शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

कामगारांना लुटणाऱ्या टोळ्यांची हप्ता, खंडणीपर्यंत मजल : पोलिसांचाही वरदहस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 00:48 IST

सहकार व शैक्षणिक क्षेत्रांसह वस्त्रोद्योगात प्रगतशील बनलेल्या या शहरात कामानिमित्त अन्य राज्यांतून येऊन राहिलेल्या कामगारांना धमकावून सुरुवातीला पगाराची रक्कम काढून घेणाºया टोळ्या पुढे जाऊन व्यापारी, उद्योजक यांना धमकावून हप्ता व खंडणी

ठळक मुद्देव्यापाºयांच्या स्वभावाचा फायदा; परप्रांतीयांच्या वाढत्या लोंढ्यामुळे शस्त्रास्त्र तस्करीच्या रॅकेटला चालनागुन्हेगारी टोळक्यांनी सुरुवातीपासूनच औद्योगिक वसाहतींना लक्ष केले.

अतुल आंबी ।इचलकरंजी : सहकार व शैक्षणिक क्षेत्रांसह वस्त्रोद्योगात प्रगतशील बनलेल्या या शहरात कामानिमित्त अन्य राज्यांतून येऊन राहिलेल्या कामगारांना धमकावून सुरुवातीला पगाराची रक्कम काढून घेणाºया टोळ्या पुढे जाऊन व्यापारी, उद्योजक यांना धमकावून हप्ता व खंडणी गोळा करू लागल्या. बाहेरहून कामासाठी आलेले व्यापारीवर्गातील अनेकजण मवाळवादी आहेत. मारामाºया, पोलीस, कोर्ट कचेरी करण्याचा त्यांचा पिंड नाही. त्याचाच गैरफायदा घेत गुन्हेगारांनी आपली दहशत निर्माण करून गुन्हेगारी कारवाया सुरू केल्या. पोलिसांच्या छुप्या वरदहस्तामुळे त्याला गती मिळाल्याने वस्त्रनगरीची क्राईमनगरीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली.

शहराची पार्श्वभूमी पाहता सन १९६० नंतरच्या सहकार चळवळीतील निकोप स्पर्धेमुळे साखर कारखान्यांबरोबरच या परिसरात शैक्षणिक संस्था व विविध सूतगिरण्या उभ्या राहिल्या. त्यामुळे येथील यंत्रमाग उद्योगानेही चांगली प्रगती केली. सन २००४-०५ च्या सुमारास शहर व परिसरात आॅटोलूमचे कारखाने सुरू झाले आणि येथील वस्त्रोद्योग विकसित झाला.

आॅटोलूम कारखान्यांच्या वाढत्या संख्येबरोबर या कारखान्यांत काम करण्यासाठी उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान व कर्नाटक या राज्यांसह भिवंडी मालेगाव येथून येणाºया कामगारांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. कामगार उपलब्ध झाल्याने शहराच्या परिसरातील गावांमध्येही कारखाने उभे राहिले. चंदूर, आभार फाटा, खंजिरे औद्योगिक वसाहत, कोरोची, शहापूर, पार्वती औद्योगिक वसाहत, प्राईड इंडिया टेक्स्टाईल पार्क, खोतवाडी, तारदाळ, यड्राव अशा परिसरांमध्ये वस्त्रोद्योग पसरला. त्याबरोबरच सुरू झाली गुन्हेगारी कृत्ये. स्थानिक गुन्हेगारांकडून कामासाठी म्हणून येऊन राहिलेल्या परप्रांतातील कामगारांना अडवून त्यांच्याकडून पैसे काढून घेण्याचे प्रकार सुरू झाले.

त्यामध्ये उत्तर प्रदेश व बिहार येथून आलेल्या कामगारांपैकी एखादा टार्गट असेल, तर त्यालाही आपल्या टोळीत समाविष्ट करून घेतले जायचे. त्यामुळे गुन्हेगारी टोळ्या चांगल्याच फोफावल्या. त्यांच्याकडून गुन्हेगारी कृत्ये वाढू लागली. उत्तर भारतातील राज्यांतून सहज उपलब्ध होणारी हत्यारे या गुन्हेगारांनी मिळविली. त्याचा धाक दाखवून लुटालूट सुरू झाली. हीच लूट पुढे वाढत जाऊन जो पैसे देण्यास टाळाटाळ करतो, त्याला मारहाण, प्रसंगी खून असे प्रकार सुरू झाले. त्यातून धाडस वाढल्याने त्या परिसरात नव्याने उभारल्या जाणाºया उद्योजकांकडूनही खंडणी वसूल केली जाऊ लागली. त्यानंतर एक्स्प्रेस विद्युत पुरवठा उपलब्ध झाल्याने शहर परिसरात यंत्रमाग उद्योग मोठ्या प्रमाणात सुरू होऊ लागले. त्यासाठी लागणारी जागा, खरेदी-विक्री व्यवहार यामध्येही गुन्हेगारी टोळ्यांनी शिरकाव केला. त्यातून बघता-बघता हे गुन्हेगार मोठे दादा बनले.औद्योगिक वसाहती हैराणगुन्हेगारी टोळक्यांनी सुरुवातीपासूनच औद्योगिक वसाहतींना लक्ष केले. तेथील कामगारांसह उद्योजकांनाही खंडणीसाठी धमक्या देणे व हप्ता वसूली करणे सुरू केले. कारखान्यातील मेंडिंगची कामे कोणाला देणे यापासून ते विविध कामात ढवळाढवळ करू लागले. त्यामुळे सर्वजण हैराण झाले होते.

(उद्याच्या अंकात : कमी श्रमात व कमी वेळेत जास्त पैसे...)

टॅग्स :Power Shutdownभारनियमनkolhapurकोल्हापूर