शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
2
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
3
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
4
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
5
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
6
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
7
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
8
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
9
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
10
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
11
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
12
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
14
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
15
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
16
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
17
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
18
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
19
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
20
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई

राजू शेट्टींना शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण; अशोक गहलोत, अहमद पटेल यांनी केला फोन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 9:58 PM

मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगड येथील मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोमवारी (दि१७) होणार असून या शपथविधीसाठी खासदार राजू शेटटी यांना काँग्रेसकडून निमंत्रित करण्यात आले आहे. 

कोल्हापूर : मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगड येथील मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोमवारी (दि१७) होणार असून या शपथविधीसाठी खासदार राजू शेटटी यांना काँग्रेसकडून निमंत्रित करण्यात आले आहे. त्यासाठी राजस्थानचे नियोजित मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांनी खा.शेट्टी यांना स्वतः फोन करून हे निमंत्रण दिले व खास विमानाने शपथविधी समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन केले. खा. शेट्टी दिल्लीहून अन्य नेत्यांसोबत या सोहळ्याला जाणार आहेत.

नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगड येथे भाजपचा वारू रोखत काॅंग्रेसने मोठा विजय संपादन केला. या तिन्ही राज्याचा शपथविधी सोहळा सोमवारी होणार असून देशातील लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भाजपच्या विरोधी होत असलेल्या महागठबंधणातील सर्व घटक पक्षाच्या प्रमुखांना निमंत्रण देण्यात आले आहे. खासदार राजू शेटटी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गेल्या दीड वर्षात देशभर आंदोलन उभे करत दिल्लीमध्ये देशातील २०९ शेतकरी संघटनांना एकत्रित करून संसदेला घेराव घालत सरकारच्या शेती विरोधातल्या धोरणांवर आवाज उठविला.

मंदसौरमध्ये शेतकऱ्यांवर झालेला गोळीबार व त्यामध्ये शहीद झालेल्या शेतकऱ्याचे अस्थिकलश यात्रा घेऊन देशातील २२ राज्यामध्ये जनजागृतीसाठी किसान मुक्ती यात्रा काढली व त्याचा समारोप २१ व २२ नोव्हेंबर २०१७ रोजी दिल्ली येथे किसान संसदेचे आयोजन करून समारोप करण्यात आला आणि त्याच संसदेमध्ये संपूर्ण कर्जमुक्ती व दीडपट हमीभाव शेतकऱ्यांना कायदेशीररित्या मिळावेत अशी तरतूद असलेल्या दोन विधेयकांची निर्मिती झाली. या विधेयकांना २१ राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शविला ही विधेयके मजूर करण्यासाठी देशभरातील २०९ शेतकरी संघटनांनी सह्याची मोहीम सुरू केली व २५ लाख शेतकऱ्यांनी संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या मागणीवर सह्या केल्या तर महाराष्ट्रातील ३५०० गावसभेत हा ठराव करून वरील  मागणी करण्यात आली.

हे सगळे ठराव अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्यावतीने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेठ घेऊन देण्यात आले. तरीही केंद्रसरकारने या आंदोलनाची दखल न घेतल्याने दिनांक ३० नोव्हेंबर २०१८ रोजी दिल्ली देशभरातील ५ लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी रामलीला मैदान ते संसद मार्ग असा ऐतहासिक लाॅंग मार्च काढला. ज्याच्यामुळे संपूर्ण देशभर मोदी सरकार हे शेतकरी विरोधी असल्याचे शिक्का मोर्तब झाले व याचाच फटका ५ राज्यातील निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बसला.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीcongressकाँग्रेसAshok Gahlotअशोक गहलोत