शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

नवीन आयटी धोरणामध्ये कोल्हापूरचा समावेश - उद्योगमंत्री उदय सामंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 13:30 IST

नवीन आयटी सेंटर उभारणी करण्याबाबत धोरण तयार करण्याची कार्यवाही सुरू

कोल्हापूर : नवीन आयटी धोरणामध्ये कोल्हापूरचा समावेश करून सुशिक्षित स्थानिक युवक-युवतींना नोकऱ्या उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही ग्वाही दिली.कोल्हापूरसह ग्रामीण भागातील सुशिक्षित युवक-युवती आयटी कंपन्यातील नोकरीसाठी पुणे, मुंबई, बंगळुरू, हैदराबाद यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये जातात. अशा सर्व कर्मचाऱ्यांना जिल्हा पातळीवर नोकरी उपलब्ध झाली पाहिजे. सध्या कोल्हापूर येथे आयटी केंद्र सुरू आहे; पण ते लहान स्वरूपात आहे. त्या ठिकाणी आणखी आयटी कंपन्या आल्या पाहिजेत; जेणेकरून नोकऱ्या वाढतील, अशी भूमिका आमदार आबिटकर यांनी मांडली होती.यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, राज्यात सध्याच्या घडीला आयटी हब उभा करण्याबाबत कोणतेही धोरण शासनाकडे नाही; परंतु नवीन आयटी सेंटर उभारणी करण्याबाबत धोरण तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश करण्यात येईल. सध्या कोल्हापूरमधील आयटी पार्कमध्ये १ हजार ते १२०० जण काम करतात; परंतु या केंद्राच्या विस्तारीकरणासाठी प्रयत्न केले जातील.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरUday Samantउदय सामंतITमाहिती तंत्रज्ञान