शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
3
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
4
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
5
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
6
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
7
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
8
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
9
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
10
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
11
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
12
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
13
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
14
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
15
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
16
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
17
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
18
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
19
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
20
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!

महिलांच्या तक्रारींना प्राधान्य देण्याच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 20:43 IST

डॉ. देशमुख म्हणाले, जिल्'ात महिला व तरुणींची छेड काढण्याचे प्रमाण वाढत आहे. कॉलेज युवतींना हुल्लडबाजांकडून त्रास दिला जातो. हे थांबविण्यासाठी ‘निर्भया’ पथकाची नेमणूक केली आहे; मात्र त्यातूनही काही घटना घडतात. त्यामुळे महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते.

ठळक मुद्देअपघातांचे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपक्रम

कोल्हापूर : महिला व तरुणींच्या सुरक्षेला महत्त्व दिले जात आहे. त्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्याने महिलांच्या तक्रारींना प्राधान्यक्रम द्यावा, अशा सूचना दिल्या आहेत. तसेच गतवर्षात अपघातात ३४५ जणांचा मृत्यू झाला असून, हे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी शनिवारी पत्रकारांना दिली.

डॉ. देशमुख म्हणाले, जिल्'ात महिला व तरुणींची छेड काढण्याचे प्रमाण वाढत आहे. कॉलेज युवतींना हुल्लडबाजांकडून त्रास दिला जातो. हे थांबविण्यासाठी ‘निर्भया’ पथकाची नेमणूक केली आहे; मात्र त्यातूनही काही घटना घडतात. त्यामुळे महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते. हे प्रमाण कमी व्हावे, महिलांनी निर्भयपणे वावर करावा यासाठी कडक धोरण राबविले जात आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याला महिलांच्या तक्रारी प्राधान्याने घेण्याच्या सूचना केल्या आहेत.

गतवर्षात जिल्'ातील अपघातांमध्ये ३४५ लोकांचा बळी गेला आहे. तांत्रिक बिघाडापेक्षा मानवी चुकांमुळे अपघात घडण्याचे प्रमाण जास्त आहे. सुसाट वेग, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन, मद्यप्राशन करून वाहन चालविणे, हेल्मेटचा वापर न करणे, रात्री प्रवास करताना लागणारी डुलकी अशा कारणांमुळे अपघात घडतात. प्रादेशिक परिवहन विभाग व शहर वाहतूक शाखेकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्यामुळेच अपघात वाढत आहेत. हे प्रमाण कमी करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवीत आहोत.

  • सावकार रडारवर

जिल्'ात खासगी सावकारी अद्यापही सुरू आहे. अनेकांच्या विरोधात अर्ज दाखल आहेत. पतसंस्थेच्या नावाखाली कर्ज दाखवून अनेक सावकारांनी बेहिशेबी मालमत्ता मिळविली आहे. तशा प्रकारचे अर्ज आले आहेत. कायद्याचा आडोसा घेऊन खरेदी व्यवहार दाखवून सावकारी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याच्या सूचना सर्वच पोलीस ठाण्यांना दिल्या असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.

  • साक्षीदाराला भत्ता मिळण्यासाठी प्रयत्न

गुन्हे सिद्धतेचे प्रमाण वाढविण्यासाठी साक्षीदार महत्त्वाचा असतो. जिल्'ातील चंदगड, राधानगरी, आजरा तालुक्यांतील साक्षीदाराला जिल्हा न्यायालयात साक्ष देण्यासाठी यायला एक दिवस लागतो. तेव्हा त्याची रोजंदारी बुडते, शिवाय प्रवासखर्च होतो. त्यामुळे साक्षीदारांना ज्या-त्या दिवशी भत्ता मिळावा, त्यात वाढ व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिस