शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
2
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
3
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
4
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
5
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
6
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
7
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
8
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
9
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
10
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
11
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
12
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
13
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
14
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
15
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
16
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
17
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
18
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
19
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
20
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत

वाढत्या उन्हाने खरीप पिकांनी माना टाकल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 00:45 IST

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : गेले दहा-बारा दिवस पावसाने दडी मारल्याने कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील अकरा लाख हेक्टरवरील खरीप पिके अडचणीत आली असून, पिकांना माना टाकण्यास सुरुवात केली आहे. डोंगरमाथ्यावरील पिके करपू लागल्याने बळिराजा हवालदिल झाला आहे. तीन महिने सतत पाऊस झाल्याने जमिनीला वाफसा मिळाला नाही आणि आता ...

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : गेले दहा-बारा दिवस पावसाने दडी मारल्याने कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील अकरा लाख हेक्टरवरील खरीप पिके अडचणीत आली असून, पिकांना माना टाकण्यास सुरुवात केली आहे. डोंगरमाथ्यावरील पिके करपू लागल्याने बळिराजा हवालदिल झाला आहे. तीन महिने सतत पाऊस झाल्याने जमिनीला वाफसा मिळाला नाही आणि आता पावसाने ओढ धरल्याने जमीन तडकू लागली आहे.खरीप पेरणीला पोषक असाच पाऊस राहिल्याने कोल्हापूर विभागातील पेरण्यांना गती आली. सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत खरिपात प्रामुख्याने भात, सोयाबीन, भुईमूग, बाजरी ही पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. वेळेत झालेल्या पावसामुळे पिकांची उगवण जोमात झाली; पण आॅगस्टअखेर तीन महिने एकसारखा पाऊस राहिल्याने जमिनीला वाफसा मिळाला नाही. पिकांची वाढ खुंटली आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला; पण पावसाने एकदमच दडी मारली. गेले दहा-बारा दिवस एक थेंबही पडलेला नाही. त्यात कडक ऊन्हाने कोल्हापूर विभागातील अकरा लाख हेक्टरवरील पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली आहे. पावसावर अवलंबून असणाºया डोंगरमाथा, माळरानावरील पिके अडचणीत आली आहेत.दुष्काळ ओला म्हणायची की सुका?तीन महिने झालेल्या पावसाने पिके गेल्याने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी झाली. आता उरलीसुरली पिके हातातोंडाला आली असताना पावसाने दडी मारल्याने ‘सुका’ दुष्काळ जाहीर करा, असे म्हणण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.सहा तालुक्यांत५० टक्क्यांपेक्षा पाऊस कमीकोल्हापूर विभागातील माण, फलटण, जत, तासगाव, आटपाडी, कवठेमहांकाळ या तालुक्यात सरासरीच्या ५० टक्क्यापेक्षापाऊस कमी झाला आहे.सर्वांत कमी पाऊस माण तालुक्यात साडेतीन महिन्यात केवळ १५५ मिलिमीटर (४१ टक्के) पाऊस झाला आहे; तर सर्वाधिक पाऊस शाहूवाडी व कागल तालुक्यांत (१५७ टक्के) झाला आहे.जिल्हानिहाय पेरणी हेक्टरमध्ये व पाऊस असाजिल्हा पेरणी गाळपासाठी पाऊसउपलब्ध उसाचे क्षेत्र मिलिमीटरसातारा ४.०८ लाख ८२ हजार ४८४ ११५८०सांगली ३.३७ लाख ८९ हजार ९१८ ३२२७कोल्हापूर ३.९० लाख १ लाख ४९ हजार २८० १८१७८