शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या उन्हाने खरीप पिकांनी माना टाकल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 00:45 IST

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : गेले दहा-बारा दिवस पावसाने दडी मारल्याने कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील अकरा लाख हेक्टरवरील खरीप पिके अडचणीत आली असून, पिकांना माना टाकण्यास सुरुवात केली आहे. डोंगरमाथ्यावरील पिके करपू लागल्याने बळिराजा हवालदिल झाला आहे. तीन महिने सतत पाऊस झाल्याने जमिनीला वाफसा मिळाला नाही आणि आता ...

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : गेले दहा-बारा दिवस पावसाने दडी मारल्याने कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील अकरा लाख हेक्टरवरील खरीप पिके अडचणीत आली असून, पिकांना माना टाकण्यास सुरुवात केली आहे. डोंगरमाथ्यावरील पिके करपू लागल्याने बळिराजा हवालदिल झाला आहे. तीन महिने सतत पाऊस झाल्याने जमिनीला वाफसा मिळाला नाही आणि आता पावसाने ओढ धरल्याने जमीन तडकू लागली आहे.खरीप पेरणीला पोषक असाच पाऊस राहिल्याने कोल्हापूर विभागातील पेरण्यांना गती आली. सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत खरिपात प्रामुख्याने भात, सोयाबीन, भुईमूग, बाजरी ही पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. वेळेत झालेल्या पावसामुळे पिकांची उगवण जोमात झाली; पण आॅगस्टअखेर तीन महिने एकसारखा पाऊस राहिल्याने जमिनीला वाफसा मिळाला नाही. पिकांची वाढ खुंटली आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला; पण पावसाने एकदमच दडी मारली. गेले दहा-बारा दिवस एक थेंबही पडलेला नाही. त्यात कडक ऊन्हाने कोल्हापूर विभागातील अकरा लाख हेक्टरवरील पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली आहे. पावसावर अवलंबून असणाºया डोंगरमाथा, माळरानावरील पिके अडचणीत आली आहेत.दुष्काळ ओला म्हणायची की सुका?तीन महिने झालेल्या पावसाने पिके गेल्याने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी झाली. आता उरलीसुरली पिके हातातोंडाला आली असताना पावसाने दडी मारल्याने ‘सुका’ दुष्काळ जाहीर करा, असे म्हणण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.सहा तालुक्यांत५० टक्क्यांपेक्षा पाऊस कमीकोल्हापूर विभागातील माण, फलटण, जत, तासगाव, आटपाडी, कवठेमहांकाळ या तालुक्यात सरासरीच्या ५० टक्क्यापेक्षापाऊस कमी झाला आहे.सर्वांत कमी पाऊस माण तालुक्यात साडेतीन महिन्यात केवळ १५५ मिलिमीटर (४१ टक्के) पाऊस झाला आहे; तर सर्वाधिक पाऊस शाहूवाडी व कागल तालुक्यांत (१५७ टक्के) झाला आहे.जिल्हानिहाय पेरणी हेक्टरमध्ये व पाऊस असाजिल्हा पेरणी गाळपासाठी पाऊसउपलब्ध उसाचे क्षेत्र मिलिमीटरसातारा ४.०८ लाख ८२ हजार ४८४ ११५८०सांगली ३.३७ लाख ८९ हजार ९१८ ३२२७कोल्हापूर ३.९० लाख १ लाख ४९ हजार २८० १८१७८