शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

सरकारचे साखर निर्यातीचे लक्ष्य गाठणे कठीण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 05:16 IST

देशातील अतिरिक्त साखर कमी करण्यासाठी केंद्र सरकारने ५० लाख टन साखर निर्यातीचे लक्ष्य ठेवले आहे.

- चंद्रकांत कित्तुरेकोल्हापूर  - देशातील अतिरिक्त साखर कमी करण्यासाठी केंद्र सरकारने ५० लाख टन साखर निर्यातीचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र, हंगामातील पहिल्या चार महिन्यांत केवळ ११ लाख टन साखर निर्यातीच्या वाटेवर असून, यातील ६ लाख ६८ हजार टन साखरेची प्रत्यक्ष निर्यात झाली आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्टÑीय बाजारातील साखरेच्या दरांतील तफावतीमुळे निर्यातीचे लक्ष्य पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे.आतापर्यंत कारखान्यांनी सुमारे १५ लाख टनांपर्यंत निर्यातीचे करार केले आहेत. त्यातील ११ लाख ३ हजार ६३१ टन साखर निर्यातीसाठी बाहेर पडली आहे. यातील ६ लाख ६८ हजार ६८० टनच निर्यात झाली आहे. उर्वरित ४ लाख ३४ हजार ९५१ टन साखर निर्यातीच्या वाटेवर म्हणजेच जहाजात किंवा बंदरात आहे. यातील ४ लाख ६३ हजार टन साखर गेल्या महिन्यात निर्यात झाल्याचे आॅल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशनने कळविले आहे.देशात सध्या २९२ लाख टन साखर उपलब्ध असून आणखी १२५ टन उत्पादन अपेक्षित आहे. देशाच्या गरजेपेक्षा सुमारे १४० टनांहून अधिक साठी असल्याने केंद्राने निर्यातीची सक्ती कारखान्यांना केली आहे. मात्र,देशांतर्गत दरापेक्षा २०० ते ३०० रुपये कमी मिळत असल्याने कारखाने निर्यातीला फारसे उत्सुक नाहीत.३ कारखान्यांना जप्तीच्या नोटिसाशेतकऱ्यांच्या ऊस बिलापोटी देय एफआरपीची रक्कम थकविल्याप्रकरणी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी अहमदनगर जिल्ह्यातील ३ साखर कारखान्यांना जप्तीच्या नोटीसा पाठविल्या आहेत. त्यात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व विखे कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे यांच्या राहुरी येथील तनपुरे व राहाता तालुक्यातील गणेश हे दोन सहकारी आणि जामखेड येथील जय श्रीराम शुगर अ‍ॅण्ड अ‍ॅग्रो लि. या खासगी कारखान्याचा समावेश आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर