शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

वाढत्या उन्हाने खरीप पिकांनी माना टाकल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 00:45 IST

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : गेले दहा-बारा दिवस पावसाने दडी मारल्याने कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील अकरा लाख हेक्टरवरील खरीप पिके अडचणीत आली असून, पिकांना माना टाकण्यास सुरुवात केली आहे. डोंगरमाथ्यावरील पिके करपू लागल्याने बळिराजा हवालदिल झाला आहे. तीन महिने सतत पाऊस झाल्याने जमिनीला वाफसा मिळाला नाही आणि आता ...

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : गेले दहा-बारा दिवस पावसाने दडी मारल्याने कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील अकरा लाख हेक्टरवरील खरीप पिके अडचणीत आली असून, पिकांना माना टाकण्यास सुरुवात केली आहे. डोंगरमाथ्यावरील पिके करपू लागल्याने बळिराजा हवालदिल झाला आहे. तीन महिने सतत पाऊस झाल्याने जमिनीला वाफसा मिळाला नाही आणि आता पावसाने ओढ धरल्याने जमीन तडकू लागली आहे.खरीप पेरणीला पोषक असाच पाऊस राहिल्याने कोल्हापूर विभागातील पेरण्यांना गती आली. सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत खरिपात प्रामुख्याने भात, सोयाबीन, भुईमूग, बाजरी ही पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. वेळेत झालेल्या पावसामुळे पिकांची उगवण जोमात झाली; पण आॅगस्टअखेर तीन महिने एकसारखा पाऊस राहिल्याने जमिनीला वाफसा मिळाला नाही. पिकांची वाढ खुंटली आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला; पण पावसाने एकदमच दडी मारली. गेले दहा-बारा दिवस एक थेंबही पडलेला नाही. त्यात कडक ऊन्हाने कोल्हापूर विभागातील अकरा लाख हेक्टरवरील पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली आहे. पावसावर अवलंबून असणाºया डोंगरमाथा, माळरानावरील पिके अडचणीत आली आहेत.दुष्काळ ओला म्हणायची की सुका?तीन महिने झालेल्या पावसाने पिके गेल्याने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी झाली. आता उरलीसुरली पिके हातातोंडाला आली असताना पावसाने दडी मारल्याने ‘सुका’ दुष्काळ जाहीर करा, असे म्हणण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.सहा तालुक्यांत५० टक्क्यांपेक्षा पाऊस कमीकोल्हापूर विभागातील माण, फलटण, जत, तासगाव, आटपाडी, कवठेमहांकाळ या तालुक्यात सरासरीच्या ५० टक्क्यापेक्षापाऊस कमी झाला आहे.सर्वांत कमी पाऊस माण तालुक्यात साडेतीन महिन्यात केवळ १५५ मिलिमीटर (४१ टक्के) पाऊस झाला आहे; तर सर्वाधिक पाऊस शाहूवाडी व कागल तालुक्यांत (१५७ टक्के) झाला आहे.जिल्हानिहाय पेरणी हेक्टरमध्ये व पाऊस असाजिल्हा पेरणी गाळपासाठी पाऊसउपलब्ध उसाचे क्षेत्र मिलिमीटरसातारा ४.०८ लाख ८२ हजार ४८४ ११५८०सांगली ३.३७ लाख ८९ हजार ९१८ ३२२७कोल्हापूर ३.९० लाख १ लाख ४९ हजार २८० १८१७८