शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Rain: पुन्हा वळिव पावसाचा तडाखा, जोरदार वारे अन् विजांच्या कडकडाटासह बरसणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 12:57 IST

पुढील तीन दिवस दिवसभर असाच उन्हाचा कडाका राहणार आहे, तर संध्याकाळी वळिवाचा तडाखा बसणार आहे.

कोल्हापूर : आठवडाभराच्या विश्रांतीनंतर कोल्हापुरात पुन्हा वळिवाचा पाऊस सक्रिय होत आहे. आजपासून तीन दिवस वळीव मुक्कामालाच येणार आहे. जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह हा पाऊस बरसेल, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तविला आहे.

मागील आठवड्यात वळिवाच्या पावसाने अवघ्या जिल्हाभर धुमाकूळ घातला. तब्बल आठवडाभर राेज दुपारनंतर झोडपून काढलेल्या या पावसाने मोठे नुकसानही केले. यातून सावरून परिस्थिती पूर्वपदावर येत नाही तोवर उत्तरेकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांची तीव्रता वाढल्याचे कारण होऊन जिल्ह्यावर पावसाळी ढग जमा होऊ लागले आहेत. दोन दिवसांपासून संध्याकाळी ढग जमा होतात, सकाळीही काही काळ अंधुक वातावरण असते आणि त्यानंतर पुन्हा दिवसभर उन्हाच्या झळांमुळे होरपळ वाढत आहे.बुधवारी दुपारी तापमानाचा पारा ३९ अंशावर गेला. सकाळपासूनच हवेत प्रचंड उष्मा जाणवत होता. संध्याकाळचे पाच वाजले तरी उन्हाचे चटके बसतच होते. दुपारी तर बाहेर पडणेही मुश्कील झाल्याने बऱ्यापैकी रस्ते ओसच दिसत होते. पुढील तीन दिवस दिवसभर असाच उन्हाचा कडाका राहणार आहे, तर संध्याकाळी वळिवाचा तडाखा बसणार आहे.

साधारणपणे आज (गुरुवार)पासून शनिवारपर्यंत पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस येईल, असे अंदाजात म्हटल्याने नागरिकांनी विशेषत: शेतकऱ्यांनी तयारीत राहण्याची गरज आहे. आता उन्हाळी सोयाबीन पक्वतेच्या तर कुठे काढणीच्या अवस्थेत आहे. काकडी कलिंगडासह उन्हाळी भाजीपाल्याच्या पिकासाठी हा पाऊस मारक आहे. केवळ ऊस पिकासाठीच हा पाऊस तारक असणार आहे, त्यामुळे ऊस उत्पादकांनाच हा पाऊस हवा आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊस