शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

महिलांच्या तक्रारींना प्राधान्य देण्याच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 20:43 IST

डॉ. देशमुख म्हणाले, जिल्'ात महिला व तरुणींची छेड काढण्याचे प्रमाण वाढत आहे. कॉलेज युवतींना हुल्लडबाजांकडून त्रास दिला जातो. हे थांबविण्यासाठी ‘निर्भया’ पथकाची नेमणूक केली आहे; मात्र त्यातूनही काही घटना घडतात. त्यामुळे महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते.

ठळक मुद्देअपघातांचे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपक्रम

कोल्हापूर : महिला व तरुणींच्या सुरक्षेला महत्त्व दिले जात आहे. त्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्याने महिलांच्या तक्रारींना प्राधान्यक्रम द्यावा, अशा सूचना दिल्या आहेत. तसेच गतवर्षात अपघातात ३४५ जणांचा मृत्यू झाला असून, हे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी शनिवारी पत्रकारांना दिली.

डॉ. देशमुख म्हणाले, जिल्'ात महिला व तरुणींची छेड काढण्याचे प्रमाण वाढत आहे. कॉलेज युवतींना हुल्लडबाजांकडून त्रास दिला जातो. हे थांबविण्यासाठी ‘निर्भया’ पथकाची नेमणूक केली आहे; मात्र त्यातूनही काही घटना घडतात. त्यामुळे महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते. हे प्रमाण कमी व्हावे, महिलांनी निर्भयपणे वावर करावा यासाठी कडक धोरण राबविले जात आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याला महिलांच्या तक्रारी प्राधान्याने घेण्याच्या सूचना केल्या आहेत.

गतवर्षात जिल्'ातील अपघातांमध्ये ३४५ लोकांचा बळी गेला आहे. तांत्रिक बिघाडापेक्षा मानवी चुकांमुळे अपघात घडण्याचे प्रमाण जास्त आहे. सुसाट वेग, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन, मद्यप्राशन करून वाहन चालविणे, हेल्मेटचा वापर न करणे, रात्री प्रवास करताना लागणारी डुलकी अशा कारणांमुळे अपघात घडतात. प्रादेशिक परिवहन विभाग व शहर वाहतूक शाखेकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्यामुळेच अपघात वाढत आहेत. हे प्रमाण कमी करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवीत आहोत.

  • सावकार रडारवर

जिल्'ात खासगी सावकारी अद्यापही सुरू आहे. अनेकांच्या विरोधात अर्ज दाखल आहेत. पतसंस्थेच्या नावाखाली कर्ज दाखवून अनेक सावकारांनी बेहिशेबी मालमत्ता मिळविली आहे. तशा प्रकारचे अर्ज आले आहेत. कायद्याचा आडोसा घेऊन खरेदी व्यवहार दाखवून सावकारी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याच्या सूचना सर्वच पोलीस ठाण्यांना दिल्या असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.

  • साक्षीदाराला भत्ता मिळण्यासाठी प्रयत्न

गुन्हे सिद्धतेचे प्रमाण वाढविण्यासाठी साक्षीदार महत्त्वाचा असतो. जिल्'ातील चंदगड, राधानगरी, आजरा तालुक्यांतील साक्षीदाराला जिल्हा न्यायालयात साक्ष देण्यासाठी यायला एक दिवस लागतो. तेव्हा त्याची रोजंदारी बुडते, शिवाय प्रवासखर्च होतो. त्यामुळे साक्षीदारांना ज्या-त्या दिवशी भत्ता मिळावा, त्यात वाढ व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिस