शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

एकाच गणेशमूर्तीची २२ वर्षांपासून प्रतिष्ठापना, राजू राऊत यांचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 15:23 IST

पर्यावरण जनजागृतीचा भाग म्हणून ३२ वर्षांपूर्वी कोल्हापुरातील रंकाळा तलाव प्रदूषित न करण्याची चळवळ सुरू करणारे शाहीर राजू राऊत हे आपल्या घरी गेल्या २२ वर्षांपासून एकाच छोट्या गणेशाची प्रतिष्ठापना करत आले आहेत. कलाकाराच्या घरातून गणेशाचे विसर्जन करणे मान्य न झाल्याने गणेशोत्सवात नवे लेखन आणि काव्याची निर्मिती करणे हीच पूजा ते मानतात.

ठळक मुद्देएकाच गणेशमूर्तीची २२ वर्षांपासून प्रतिष्ठापनारंकाळा प्रदूषित न करण्याचा संकल्प

संदीप आडनाईक कोल्हापूर : पर्यावरण जनजागृतीचा भाग म्हणून ३२ वर्षांपूर्वी कोल्हापुरातील रंकाळा तलाव प्रदूषित न करण्याची चळवळ सुरू करणारे शाहीर राजू राऊत हे आपल्या घरी गेल्या २२ वर्षांपासून एकाच छोट्या गणेशाची प्रतिष्ठापना करत आले आहेत. कलाकाराच्या घरातून गणेशाचे विसर्जन करणे मान्य न झाल्याने गणेशोत्सवात नवे लेखन आणि काव्याची निर्मिती करणे हीच पूजा ते मानतात.समविचारी मित्रांसोबत त्यांनी ३२ वर्षांपूर्वी ‘रंकाळा बचाओ’ चळवळ सुरू केली. ही चळवळ उभारताना जलसाठा प्रदूषित होण्यामागील अनेक कारणांपैकी गणेशमूर्तींचे विसर्जन हा एक मोठा घटक असल्याचे लक्षात आल्यानंतर रंकाळा तलावाशेजारीच असलेल्या आणि केवळ सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जित केल्या जात, त्या इराणी खणीत राऊत यांनी घरच्या मूर्तीचे विसर्जन सुरू केले. एकट्याच्या गणपतीने काय फरक पडणार, अशी कुचेष्टा करणारी मंडळीही आज मूर्तीदान चळवळीला प्रतिसाद देत आहेत, हा सकारात्मक बदल घडल्याचे राऊत म्हणतात.चित्रकार, शिल्पकार, फोटोग्राफर, व्हिडीओग्राफर, अभिनय, नाटक, लेखन, शाहिरी, काव्य यांसारख्या नानाविध कलाक्षेत्रांत मुशाफिरी करणाऱ्या राऊत यांनी बदलाची सुरुवात घरापासून या विचारांतून बुद्धीदाता गणेशाचे घरातून विसर्जन न करण्याचा निर्णय घेतला आणि २२ वर्षांपूर्वी छोट्या फायबरच्या गणेशाची प्रतिष्ठापना केली.

गणेशोत्सवात या मूर्तीची षोडशोपचारे यथासांग पूजा, आरती केली जाते. त्यानंतर उत्तरपूजा करून हा गणपती पुन्हा शोकेसमध्ये ठेवला जातो. याला त्यांच्या पत्नी आणि कन्याही साथ देतात.

गणेशाचा आशीर्वाद असल्यामुळेच इतके कलाप्रकार मला अवगत आहेत. कलाकार असल्यामुळे त्याचे विसर्जन न करता गणेशोत्सवात मूर्तीसमोर एखादे नवे लेखन आणि काव्यनिर्मिती करतो, ही पूजा मी मानतो. आजकाल उत्सवातील भाव बाजूला पडून आवाज, नाचगाणे यांसारखे हिडीस आणि बीभत्स प्रकार वाढू लागले आहेत. त्याऐवजी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हायला पाहिजे.राजू राऊतशिवशाहीर, कलावंत, कोल्हापूर

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवkolhapurकोल्हापूर