शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर: कृष्णा, पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ; नृसिंहवाडीतील दत्त मंदिर गेलं पाण्याखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 16:56 IST

मंदिर परिसरातील सर्व साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले

प्रशांत कोडणीकरनृसिंहवाडी : परिसरात पावसाने उघडीप दिली असली तरी कोयना, राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे गेल्या 24 तासात कृष्णा व पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळी दोन फुटाने वाढ झाली असून येथील प्रसिद्ध श्री दत्त मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. दरम्यान श्रींची उत्सवमूर्ती येथील परंपरेनुसार श्री नारायण स्वामी मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात आली आहे. तेथे त्रिकाल पूजा अर्चा चालू आहे.दत्त मंदिर पाण्याखाली गेल्याने देवस्थानमार्फत मंदिर परिसरातील सर्व साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. मंदिर परिसरातील वेदमूर्ती भैरंभट जेरे पुजारी प्रसादालय, धार्मिक विधी हॉल, दशक्रिया विधी हॉल या ठिकाणी पुराचे पाणी आले आहे. बाबर प्लॉटमधील रामनगर येथील काही भागात पाणी शिरु लागल्याने येथील नागरिक स्थलांतराच्या तयारीत आहेत.

नृसिंहवाडी गावच्या तिन्ही बाजूंनी नदी असल्याने पुराचे पाणी गावाला वेढण्यास सुरुवात झाली आहे. नृसिंहवाडी-औरवाड या मार्गावरील जुना पूल पाण्याखाली गेला असला तरी नवीन पुलावरून वाहतूक सुरु आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDatta Mandirदत्त मंदिरKolhapur Floodकोल्हापूर पूर