शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
3
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला पूर्ण; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
4
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
5
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
6
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
7
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
8
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
9
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
10
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
11
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
12
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
13
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
14
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
15
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
16
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
17
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
18
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
19
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
20
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
Daily Top 2Weekly Top 5

जयसिंगपुरात वाहतुकीची कोंडी

By admin | Updated: December 5, 2014 23:36 IST

दुपदरीकरणाचा प्रश्न ‘जैसे थै’च : जयसिंगपूर नगरपालिका, पोलीस लक्ष देणार का ?

संदीप बावचे - जयसिंगपूर -कोल्हापूर-सांगली रस्त्याच्या कामातील वारंवार होणारी दिरंगाई, त्यातच जयसिंगपूर शहरातून जाणाऱ्या दुपदरीकरण रस्त्याचे रखडलेले काम यामुळे शहरातील वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न नित्याचाच बनला आहे. वाहतुकीबाबत पोलीस यंत्रणाही अपयशी ठरली असून, लोकप्रतिनिधींनी आता या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजे आहे. बांधा-वापरा-हस्तांतरीत करा या तत्त्वांवर सांगली - कोल्हापूर राज्यमार्गाचे चौपदरीकरण करण्याचा निर्णय शासनाने घोषित केल्यानंतर रस्त्यामुळे जयसिंगपुरातील शेकडो कुटुंबांचे नुकसान होण्याबरोबरच छोटे व्यवसाय बंद पडण्याची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली होती. २६ वर्षांहून अधिक काळ भरावा लागणारा कर, शिवाय या रस्त्यांमुळे जयसिंगपूर शहराचे दोन भाग पडणार असल्याने विविध पक्ष, संघटना, कृती समितीसह शहरवासीयांचा विरोध झाला. दरम्यान, जयसिंगपुरातून दुपदरी व तमदलगे बायपास मार्गे दुपदरीचा प्रस्ताव शासनाने मंजूर केला आहे. तमदलगे मार्गे चौपदरीकरण करण्याचाही प्रस्ताव पुढे आला आहे. शहरातून जाणारा उड्डाण पूल रद्द करण्याची मागणीही विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली होती. त्याला पर्याय म्हणून बसवाण खिंड ते अंकली टोल नाक्यापर्यंत आणि चौंडेश्वरी सूतगिरणी ते कुलकर्णी पॉवर टूल्स उदगाव या मार्गाचे दुपदरीकरण करण्याचे सूचविण्यात आले होते. शहरातील उड्डाणपुलाचा प्रश्नही बारगळला आहे. जून २०१२ मध्ये सांगली-कोल्हापूर चौपदरीकरणाच्या कामाला सुरूवात झाली. वाढलेली वाहनांची बेसुमार संख्या, अरूंद मार्ग, अपघातांचे प्रमाण अशा समस्यांच्या फेऱ्यात हा महामार्ग सापडला असताना या-ना त्या कारणाने ठप्प असणाऱ्या कामामुळे मार्गाची अवस्था दयनीय बनली आहे. मार्ग पूर्णत: गैरसोयीचा बनल्याने अनेक लहान-मोठे अपघात होऊन अनेकांचे बळी गेले आहेत. मुख्य रस्त्याची अशी अवस्था बनली असताना जयसिंगपुरातील दुपदरीकरण रस्त्याचा प्रश्न ‘जैसे थै’च आहे. शहरातून अवजड वाहने बाहेरून जावी, तसेच रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी चौंडेश्वरी फाट्यावरून शिरोळ बायपास मार्गे उदगाव हा रस्ता यापूर्वी करण्यात आला. मात्र, जयसिंगपूर शहरातून अवजड वाहनांना प्रवेश बंदी असताना आज शहरातून बेमालूपणे अवघड वाहनांची ये-जा सुरूच आहे. झेले चित्रमंदिर, बसस्थानक, शिरोळवाडी रस्ता, क्रांती चौक, नांदणी रस्ता, शहा पेट्रोलपंप या ठिकाणी जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतो. सांगली-कोल्हापूर मार्गावरील जनतारा हायस्कूल ते झेले पेट्रोलपंपापर्यंत वाहतुकीला अडथळा येणारी अतिक्रमने काढणे गरजेचे आहे.पुढाकाराची गरजचौंडेश्वरी फाटा व उदगाव येथे वाहतूक पोलीस नेमून अवजड वाहनांना मज्जाव करण्यासाठी जयसिंगपूर पोलिसांकडून सातत्य न राहिल्यामुळे अवजड वाहनांची पुन्हा येरे माझ्या मागल्याप्रमाणे वाहतूक सुरूच आहे. सध्या कारखाने सुरू असल्याने ऊस वाहतुकीची वाहने रेल्वे स्टेशन रोडने उदगावमार्गे बायपासने शिरोळला जाण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्याबाबत पोलीस यंत्रणाही अपयशी ठरली आहे.उपाय योजनाएस.टी.बसच्या सुमारे सतराशे फेऱ्या जयसिंगपुरातून होतात, शिवाय अन्य वाहनांच्या गर्दीमुळे शहरातील क्रांती चौक म्हणून असणाऱ्या या चौकातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी याठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नियुक्ती होणे गरजेचे आहे. वाहतुकीच्या दृष्टिकोणातून ज्या उपाययोजना नगरपालिका प्रशासन व पोलिसांनी करणे गरजेचे आहे. नित्याच्याच वाहतूक कोंडीमुळे हा चौक गुदमरून गेला आहे.