शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
IND vs SA Women's World Cup 2025 Final Live Streaming: फायनलमध्ये 'ही' गोष्ट ठरेल भारतासाठी जमेची बाजू
3
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
4
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
5
IND vs AUS 3rd T20I Live Streaming : हा सामना जिंका नाहीतर मालिका विसरा! टीम इंडियाकडे शेवटची संधी
6
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
7
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
8
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
9
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
10
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
11
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
12
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
13
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
14
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
15
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
16
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
17
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
18
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
19
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
20
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट

अलमट्टीवर खापर फोडून पंचगंगेचा पूर रोखणे अशक्य, विज्ञान प्रबोधिनीचा निष्कर्ष; पुराची नेमकी कारणे जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 13:40 IST

पुराबाबत अभ्यास आणि उपायांकडे दुर्लक्ष

कोल्हापूर : वेळोवेळी केलेला अभ्यास आणि सुचविलेल्या उपायांकडे दुर्लक्ष केल्यामुळे पंचगंगा नदीला पूर येत असल्याचा निष्कर्ष कोल्हापूरच्या विज्ञान प्रबोधिनी या संस्थेने काढला आहे. या मर्यादित पुराचा स्वतंत्र अभ्यास लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी, पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड आणि निसर्गमित्रचे अनिल चौगुले यांनी सोमवारी मेलद्वारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली. केवळ अलमट्टीवर खापर फोडून पंचगंगेचा पूर रोखणे अशक्य असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदविले आहे.विज्ञान प्रबोधिनीने गेली तीन वर्षे शासनाकडे पाठपुरावा करूनही यासंदर्भात एकही उपाययोजना झालेली नाही, धरणे रिकामी ठेवा, अलमट्टीमुळेच पूर येतो, अधिकारी अभियंते ऐकत नाहीत असे मुद्दे मांडत यावर्षी पूर येणारच नाही असे ठामपणे मांडणारे जलसंपदा विभागाचे निवृत्त अभियंता विजय दिवाण आणि प्रभाकर केंगार यांनी केलेला दावा फोल ठरला आहे, असे या पत्रात म्हटले आहे.

पंचगंगा नदीच्या पूर आलेल्या पाणलोटात अतिवृष्टी झालेली नाही. पंचगंगेच्या खोऱ्यात आजवर केवळ २३४१ मिलिमीटर पाऊस झाला. अलमट्टी धरणात ६२ टीएमसी पाणीसाठा असून, ११,४४४५ क्युसेक इतकी पाण्याची आवक आहे. धरण भरायला आणि बॅकवॉटरचा परिणाम होण्यासाठी अवधी आहे. २००५ आणि २०१९, २०२१ चे पूर अधिक काळ राहण्यास आणि वाढ होण्यास अलमट्टी हे कारण ठरले होते. परंतु, केवळ अलमट्टीकडे पूर्ण दोष दाखवून इथला पूर रोखता येत नाही, असे मुद्दे प्रबोधिनीने या पत्रात मांडले आहेत.

पंचगंगेच्या खोऱ्यात सद्या धरणांमधून २८०० क्युसेक इतकेच पाणी विसर्ग सुरू आहे. कृष्णेत पाण्याची नैसर्गिक भिंत तयार झाल्याने पंचगंगेचे पाणी पुढे न सरकण्याची शक्यता निर्माण करणाऱ्या वारणा, दूधगंगा, कृष्णा, कोयनेचे पाणीही अद्याप परिणाम करीत नाहीत. कोल्हापुरात साेमवारी पहाटे तीन वाजता पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठली आहे; मात्र राजाराम बंधाऱ्यानंतर सुर्वे आणि रुई बंधारे वगळता इचलकरंजी इशारा पातळीला पोहोचलेली नाही. शिवाजी पूल, शिरोली पूल आणि इचलकरंजीतील पाणीपातळी उतरलेली दिसते. याचा अर्थ पंचगंगेच्या खोऱ्यात पडलेल्या पावसाचा हा पूर आहे, असे प्रबोधिनीने म्हटले आहे. हा पूर आता का आला?, इशारा पातळी का गाठली? हे शोधणे गरजेचे आहे, दिशाभूल करून पुराची खरी कारणे न अभ्यासणे किंवा लपविणे हे धोक्याचे आहे, असे या पत्रात म्हटले आहे.

पुराची कारणे अशीनद्यांची नैसर्गिक वळणे, नदी आणि धरण क्षेत्रात वाढलेले गाळाचे प्रमाण, नदीपात्रातील बंधारे आणि अतिक्रमणे, बेकायदा पूल व त्याचे भराव, पूरबाधित क्षेत्रातील बांधकामे, रस्त्यांचे भराव, खरमाती, कचऱ्याचे ढीग, उसाचे पीक, दरवाजा नादुरुस्त असल्याने, राधानगरी धरणातून वीजघराखेरीज पाण्याचा विसर्ग करता न येणे, खुल्या क्षेत्रातील पाऊस मोजता न येणे, १२ पुलांच्या कमी मोऱ्यांतून पाणी पुढे जाण्यासाठी लागणारा विलंब.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDamधरणfloodपूर