शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

ग्रामविकास विभागाचा अजब फतवा, वीजबिल न वाढवता हायमास्ट दिवे बसवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 12:52 IST

राज्यातील २८ हजारांहून ग्रामपंचायती असून, यातील अनेक ग्रामपंचायतींची वीजबिले आणि पाणी बिले थकीत

समीर देशपांडे

कोल्हापूर ‘गावात हायमास्ट दिवे बसवा, परंतु वीजबिल वाढता कामा नये,’ असा अजब फतवा ग्रामविकास विभागाने काढला आहे. वीजबिलामध्ये वाढ होणार नाही, या अटींच्या अधीन राहून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी हायमास्ट दिवे बसविण्याबाबत परवानगी द्यायची की नाही, याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे कोणी अधिकारी ही जबाबदारीही घेण्याची शक्यता कमी आहे.

राज्यातील २८ हजारांहून ग्रामपंचायती असून, यातील अनेक ग्रामपंचायतींची वीजबिले आणि पाणी बिले थकीत आहेत. अशातच अनेक ग्रामपंचायती, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्यांनी आपल्या मतदारसंघात हायमास्ट दिवे लावण्याचा सपाटा लावला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांंच्या निवडणुका तोंडावर असल्याने चौकच्या चौक उजळून टाकण्यासाठी सदस्यांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे.

यामुळे आणखी वीजबिले वाढून ग्रामपंचायती अडचणीत येऊ नयेत, म्हणून ८ डिसेंबर, २०२१ला ग्रामविकास विभागाने एक परिपत्रक काढून ग्रामपंचायतींच्या रस्त्यांवर हायमास्ट दिवे बसवू नयेत, अशा लेखी सूचना दिल्या, परंतु याच दरम्यान अनेक पातळ्यांवर हायमास्ट दिवे बसविण्याबाबत निविदा प्रक्रिया झाल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या.

अनेक सदस्य आणि विशेषत समाजकल्याण समितीचे सभापती व सदस्यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन हायमास्ट दिवे लावण्याबाबत परवानगी देण्याची मागणी केली होती. त्यामुळे सुवर्णमध्य काढत परिपत्रकानुसार हायमास्ट बसवण्यासाठी परवानगी देण्यात आली, परंतु त्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तसंच ही मान्यता केवळ २०२१/२२ या आर्थिक वर्षासाठीच देण्यात आली असून, कोणत्याही परिस्थितीत ही बाब पूर्वोदोहरण म्हणून समजण्यात येणार नाही, असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

हायमास्टचे बिल पाच पट

- गावातील महावितरणच्या पोलवरील एलईडीच्या एका दिव्याचे मासिक बिल ३०० रुपये ते ४०० रुपये येते, तर हेच हायमास्टचे बिल १,५०० रुपये ते १,७०० रुपयांपर्यंत येते.- त्यामुळे हायमास्ट दिवे लावा, पण वीजबिल वाढता कामा नये, हे गणित कसे बसवायचे, असा प्रश्न मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसमोर उभा ठाकणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरelectricityवीजRural Developmentग्रामीण विकास