळक मुद्देप्रकाश आवाडे यांची कबुली ; राजू आवळे यांना आमदार करणार

हातकणंगले : काँग्रेसमध्ये एकमेकांची जिरवायच्या नादात दोघांचीही चांगलीच जिरली, अशी कबुली माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी शनिवारी चोकाक (ता. हातकणंगले) येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात दिली. त्यांनी माजी मंत्री जयवंतराव आवळे यांचा मुलगा राजूबाबा आवळे याला हातकणंगले मतदारसंघातून आमदार करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली. या मेळाव्यात ज्येष्ठ नेते कल्लाप्पाण्णा आवाडे व माजी मंत्री जयवंतराव आवळे यांनी एकमेकांना आलिंगन दिले व यापुढे मतभेद गाडून एकत्रित वाटचाल करण्याचे जाहीर केले. मेळाव्याला उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी यावेळी टाळ्यांचा कडकडाट करून या मनोमिलनाला पाठबळ दिले.प्रकाश आवाडे यांनी आपल्या भाषणाचीच सुरुवात राजूबाबा हा उद्याचा आमदार असल्याचे सांगून केली. ते म्हणाले, ‘आवाडे व आवळे गट आता एकदिलाने एकत्र आला आहे, ही तात्पुरती मलमपट्टी नाही. काँग्रेस दुरुस्त व्हायची असेल तर अगोदर नेत्यांतील भांडणे मिटली पाहिजेत, असा आग्रह प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी धरला होता. त्यानुसार कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी पुढाकार घेऊन त्याची सुरुवात केली. कोल्हापुरातील काँग्रेस कमिटीच्या शेजारील हॉल बांधकामाच्या कार्यक्रमात त्यांनी हा विचार बोलून दाखविला व त्यानुसार आम्ही एकसंधपणे पुढे जायचे ठरविले. कोल्हापूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे; त्यामुळे एकेकाळी एकट्या इचलकरंजी लोकसभा मतदारसंघातील सहाही मतदारसंघांत काँग्रेसचे आमदार होते; परंतु त्यानंतर आम्ही मंडळीच एकमेकांची जिरवायच्या नादाला लागलो व त्यात आमचीच जिरली. त्यासाठी विरोधकांची गरजच उरली नाही; परंतु आता हे आम्हांला उमगले आहे. लोकांचाही रेटा आहे.’आवाडे म्हणाले, ‘आवाडे-आवळे गट एकत्र आले तर इचलकरंजीसह शिरोळ, हातकणंगले या तिन्ही मतदारसंघांत काँग्रेस मजबूत होते; कारण नुसता एक खडा पाण्यात टाकल्यावर जसे वलय उमटते,तसेच या तिन्ही मतदारसंघांचे राजकारण आहे. पूर्वीच्या इचलकरंजी मतदारसंघातील १३ गावांनी उचलून घेतले तर राजूबाबांची गाडी विधानसभेला जाण्यात अडचण नाही. राजूबाबा असेल किंवा गणपतराव पाटील; हे काय आमच्यासाठी वेगळे नाहीत.’आवाडे व आवळे यांची गळाभेट ही काँग्रेसची मोठी उपलब्धी असल्याचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी सांगितले. तुम्ही जो उमेदवार सुचवाल तोच आमचा उमेदवार असेल, असे चव्हाण यांनी सांगितले.जयवंतराव आवळे म्हणाले, ‘काँग्रेसवर मनापासून प्रेम करणारा हा मतदारसंघ आहे; परंतु दुहीमुळे आमचा पराभव झाला. मी व आवाडे गेल्या पंधरा वर्षांत कधीही एका व्यासपीठावर आलो नव्हतो; परंतु आज आवाडे-आवळे एकत्र आले आहेत. जे झालं ते गंगेला मिळालं. आता यापुढे हातात हात घालून पुढे जाऊ या.’हातकणंगले लोकसभाही घ्याआमदार सतेज पाटील यांनी शुक्रवारी (दि. ३१) कोल्हापूर लोकसभेची जागा काँग्रेसची असल्याचा दावा केला.हातकणंगलेची जागा तर गेल्या निवडणुकीत आम्हीच लढवली आहे. त्यामुळे मित्रपक्षांसोबत आघाडी झाली तर हा प्रश्नयेणार नाही; परंतु ती नाही झाली तर हा मतदारसंघही काँग्रेसला मिळावा, अशी मागणी प्रकाश आवाडे यांनी केली.शिरोलीतून सुरुवात ही नांदीकाँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेची सुरुवात शिरोलीत झालेल्या जंगी स्वागताने झाली, याचा वेगळाच आनंद असल्याची प्रतिक्रिया सतेज पाटील यांनी व्यक्त केली. जिल्हा परिषद निवडणुकीत मला जे जमले नाही ते आता यशस्वी झाले.फेव्हीक्विक एकजूटआवाडे व आवळे यांची एकजूट ही चिकटपट्टीची नाही, तर ती फे व्हीक्विकसारखी मजबूत असल्याने आता तुटणार नाही, असे आमदार सतेज पाटील यांनी सांगताच हशा पिकला.सहा आमदारकोल्हापुरात सध्या काँग्रेसचा एकही आमदार नाही; परंतु नेत्यांनी मतभेद गाडून टाकले तर दहापैकी किमान सहा आमदार काँग्रेसचे होण्यात अडचण नसल्याचे प्रकाश आवाडे यांनी सांगितले.गेल्या पंधरा वर्षांत प्रथमच आवाडे-आवळे एकाच व्यासपीठावर‘आवाडे-आवळे गट एकत्र आले तर इचलकरंजीसह शिरोळ, हातकणंगले या तिन्ही मतदारसंघांत काँग्रेस मजबूततुम्ही जो उमेदवार सुचवालतोच आमचा उमेदवार असेल,अशी अशोक चव्हाण यांचीग्वाही. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारण