शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

अलमट्टीवर खापर फोडून पंचगंगेचा पूर रोखणे अशक्य, विज्ञान प्रबोधिनीचा निष्कर्ष; पुराची नेमकी कारणे जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 13:40 IST

पुराबाबत अभ्यास आणि उपायांकडे दुर्लक्ष

कोल्हापूर : वेळोवेळी केलेला अभ्यास आणि सुचविलेल्या उपायांकडे दुर्लक्ष केल्यामुळे पंचगंगा नदीला पूर येत असल्याचा निष्कर्ष कोल्हापूरच्या विज्ञान प्रबोधिनी या संस्थेने काढला आहे. या मर्यादित पुराचा स्वतंत्र अभ्यास लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी, पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड आणि निसर्गमित्रचे अनिल चौगुले यांनी सोमवारी मेलद्वारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली. केवळ अलमट्टीवर खापर फोडून पंचगंगेचा पूर रोखणे अशक्य असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदविले आहे.विज्ञान प्रबोधिनीने गेली तीन वर्षे शासनाकडे पाठपुरावा करूनही यासंदर्भात एकही उपाययोजना झालेली नाही, धरणे रिकामी ठेवा, अलमट्टीमुळेच पूर येतो, अधिकारी अभियंते ऐकत नाहीत असे मुद्दे मांडत यावर्षी पूर येणारच नाही असे ठामपणे मांडणारे जलसंपदा विभागाचे निवृत्त अभियंता विजय दिवाण आणि प्रभाकर केंगार यांनी केलेला दावा फोल ठरला आहे, असे या पत्रात म्हटले आहे.

पंचगंगा नदीच्या पूर आलेल्या पाणलोटात अतिवृष्टी झालेली नाही. पंचगंगेच्या खोऱ्यात आजवर केवळ २३४१ मिलिमीटर पाऊस झाला. अलमट्टी धरणात ६२ टीएमसी पाणीसाठा असून, ११,४४४५ क्युसेक इतकी पाण्याची आवक आहे. धरण भरायला आणि बॅकवॉटरचा परिणाम होण्यासाठी अवधी आहे. २००५ आणि २०१९, २०२१ चे पूर अधिक काळ राहण्यास आणि वाढ होण्यास अलमट्टी हे कारण ठरले होते. परंतु, केवळ अलमट्टीकडे पूर्ण दोष दाखवून इथला पूर रोखता येत नाही, असे मुद्दे प्रबोधिनीने या पत्रात मांडले आहेत.

पंचगंगेच्या खोऱ्यात सद्या धरणांमधून २८०० क्युसेक इतकेच पाणी विसर्ग सुरू आहे. कृष्णेत पाण्याची नैसर्गिक भिंत तयार झाल्याने पंचगंगेचे पाणी पुढे न सरकण्याची शक्यता निर्माण करणाऱ्या वारणा, दूधगंगा, कृष्णा, कोयनेचे पाणीही अद्याप परिणाम करीत नाहीत. कोल्हापुरात साेमवारी पहाटे तीन वाजता पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठली आहे; मात्र राजाराम बंधाऱ्यानंतर सुर्वे आणि रुई बंधारे वगळता इचलकरंजी इशारा पातळीला पोहोचलेली नाही. शिवाजी पूल, शिरोली पूल आणि इचलकरंजीतील पाणीपातळी उतरलेली दिसते. याचा अर्थ पंचगंगेच्या खोऱ्यात पडलेल्या पावसाचा हा पूर आहे, असे प्रबोधिनीने म्हटले आहे. हा पूर आता का आला?, इशारा पातळी का गाठली? हे शोधणे गरजेचे आहे, दिशाभूल करून पुराची खरी कारणे न अभ्यासणे किंवा लपविणे हे धोक्याचे आहे, असे या पत्रात म्हटले आहे.

पुराची कारणे अशीनद्यांची नैसर्गिक वळणे, नदी आणि धरण क्षेत्रात वाढलेले गाळाचे प्रमाण, नदीपात्रातील बंधारे आणि अतिक्रमणे, बेकायदा पूल व त्याचे भराव, पूरबाधित क्षेत्रातील बांधकामे, रस्त्यांचे भराव, खरमाती, कचऱ्याचे ढीग, उसाचे पीक, दरवाजा नादुरुस्त असल्याने, राधानगरी धरणातून वीजघराखेरीज पाण्याचा विसर्ग करता न येणे, खुल्या क्षेत्रातील पाऊस मोजता न येणे, १२ पुलांच्या कमी मोऱ्यांतून पाणी पुढे जाण्यासाठी लागणारा विलंब.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDamधरणfloodपूर