शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
4
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
5
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
6
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
7
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
8
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
9
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
10
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
11
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
12
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
13
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
14
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
15
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
20
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
Daily Top 2Weekly Top 5

योग, गुरुपरंपरा, मातृशक्तीमुळेच भारतीय संस्कृती जिवंत

By admin | Updated: January 23, 2015 00:36 IST

विजय भटकर : भारतीय संस्कृती महोत्सवात चौथ्या दिवशीही मोठी गर्दी;

कोल्हापूर : योग, गुरुपरंपरा आणि मातृशक्तीमुळेच भारतीय संस्कृती जिवंत आहे. संस्कृती आपल्याला प्रेरणा देण्यास शिकविते. ही संस्कृती आणि युवापिढीच्या ताकदीवर आपला देश विश्वगुरू बनणार आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी आज, गुरुवारी येथे केले. विविधतेने नटलेली भारतीय संस्कृती पाहण्यासाठी कणेरी (ता. करवीर) येथील सिद्धगिरी मठावर सलग चौथ्या दिवशी भाविक, नागरिकांची गर्दी कायम राहिली.भारतीय संस्कृती उत्सवातील युवाज्ञानोत्सवात अध्यक्षपदावरून ते बोलत होते. यावेळी योगगुरू रामदेवबाबा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांची नात राजश्री चौधरी, नोबेल पुरस्कार विजेते डॉ. महादेव तलवार, गोव्याचे विधानसभा अध्यक्ष राजेंद्र आर्लेकर, ‘बॉर्डरलेस’चे अधिक कदम, आंतरराष्ट्रीय शिक्षणतज्ज्ञ गुरुराज करजगी, ओडिसातील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप पुरोहित प्रमुख उपस्थित होते.रामदेवबाबा म्हणाले, डॉक्टरकी तसेच अन्य स्वरूपांतील पदव्या सहजासहजी मिळत आहेत. अशी पदवी मिळत असली तरी त्यामुळे शिक्षण आणि संस्कृती कमी होत आहे. देशाला बलवान बनविण्यासाठी संस्कारपूर्ण शिक्षणाची गरज आहे. ‘कोणतीही गोष्ट एकदा करून बघितलीच पाहिजे’ हा आजच्या युवापिढीला ‘व्हायरस’ लागला आहे. (प्रतिनिधी)कोण काय म्हणाले...

संस्कारक्षम शिक्षणाची गरज : रामदेवबाबाराजश्री चौधरी : युवकांना पूर्ण स्वातंत्र्य देण्यासह सुदृढ भारत घडविण्यासाठी नेताजी बोस यांनी निश्चित केलेल्या धोरणांची फाईल सरकारकडे अडकून आहे. ती खुली करण्यात यावी. स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान करणारी ‘कॉमनवेल्थ’ स्पर्धा बंद व्हावी.गुरुराज करजगी : जे बोलतो तेच करण्याची पद्धती शिक्षणात यावी. पुस्तकी ज्ञानाऐवजी मूल्याधिष्ठित शिक्षण देणे उपयुक्त ठरणारे आहे.प्रदीप पुरोहित : राष्ट्रउभारणी हे विद्यार्थ्यांचे लक्ष्य असावे. जनतेचा सरकारवरील विश्वास उडाला आहे. सरकार न्याय देत नसल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे. अशा स्थितीत युवकांनी संघटितपणे राष्ट्र उभारणी, समाजप्रबोधनाचे काम करावे.डॉ. तलवार : राष्ट्र उभारणीत युवकांनी ‘डीआरडीओ’च्या माध्यमातून पुढाकार घ्यावा.अधिक कदम : देशाच्या ‘बॉर्डर’ सुरक्षित नाहीत. तेथील जमिनी आपण मिळविल्या; पण लोक अजूनही आपल्यापासून दूर आहेत. त्यांना प्रेमाने आपलेसे केले पाहिजे. देशातील युवक काम करायला तयार आहेत; पण त्यांना साथ मिळत नसल्याचे वास्तव आहे.