शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
4
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
5
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
6
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
7
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
8
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
9
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
10
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
11
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
12
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
13
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
14
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
15
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
16
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
17
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
18
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
19
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
20
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

'दामदुप्पट'चा परतावा नाही, गुंतवणूकदार हवालदिल; कोल्हापुरातील १४१ लोकांचे ८५ लाख अडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 12:10 IST

कंपनीचा म्होरक्या दुबईला पळून गेला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याची कार्यालयेही बंद असून, जानेवारीपासून दरमहा मिळणारी परताव्याची रक्कम बंद झाल्याने गुंतवणूकदारांना पैशासाठी टाचा घासायची वेळ आली आहे.

विश्वास पाटील

कोल्हापूर : दामदुप्पट योजनेचे आमिष दाखवून गुंतवणूक करायला भाग पाडलेल्या सांगलीतील तीन कंपन्यांनी गाशा गुंडाळला आहे. त्यामुळे गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. या कंपनीचा म्होरक्या दुबईला पळून गेला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याची कार्यालयेही बंद असून, जानेवारीपासून दरमहा मिळणारी परताव्याची रक्कम बंद झाल्याने गुंतवणूकदारांना पैशासाठी टाचा घासायची वेळ आली आहे. अशा फसवणुकीच्या बातम्या रोज येत असतानाही लोक कष्टाचे पैसे आमिषापोटी अशा बनावट कंपन्यांमध्ये गुंतवत आहेत. माझे पैसे मिळाले, पुढे काय व्हायचे ते होईल, अशी मानसिकता त्यामागे आहे.

फक्त नावांतच ‘स्मार्ट’ असलेल्या व पैशाचा ‘ट्रेड’ करून ‘ग्लोबल’ होण्याचे स्वप्न दाखवणाऱ्या या कंपन्यांनी गुंतवणूकदारांच्या न कष्ट करता जादा कमाई करण्याच्या हव्यासाचा फायदा उठवला आहे. मूळ योजनेनुसार एक लाख रुपये भरल्यावर महिन्याला १० हजार मुद्दल व ५ हजार नफा असे १५ हजार रुपये ११ महिने मिळणार होते. त्यानुसार एकेकाने दोन लाखापासून सोळा लाखापर्यंत या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली. त्यांना सुरुवातीचे सहा महिने बँक खात्यावर परतावे जमा झाले; परंतु गेली सहा महिने हे परतावे बंद झाले आहेत.

कार्यालयात कोण भेटत नाही, कोण फोन उचलत नसल्याने गुंतवणूकदारांचा रक्तदाब वाढला आहे. शंभर रुपयांच्या प्रतिज्ञापत्राच्या हमीवर ही लाखांतील गुंतवणूक झाली आहे. शिक्षकापासून सरकारी कर्मचारी व व्यावसायिकांपासून किराणा दुकानदारांपर्यंत सर्व स्तरांतील लोकांनी ही गुंतवणूक केली आहे. समाजातील शहाणा समजला जाणारा हा वर्गच आमिषाला भुलून गोत्यात आला आहे.

तीन बँकांमध्ये व्यवहार

या कंपन्यांचे एचडीएफसी बँक सांगली, एस बँक मुंबईमध्ये व्यवहार आहेत. कंपनीने या बँकांचे धनादेश गुंतवणूकदारांना दिले आहेत. ते बँकेत भरल्यानंतर या कंपन्यांची खाती बंद करण्यात आल्याचे सांगून चेक परत आले आहेत. गंमत म्हणजे पैसे एका कंपनीने भरून घेतले आहेत व त्याचा परतावा मात्र दुसऱ्याच कंपन्यांच्या खात्यावरून दिला गेला आहे.

टीडीएसलाही दांडी..

या कंपन्यांनी गुंतवणूकदारांकडून त्यांचा परतावा देताना टीडीएस कपात करून घेतला आहे. प्रत्यक्षात ही रक्कम त्यांनी प्राप्तीकर खात्याकडे भरलेली नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांना त्याचीही अडचण येत आहे.

पोलिसांत तक्रार करणार

कोल्हापुरातील विविध सरकारी खात्यात नोकरी करणारे व त्यातही महावितरणमधील बहुतांशी लोकांनी या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यातील १२२ लोकांचे ८५ लाख व १९ लोकांनी डॉलरमध्ये ४७०० डॉलर इतकी गुंतवणूक केली आहे. या सर्व लोकांनी किती रकमेची किती तारखेला गुंतवणूक केली, त्यांना किती पैसे मिळाले, कोणत्या बँकेतून मिळाले, याची यादी लोकमतकडे उपलब्ध आहे.

जानेवारी पासून पैसा परत नाही

या कंपनीचे मालक असलेल्या व्यक्तीकडून गुंतवणूकदारांना भलीमोठी आश्वासने दिली गेली आहेत. मुदतीआधी तुम्हाला पैसे हवे असतील तर रक्कम कितीही लाख असू देत..दोन तासांत तुमच्या खात्यावर पैसे जमा करतो, असे तो चुटकी वाजवून सांगत होता; परंतु आता जानेवारीपासून एकही पैसा परत मिळालेला नाही. त्याचे पाठिराखे मात्र आम्ही सगळ्यांना मॅनेज केले असल्याचे सांगून गुंतवणूकदारांना दरडावत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस