शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
4
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
5
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
6
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
7
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
8
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
9
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
10
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
11
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
12
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
13
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
14
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
15
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
16
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
17
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
18
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
20
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...

विधानसभा निवडणुकीनंतर प्राधिकरणाविरोधात तीव्र लढा : सतेज पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2019 2:44 PM

प्राधिकरणांतर्गत बांधकाम परवाना, विकास, निधी उपलब्धता, आदींबाबत राज्य सरकारने केवळ मोठी आश्वासने दिली; मात्र त्याची पूर्तता केली नसल्याने गावांमधील नागरिकांना त्रास होत आहे. लोकभावना लक्षात घेऊन सरकार, शासनाने प्राधिकरण रद्द करावे, अन्यथा विधानसभा निवडणुकीनंतर प्राधिकरणाविरोधात रस्त्यावर उतरून तीव्र लढा देण्यात येईल, असा इशारा आमदार सतेज पाटील यांनी दिला.

ठळक मुद्देविधानसभा निवडणुकीनंतर प्राधिकरणाविरोधात तीव्र लढा : सतेज पाटील राज्य सरकारने फसविल्यामुळेच नागरिकांचा उद्रेक

कोल्हापूर : प्राधिकरणांतर्गत बांधकाम परवाना, विकास, निधी उपलब्धता, आदींबाबत राज्य सरकारने केवळ मोठी आश्वासने दिली; मात्र त्याची पूर्तता केली नसल्याने गावांमधील नागरिकांना त्रास होत आहे. लोकभावना लक्षात घेऊन सरकार, शासनाने प्राधिकरण रद्द करावे, अन्यथा विधानसभा निवडणुकीनंतर प्राधिकरणाविरोधात रस्त्यावर उतरून तीव्र लढा देण्यात येईल, असा इशारा आमदार सतेज पाटील यांनी दिला.स्थापना होऊन पावणेदोन वर्षे झाली, तरी आश्वासनांपुढे कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाचे काम सरकलेले नाही. अपेक्षित गतीने बांधकाम परवाने मिळत नसल्याने ग्रामीण आणि शहरातील नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्याबाबत भूमिका ठरविण्यासाठी आमदार सतेज पाटील यांनी अजिंक्यतारा कार्यालयात प्राधिकरणातील गावांतील सरपंच, प्रतिनिधींची बैठक घेतली.

यावेळी प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील उपस्थित होते. या बैठकीतील निर्णयाबाबत आमदार पाटील यांनी सांगितले की, प्राधिकरणाविरोधात उद्रेक होण्यास सरकार जबाबदार आहे. आश्वासनांची पूर्तता झाली नसल्याने नागरिकांचा भ्रमनिरास झाला आहे; त्यामुळे ४३ पैकी ४० गावांनी आतापर्यंत प्राधिकरणाविरोधातील ठराव केले आहेत. ते रद्द होण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी लढा देण्यात येईल.

मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील म्हणाले, ‘गुंठेवारीच्या परवाना आणि विना परवाना झालेल्या बांधकामांना दंड वसूल करून मान्यता देण्याला नागपूर उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे; त्यामुळे परवान्याबाबत सध्या काहीच करता येणार नाही. हा प्रश्न लवकर मार्गी लावण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.’ या बैठकीस प्राधिकरणातील ४० गावांचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, प्रतिनिधी उपस्थित होते.प्रलंबित परवाने महिन्याभरात देणारप्राधिकरण रद्द होईपर्यंत सध्या असणारी परवान्यांची प्रलंबित कामे पूर्ण करा. तांत्रिक अडचणी सोडवा. प्रत्येक गावात एक दिवसाचे शिबिर घ्या, असे आमदार पाटील यांनी सांगितले. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी कलेक्टर एन. ए. असलेल्या बांधकाम परवान्यांची ‘एडीटीपी’कडे ८१ आणि आमच्याकडे २५ प्रकरणे प्रलंबित आहेत. महिन्याभरात ही प्रकरणे मार्गी लावली जातील, असे सांगितले.

प्राधिकरणांतर्गत गावांचा विकास कशा पद्धतीने केला जाणार, त्याचे प्रारूप गोकुळ शिरगाव येथील २० हेक्टर जागेत उभारले जाणार आहे. ही जागा प्राधिकरण स्वत:कडे घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले.गावागावांमध्ये जनजागृतीआम्हाला प्राधिकरण का नको याबाबतची भूमिका नागरिकांपर्यंत मांडण्यासाठी त्यांच्यामध्ये जनजागृती करण्याकरिता गावागावांमध्ये फलक लावले जाणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. 

 

 

टॅग्स :Satej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलkolhapurकोल्हापूर