शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
4
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
5
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
6
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
7
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
8
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
9
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
10
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
12
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
13
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
14
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
15
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
16
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
17
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
18
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?

अलमट्टीवर खापर फोडून पंचगंगेचा पूर रोखणे अशक्य, विज्ञान प्रबोधिनीचा निष्कर्ष; पुराची नेमकी कारणे जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 13:40 IST

पुराबाबत अभ्यास आणि उपायांकडे दुर्लक्ष

कोल्हापूर : वेळोवेळी केलेला अभ्यास आणि सुचविलेल्या उपायांकडे दुर्लक्ष केल्यामुळे पंचगंगा नदीला पूर येत असल्याचा निष्कर्ष कोल्हापूरच्या विज्ञान प्रबोधिनी या संस्थेने काढला आहे. या मर्यादित पुराचा स्वतंत्र अभ्यास लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी, पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड आणि निसर्गमित्रचे अनिल चौगुले यांनी सोमवारी मेलद्वारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली. केवळ अलमट्टीवर खापर फोडून पंचगंगेचा पूर रोखणे अशक्य असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदविले आहे.विज्ञान प्रबोधिनीने गेली तीन वर्षे शासनाकडे पाठपुरावा करूनही यासंदर्भात एकही उपाययोजना झालेली नाही, धरणे रिकामी ठेवा, अलमट्टीमुळेच पूर येतो, अधिकारी अभियंते ऐकत नाहीत असे मुद्दे मांडत यावर्षी पूर येणारच नाही असे ठामपणे मांडणारे जलसंपदा विभागाचे निवृत्त अभियंता विजय दिवाण आणि प्रभाकर केंगार यांनी केलेला दावा फोल ठरला आहे, असे या पत्रात म्हटले आहे.

पंचगंगा नदीच्या पूर आलेल्या पाणलोटात अतिवृष्टी झालेली नाही. पंचगंगेच्या खोऱ्यात आजवर केवळ २३४१ मिलिमीटर पाऊस झाला. अलमट्टी धरणात ६२ टीएमसी पाणीसाठा असून, ११,४४४५ क्युसेक इतकी पाण्याची आवक आहे. धरण भरायला आणि बॅकवॉटरचा परिणाम होण्यासाठी अवधी आहे. २००५ आणि २०१९, २०२१ चे पूर अधिक काळ राहण्यास आणि वाढ होण्यास अलमट्टी हे कारण ठरले होते. परंतु, केवळ अलमट्टीकडे पूर्ण दोष दाखवून इथला पूर रोखता येत नाही, असे मुद्दे प्रबोधिनीने या पत्रात मांडले आहेत.

पंचगंगेच्या खोऱ्यात सद्या धरणांमधून २८०० क्युसेक इतकेच पाणी विसर्ग सुरू आहे. कृष्णेत पाण्याची नैसर्गिक भिंत तयार झाल्याने पंचगंगेचे पाणी पुढे न सरकण्याची शक्यता निर्माण करणाऱ्या वारणा, दूधगंगा, कृष्णा, कोयनेचे पाणीही अद्याप परिणाम करीत नाहीत. कोल्हापुरात साेमवारी पहाटे तीन वाजता पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठली आहे; मात्र राजाराम बंधाऱ्यानंतर सुर्वे आणि रुई बंधारे वगळता इचलकरंजी इशारा पातळीला पोहोचलेली नाही. शिवाजी पूल, शिरोली पूल आणि इचलकरंजीतील पाणीपातळी उतरलेली दिसते. याचा अर्थ पंचगंगेच्या खोऱ्यात पडलेल्या पावसाचा हा पूर आहे, असे प्रबोधिनीने म्हटले आहे. हा पूर आता का आला?, इशारा पातळी का गाठली? हे शोधणे गरजेचे आहे, दिशाभूल करून पुराची खरी कारणे न अभ्यासणे किंवा लपविणे हे धोक्याचे आहे, असे या पत्रात म्हटले आहे.

पुराची कारणे अशीनद्यांची नैसर्गिक वळणे, नदी आणि धरण क्षेत्रात वाढलेले गाळाचे प्रमाण, नदीपात्रातील बंधारे आणि अतिक्रमणे, बेकायदा पूल व त्याचे भराव, पूरबाधित क्षेत्रातील बांधकामे, रस्त्यांचे भराव, खरमाती, कचऱ्याचे ढीग, उसाचे पीक, दरवाजा नादुरुस्त असल्याने, राधानगरी धरणातून वीजघराखेरीज पाण्याचा विसर्ग करता न येणे, खुल्या क्षेत्रातील पाऊस मोजता न येणे, १२ पुलांच्या कमी मोऱ्यांतून पाणी पुढे जाण्यासाठी लागणारा विलंब.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDamधरणfloodपूर