शाळेत जाण्याचा ‘प्रवास’ झाला सुखद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:25 IST2021-02-16T04:25:18+5:302021-02-16T04:25:18+5:30
कोल्हापूर : कागल येथील नवोदय विद्यालयातील सन १९९९, २००० बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी अनोखा उपक्रम राबविताना कुरुंदवाड येथील विमलादेवी खंडेराव ...

शाळेत जाण्याचा ‘प्रवास’ झाला सुखद
कोल्हापूर : कागल येथील नवोदय विद्यालयातील सन १९९९, २००० बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी अनोखा उपक्रम राबविताना कुरुंदवाड येथील विमलादेवी खंडेराव माने कन्या शाळेतील मुलींना २५ सायकल भेट दिल्या. यामुळे ग्रामीण भागातून शाळेत येणाऱ्या या मुलींची पायपीट आता वाचणार आहे. या उपक्रमासाठी माजी विद्यार्थ्यांनी १ लाख ३२ हजार ५०० रुपये संकलित केले. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
जिल्ह्यात आजही काही खेडी अशी आहेत की, तेथील विद्यार्थ्यांना थंडी, पावसाची तमा न बाळगता शाळेत येण्यासाठी ५ ते १० किलोमीटर पायपीट करावी लागते. अशा विद्यार्थ्यांना काहीतरी मदत करण्याचा निर्णय कागल येथील नवोदय विद्यालयातील १९९९, २००० बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी घेतला. त्यांनी व निसर्ग सायकल मित्रपरिवाराच्यावतीने डॉ. सचिन कामत यांच्या स्मरणार्थ कुरुंदवाड येथील विमलादेवी खंडेराव माने कन्या शाळेतील २५ मुलींना सायकल भेट दिल्या. यानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मसणू कामत तर प्रमुख पाहुणे म्हणून सुनील पाटील (निसर्ग सायकल मित्र) होते. ओंकार बोंगे, जयश्री जोशी, सी. व्ही. रमण, शिक्षण प्रसारक मंडळ, कुरुंदवाडचे अध्यक्ष पराडकर यांची प्रमुख उपस्थित होती. नवोदय विद्यालयाचे माजी विद्यार्थी राहुल वडिंगेकर, विलास जमदाडे, रवींद्र आडके, तुषार कोरवी, विक्रांत पाटील, किरण देशपांडे, स्वप्नील घाटगे, हर्षद कांबळे, विकास कांबळे, राधिका शिंदे, मनिषा वारके, कृष्णकांत पाटील यावेळी उपस्थित होते.
फोटो : १४०२२०२१ कोल सायकल भेट न्यूज
ओळी : कागल येथील नवोदय विद्यालयातील १९९९, २००० बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी कुरुंदवाड येथील विमलादेवी खंडेराव माने कन्या शाळेतील मुलींना २५ सायकल भेट दिल्या.