शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
5
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
6
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
7
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
8
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
9
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
10
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
11
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
12
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
13
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
14
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
15
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
16
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
17
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
18
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
19
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
20
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू

'दामदुप्पट'चा परतावा नाही, गुंतवणूकदार हवालदिल; कोल्हापुरातील १४१ लोकांचे ८५ लाख अडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 12:10 IST

कंपनीचा म्होरक्या दुबईला पळून गेला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याची कार्यालयेही बंद असून, जानेवारीपासून दरमहा मिळणारी परताव्याची रक्कम बंद झाल्याने गुंतवणूकदारांना पैशासाठी टाचा घासायची वेळ आली आहे.

विश्वास पाटील

कोल्हापूर : दामदुप्पट योजनेचे आमिष दाखवून गुंतवणूक करायला भाग पाडलेल्या सांगलीतील तीन कंपन्यांनी गाशा गुंडाळला आहे. त्यामुळे गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. या कंपनीचा म्होरक्या दुबईला पळून गेला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याची कार्यालयेही बंद असून, जानेवारीपासून दरमहा मिळणारी परताव्याची रक्कम बंद झाल्याने गुंतवणूकदारांना पैशासाठी टाचा घासायची वेळ आली आहे. अशा फसवणुकीच्या बातम्या रोज येत असतानाही लोक कष्टाचे पैसे आमिषापोटी अशा बनावट कंपन्यांमध्ये गुंतवत आहेत. माझे पैसे मिळाले, पुढे काय व्हायचे ते होईल, अशी मानसिकता त्यामागे आहे.

फक्त नावांतच ‘स्मार्ट’ असलेल्या व पैशाचा ‘ट्रेड’ करून ‘ग्लोबल’ होण्याचे स्वप्न दाखवणाऱ्या या कंपन्यांनी गुंतवणूकदारांच्या न कष्ट करता जादा कमाई करण्याच्या हव्यासाचा फायदा उठवला आहे. मूळ योजनेनुसार एक लाख रुपये भरल्यावर महिन्याला १० हजार मुद्दल व ५ हजार नफा असे १५ हजार रुपये ११ महिने मिळणार होते. त्यानुसार एकेकाने दोन लाखापासून सोळा लाखापर्यंत या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली. त्यांना सुरुवातीचे सहा महिने बँक खात्यावर परतावे जमा झाले; परंतु गेली सहा महिने हे परतावे बंद झाले आहेत.

कार्यालयात कोण भेटत नाही, कोण फोन उचलत नसल्याने गुंतवणूकदारांचा रक्तदाब वाढला आहे. शंभर रुपयांच्या प्रतिज्ञापत्राच्या हमीवर ही लाखांतील गुंतवणूक झाली आहे. शिक्षकापासून सरकारी कर्मचारी व व्यावसायिकांपासून किराणा दुकानदारांपर्यंत सर्व स्तरांतील लोकांनी ही गुंतवणूक केली आहे. समाजातील शहाणा समजला जाणारा हा वर्गच आमिषाला भुलून गोत्यात आला आहे.

तीन बँकांमध्ये व्यवहार

या कंपन्यांचे एचडीएफसी बँक सांगली, एस बँक मुंबईमध्ये व्यवहार आहेत. कंपनीने या बँकांचे धनादेश गुंतवणूकदारांना दिले आहेत. ते बँकेत भरल्यानंतर या कंपन्यांची खाती बंद करण्यात आल्याचे सांगून चेक परत आले आहेत. गंमत म्हणजे पैसे एका कंपनीने भरून घेतले आहेत व त्याचा परतावा मात्र दुसऱ्याच कंपन्यांच्या खात्यावरून दिला गेला आहे.

टीडीएसलाही दांडी..

या कंपन्यांनी गुंतवणूकदारांकडून त्यांचा परतावा देताना टीडीएस कपात करून घेतला आहे. प्रत्यक्षात ही रक्कम त्यांनी प्राप्तीकर खात्याकडे भरलेली नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांना त्याचीही अडचण येत आहे.

पोलिसांत तक्रार करणार

कोल्हापुरातील विविध सरकारी खात्यात नोकरी करणारे व त्यातही महावितरणमधील बहुतांशी लोकांनी या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यातील १२२ लोकांचे ८५ लाख व १९ लोकांनी डॉलरमध्ये ४७०० डॉलर इतकी गुंतवणूक केली आहे. या सर्व लोकांनी किती रकमेची किती तारखेला गुंतवणूक केली, त्यांना किती पैसे मिळाले, कोणत्या बँकेतून मिळाले, याची यादी लोकमतकडे उपलब्ध आहे.

जानेवारी पासून पैसा परत नाही

या कंपनीचे मालक असलेल्या व्यक्तीकडून गुंतवणूकदारांना भलीमोठी आश्वासने दिली गेली आहेत. मुदतीआधी तुम्हाला पैसे हवे असतील तर रक्कम कितीही लाख असू देत..दोन तासांत तुमच्या खात्यावर पैसे जमा करतो, असे तो चुटकी वाजवून सांगत होता; परंतु आता जानेवारीपासून एकही पैसा परत मिळालेला नाही. त्याचे पाठिराखे मात्र आम्ही सगळ्यांना मॅनेज केले असल्याचे सांगून गुंतवणूकदारांना दरडावत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस