शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

उत्पन्न, पगार खर्च ‘सेम’

By admin | Updated: December 24, 2015 00:34 IST

महापालिकेला एलबीटीचा फटका : पगारासाठीही विलंब; विकासकामांना कात्री

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत म्हणजे एलबीटी होय; पण एलबीटीसह इतर विभागांतून जमा होणारी रक्कम ही साधारण प्रतिमहा १८ कोटी रुपयांपर्यंत जात असली तरी तितकीच रक्कम पगार आणि पथदिवे, पाणी उपशाच्या वीजबिलावर खर्च होत असल्याने महापालिकेचे हात रिकामेच राहत आहेत. त्याचा परिणाम हळूहळू विकासकामांवर जाणवत आहे. त्यामुळे नजीकच्या काळात विकासकामांना कात्री लागण्याची, कर्मचाऱ्यांचे पगार विलंबाने होणार असल्याची शक्यता महापालिका वर्तुळातून वर्तविली जात आहे. शहराची जकात गेली अन् शासनाने ‘एलबीटी’ ही योजना आणली; पण ही योजना वादग्रस्त बनली आहे. व्यापाऱ्यांना एलबीटी १ एप्रिल २०११ पासून लागू करण्यात आली; तर ती १ आॅगस्ट २०१५ रोजी बंद करण्यात आली. त्यासाठी शासनाने महानगरपालिकांना अनुदान रूपाने रक्कम देण्याचे जाहीर केले. शहरातील फक्त ज्या व्यापाऱ्यांची वार्षिक उलाढाल ५० कोटींपेक्षा अधिक आहे, त्यांनाच एलबीटी भरावा लागत आहे. पण मुळातच शहरात असे अवघे १३ व्यापारी आहेत. त्यामुळे या व्यापाऱ्यांकडून दरमहा सुमारे एक कोटी रुपये जमा होतात, तर एलबीटीच्या तुटीसाठी शासनाकडून दरमहा सहा कोटी ४३ लाख रुपये अनुदान मिळते. याशिवाय घरफाळा, पाणीपुरवठा, नगररचना, इस्टेट, परवाना, आदी विभागांतून असे एकूण दरमहा सुमारे १८ कोटी रुपये जमा होतात; पण पाणीपुरवठा, प्राथमिक शिक्षण मंडळातील कर्मचाऱ्यांवर पगारापोटी तसेच शहरातील पथदिव्यांचे बिल, विजेवरील पाणी उपसा बिल यांसाठी दरमहा एकूण १८ कोटी रक्कम खर्च होते. त्यामुळे महानगरपालिकेच्या हातात शिल्लकच राहत नाही. एखाद्या महिन्यात एलबीटीची रक्कम वसूल होताना हलगर्जीपणा झाल्यास त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारावर जाणवत आहे.त्यामुळे दरमहा १ रोजी होणारा पगार सद्य:स्थितीत १४ तारखेला होत आहे. परिणामी, पगार वेळेवर मिळत नसल्याच्या कर्मचाऱ्यांच्या तक्रारींत भर पडत आहे. नजीकच्या काळात कर्मचाऱ्यांचे पगार आणि विकासकामांवर खर्च करताना अधिकाऱ्यांना कसरत करावी लागणार आहे. याशिवाय शहरातील सुमारे तीन हजारांहून अधिक व्यापाऱ्यांच्या एलबीटीबाबत त्रांगडे झाल्याने त्यांच्या सुनावण्याही सुरू आहेत. एक कोटीपेक्षा जास्त वार्षिक व्यवहार असणाऱ्या ८० व्यापाऱ्यांच्या सुनावण्या आयुक्त स्वत: घेत आहेत; तर ५० लाख ते एक कोटी रुपयांपर्यंतच्या ८० व्यापाऱ्यांच्या सुनावण्या अतिरिक्त आयुक्तांकडे सुरू आहेत. त्याशिवाय ५० लाखांपेक्षा कमी व्यवहार असणाऱ्या सुमारे ३००० व्यापाऱ्यांच्या सुनावण्या अन्य अधिकाऱ्यांकडे सुरू आहेत. (प्रतिनिधी)उद्दिष्टपूर्तीसाठी पुढील तीन महिनेमहानगरपालिकेच्या उत्पन्नाचे स्रोत असणाऱ्या सर्व विभागांना २०१५-१६ साठी उद्दिष्ट ठरवून दिलेले आहे. आर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघ्या तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला असतानाही सद्य:स्थितीत कोणत्याही विभागाचे उद्दिष्ट ५० टक्केसुद्धा पूर्ण झालेले नाही. त्यामुळे पुढील तीन महिन्यांत उद्दिष्टपूर्तीसाठी अधिकाऱ्यांना कसरत करावी लागणार आहे. प्रमुख विभागांना वसुलीचे दिलेले उद्दिष्ट पुढीलप्रमाणे : एलबीटी- १०५ कोटी, घरफाळा - ४२ कोटी, पाणीपुरवठा - ५२ कोटी, नगररचना - ५५ कोटी रुपये. कर्जाचे हप्ते भरताना कसरतविविध माध्यमांतून जमा होणारी रक्कम ही पगारापोटीच खर्च होऊ लागल्याने त्याचा शहरातील रस्ते, गटारी, आदी विकासकामांवर हळूहळू ताण जाणवत आहे. याशिवाय शहराच्या विकासासाठी रस्ते, एसटीपी प्रकल्प, काळम्मावाडी थेट पाईपलाईन, आदी प्रकल्पांसाठी महानगरपालिकेचा हिस्सा भरावा लागल्याने त्यासाठी काढलेल्या कर्जाचे हप्ते भरताना महापालिकेला तारेवरची कसरत करावी लागत आहे.