शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

'दामदुप्पट'चा परतावा नाही, गुंतवणूकदार हवालदिल; कोल्हापुरातील १४१ लोकांचे ८५ लाख अडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 12:10 IST

कंपनीचा म्होरक्या दुबईला पळून गेला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याची कार्यालयेही बंद असून, जानेवारीपासून दरमहा मिळणारी परताव्याची रक्कम बंद झाल्याने गुंतवणूकदारांना पैशासाठी टाचा घासायची वेळ आली आहे.

विश्वास पाटील

कोल्हापूर : दामदुप्पट योजनेचे आमिष दाखवून गुंतवणूक करायला भाग पाडलेल्या सांगलीतील तीन कंपन्यांनी गाशा गुंडाळला आहे. त्यामुळे गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. या कंपनीचा म्होरक्या दुबईला पळून गेला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याची कार्यालयेही बंद असून, जानेवारीपासून दरमहा मिळणारी परताव्याची रक्कम बंद झाल्याने गुंतवणूकदारांना पैशासाठी टाचा घासायची वेळ आली आहे. अशा फसवणुकीच्या बातम्या रोज येत असतानाही लोक कष्टाचे पैसे आमिषापोटी अशा बनावट कंपन्यांमध्ये गुंतवत आहेत. माझे पैसे मिळाले, पुढे काय व्हायचे ते होईल, अशी मानसिकता त्यामागे आहे.

फक्त नावांतच ‘स्मार्ट’ असलेल्या व पैशाचा ‘ट्रेड’ करून ‘ग्लोबल’ होण्याचे स्वप्न दाखवणाऱ्या या कंपन्यांनी गुंतवणूकदारांच्या न कष्ट करता जादा कमाई करण्याच्या हव्यासाचा फायदा उठवला आहे. मूळ योजनेनुसार एक लाख रुपये भरल्यावर महिन्याला १० हजार मुद्दल व ५ हजार नफा असे १५ हजार रुपये ११ महिने मिळणार होते. त्यानुसार एकेकाने दोन लाखापासून सोळा लाखापर्यंत या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली. त्यांना सुरुवातीचे सहा महिने बँक खात्यावर परतावे जमा झाले; परंतु गेली सहा महिने हे परतावे बंद झाले आहेत.

कार्यालयात कोण भेटत नाही, कोण फोन उचलत नसल्याने गुंतवणूकदारांचा रक्तदाब वाढला आहे. शंभर रुपयांच्या प्रतिज्ञापत्राच्या हमीवर ही लाखांतील गुंतवणूक झाली आहे. शिक्षकापासून सरकारी कर्मचारी व व्यावसायिकांपासून किराणा दुकानदारांपर्यंत सर्व स्तरांतील लोकांनी ही गुंतवणूक केली आहे. समाजातील शहाणा समजला जाणारा हा वर्गच आमिषाला भुलून गोत्यात आला आहे.

तीन बँकांमध्ये व्यवहार

या कंपन्यांचे एचडीएफसी बँक सांगली, एस बँक मुंबईमध्ये व्यवहार आहेत. कंपनीने या बँकांचे धनादेश गुंतवणूकदारांना दिले आहेत. ते बँकेत भरल्यानंतर या कंपन्यांची खाती बंद करण्यात आल्याचे सांगून चेक परत आले आहेत. गंमत म्हणजे पैसे एका कंपनीने भरून घेतले आहेत व त्याचा परतावा मात्र दुसऱ्याच कंपन्यांच्या खात्यावरून दिला गेला आहे.

टीडीएसलाही दांडी..

या कंपन्यांनी गुंतवणूकदारांकडून त्यांचा परतावा देताना टीडीएस कपात करून घेतला आहे. प्रत्यक्षात ही रक्कम त्यांनी प्राप्तीकर खात्याकडे भरलेली नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांना त्याचीही अडचण येत आहे.

पोलिसांत तक्रार करणार

कोल्हापुरातील विविध सरकारी खात्यात नोकरी करणारे व त्यातही महावितरणमधील बहुतांशी लोकांनी या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यातील १२२ लोकांचे ८५ लाख व १९ लोकांनी डॉलरमध्ये ४७०० डॉलर इतकी गुंतवणूक केली आहे. या सर्व लोकांनी किती रकमेची किती तारखेला गुंतवणूक केली, त्यांना किती पैसे मिळाले, कोणत्या बँकेतून मिळाले, याची यादी लोकमतकडे उपलब्ध आहे.

जानेवारी पासून पैसा परत नाही

या कंपनीचे मालक असलेल्या व्यक्तीकडून गुंतवणूकदारांना भलीमोठी आश्वासने दिली गेली आहेत. मुदतीआधी तुम्हाला पैसे हवे असतील तर रक्कम कितीही लाख असू देत..दोन तासांत तुमच्या खात्यावर पैसे जमा करतो, असे तो चुटकी वाजवून सांगत होता; परंतु आता जानेवारीपासून एकही पैसा परत मिळालेला नाही. त्याचे पाठिराखे मात्र आम्ही सगळ्यांना मॅनेज केले असल्याचे सांगून गुंतवणूकदारांना दरडावत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस