शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

'शासन आपल्या दारी', कोल्हापूरकरांना नुसतीच आश्वासने मिळाली भारी; पुर्ततेची जोड कधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2023 14:23 IST

दहा महिन्यांत ७६२ कोटी रुपये कोल्हापूरला दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले; परंतु हा आकडा ऐकूनच कोल्हापूरकरांना आश्चर्य वाटले

कोल्हापूर : मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत येथील तपोवन मैदानावर झालेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमातून व्यक्तिगत लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ जरूर झाले; परंतु कोल्हापूरच्या मूळ प्रश्नांची मात्र फारशी सोडवणूक झाली नाही. मुख्यमंत्र्यांसह इतर नेत्यांनी केलेली भाषणे म्हणजे आश्वासनांचाच पाऊस होता. त्यामुळे शासन कोल्हापूरच्या दारी; परंतु आश्वासने नुसतीच मिळाली भारी, अशीच प्रतिक्रिया लोकांतून उमटली. दहा महिन्यांत ७६२ कोटी रुपये कोल्हापूरला दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले; परंतु हा आकडा ऐकूनच कोल्हापूरकरांना आश्चर्य वाटले. कोल्हापूरच्या सध्याच्या सर्वांत महत्त्वाच्या व ऐरणीवरील दोन मागण्या होत्या. त्यातील एका मागणीकडे मुख्यमंत्र्यांनी पुरते दुर्लक्ष केले आणि एका मागणीचे पुन्हा आश्वासन दिले. त्यातील पहिली आणि कोल्हापूरच्या विकासाशी संबंधित मागणी म्हणजे हद्दवाढ. मुख्यमंत्री स्वत: नगरविकासमंत्री असताना त्यांनी हद्दवाढ करण्यासंदर्भात सकारात्मक भूमिका घेतली होती व त्याचा प्रस्तावही पाठवण्याची सूचना केली होती. त्यानुसार महापालिकेने १८ गावे व दोन औद्योगिक वसाहतीचा प्रस्ताव पाठवला; परंतु त्यावर पुढे काहीच झाले नाही. मध्यंतरी महापालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली होती, त्यामुळे हद्दवाढ करण्यास अडचण होती; परंतु आता तशी कोणतीच अडचण नसतानाही मुख्यमंत्र्यांनी त्याकडे पुरते दुर्लक्ष केले. हद्दवाढ हा विषय राजकीय इच्छाशक्तीचा आहे. ती यापूर्वीच्या सरकारने व राज्यकर्त्यांनी दाखवली नाही व आताही तोच अनुभव आहे.दुसरी महत्त्वाची मागणी ती कोल्हापूरच्या सर्किट बेंचबाबत; परंतु त्याबाबतही त्यांनी मुख्य न्यायाधीशांना भेटण्याचेच पुन्हा आश्वासन दिले. हेच आश्वासन यापूर्वीही त्यांनी दिले आहे. कोल्हापूर बार असोसिएशनच्या शिष्टमंडळाने त्यांची मुंबईत जाऊन सहा-सात महिन्यांपूर्वी भेट घेतली व सर्किट बेंचच्या प्रश्नांत निर्णय घेण्याची विनंती केली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आठ दिवसांच्या आत मुख्य न्यायाधीशांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे घसघशीत आश्वासन दिले; परंतु त्याला आता आठ महिने होऊन गेली तरी पुढे काहीच झालेले नाही. त्यामुळे मंगळवारच्या त्यांच्या दौऱ्यात बार असोसिएशनने त्यांना न भेटण्याचा निर्णय घेतला. तुम्ही शिष्टमंडळ घेऊन या, मुख्यमंत्र्यांची भेट घालून देतो असा निरोप त्यांना आला होता; परंतु तेच तेच आश्वासन ऐकायला कशाला जायचे म्हणून वकिलांनी त्याकडे पाठ फिरवली.मुख्यमंत्री शिंदे यांनी पंचगंगा प्रदूषणमुक्त करणार असेही जाहीर करून टाकले; परंतु त्यासाठी कोणताही कृती कार्यक्रम त्यांनी सांगितला नाही. नुसत्या घोषणा देऊन कोल्हापूरची ही जीवनदायिनी कशी प्रदूषणमुक्त होणार याचे उत्तर त्यांनी दिले नाही.आश्वासनांना पुर्ततेची जोड कधी?

  • अंबाबाई, जोतिबा, बाळूमामा या धार्मिक स्थळांच्या विकासासाठी भरघोस निधी देण्याचे अर्थसंकल्पातील आश्वासन पुन्हा या सभेत मुख्यमंत्र्यांनी दिले.
  • उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींचा विस्तार करणार असल्याचे जाहीर केले; परंतू तीन महिन्यांपूर्वी त्यांनी कोल्हापुरात सयाजी हॉटेलमध्ये उद्योजकांच्या परिषदेत हीच घोषणा केली होती.
  • पालकमंत्री दीपक केसरकर यांनी शेंडा पार्कच्या जागेवर सरकारी कार्यालये सुरू करणार असल्याचे पुन्हा जाहीर केले; परंतु तेच जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, हे करण्यासाठी ते का विलंब लावत आहेत याचे उत्तर त्यांनी दिले नाही. 
  • पालकमंत्र्यांनी महापालिकेच्या नवीन इमारतीसाठी १६० कोटी रुपयांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली; परंतु त्यांनी त्याची फारशी दखल घेतली नाही.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरChief Ministerमुख्यमंत्रीEknath Shindeएकनाथ शिंदे