शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
3
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
4
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
5
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
6
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
7
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
8
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
9
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
11
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
12
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
13
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
14
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
15
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
16
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
17
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
18
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
19
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
20
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया

'शासन आपल्या दारी', कोल्हापूरकरांना नुसतीच आश्वासने मिळाली भारी; पुर्ततेची जोड कधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2023 14:23 IST

दहा महिन्यांत ७६२ कोटी रुपये कोल्हापूरला दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले; परंतु हा आकडा ऐकूनच कोल्हापूरकरांना आश्चर्य वाटले

कोल्हापूर : मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत येथील तपोवन मैदानावर झालेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमातून व्यक्तिगत लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ जरूर झाले; परंतु कोल्हापूरच्या मूळ प्रश्नांची मात्र फारशी सोडवणूक झाली नाही. मुख्यमंत्र्यांसह इतर नेत्यांनी केलेली भाषणे म्हणजे आश्वासनांचाच पाऊस होता. त्यामुळे शासन कोल्हापूरच्या दारी; परंतु आश्वासने नुसतीच मिळाली भारी, अशीच प्रतिक्रिया लोकांतून उमटली. दहा महिन्यांत ७६२ कोटी रुपये कोल्हापूरला दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले; परंतु हा आकडा ऐकूनच कोल्हापूरकरांना आश्चर्य वाटले. कोल्हापूरच्या सध्याच्या सर्वांत महत्त्वाच्या व ऐरणीवरील दोन मागण्या होत्या. त्यातील एका मागणीकडे मुख्यमंत्र्यांनी पुरते दुर्लक्ष केले आणि एका मागणीचे पुन्हा आश्वासन दिले. त्यातील पहिली आणि कोल्हापूरच्या विकासाशी संबंधित मागणी म्हणजे हद्दवाढ. मुख्यमंत्री स्वत: नगरविकासमंत्री असताना त्यांनी हद्दवाढ करण्यासंदर्भात सकारात्मक भूमिका घेतली होती व त्याचा प्रस्तावही पाठवण्याची सूचना केली होती. त्यानुसार महापालिकेने १८ गावे व दोन औद्योगिक वसाहतीचा प्रस्ताव पाठवला; परंतु त्यावर पुढे काहीच झाले नाही. मध्यंतरी महापालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली होती, त्यामुळे हद्दवाढ करण्यास अडचण होती; परंतु आता तशी कोणतीच अडचण नसतानाही मुख्यमंत्र्यांनी त्याकडे पुरते दुर्लक्ष केले. हद्दवाढ हा विषय राजकीय इच्छाशक्तीचा आहे. ती यापूर्वीच्या सरकारने व राज्यकर्त्यांनी दाखवली नाही व आताही तोच अनुभव आहे.दुसरी महत्त्वाची मागणी ती कोल्हापूरच्या सर्किट बेंचबाबत; परंतु त्याबाबतही त्यांनी मुख्य न्यायाधीशांना भेटण्याचेच पुन्हा आश्वासन दिले. हेच आश्वासन यापूर्वीही त्यांनी दिले आहे. कोल्हापूर बार असोसिएशनच्या शिष्टमंडळाने त्यांची मुंबईत जाऊन सहा-सात महिन्यांपूर्वी भेट घेतली व सर्किट बेंचच्या प्रश्नांत निर्णय घेण्याची विनंती केली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आठ दिवसांच्या आत मुख्य न्यायाधीशांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे घसघशीत आश्वासन दिले; परंतु त्याला आता आठ महिने होऊन गेली तरी पुढे काहीच झालेले नाही. त्यामुळे मंगळवारच्या त्यांच्या दौऱ्यात बार असोसिएशनने त्यांना न भेटण्याचा निर्णय घेतला. तुम्ही शिष्टमंडळ घेऊन या, मुख्यमंत्र्यांची भेट घालून देतो असा निरोप त्यांना आला होता; परंतु तेच तेच आश्वासन ऐकायला कशाला जायचे म्हणून वकिलांनी त्याकडे पाठ फिरवली.मुख्यमंत्री शिंदे यांनी पंचगंगा प्रदूषणमुक्त करणार असेही जाहीर करून टाकले; परंतु त्यासाठी कोणताही कृती कार्यक्रम त्यांनी सांगितला नाही. नुसत्या घोषणा देऊन कोल्हापूरची ही जीवनदायिनी कशी प्रदूषणमुक्त होणार याचे उत्तर त्यांनी दिले नाही.आश्वासनांना पुर्ततेची जोड कधी?

  • अंबाबाई, जोतिबा, बाळूमामा या धार्मिक स्थळांच्या विकासासाठी भरघोस निधी देण्याचे अर्थसंकल्पातील आश्वासन पुन्हा या सभेत मुख्यमंत्र्यांनी दिले.
  • उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींचा विस्तार करणार असल्याचे जाहीर केले; परंतू तीन महिन्यांपूर्वी त्यांनी कोल्हापुरात सयाजी हॉटेलमध्ये उद्योजकांच्या परिषदेत हीच घोषणा केली होती.
  • पालकमंत्री दीपक केसरकर यांनी शेंडा पार्कच्या जागेवर सरकारी कार्यालये सुरू करणार असल्याचे पुन्हा जाहीर केले; परंतु तेच जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, हे करण्यासाठी ते का विलंब लावत आहेत याचे उत्तर त्यांनी दिले नाही. 
  • पालकमंत्र्यांनी महापालिकेच्या नवीन इमारतीसाठी १६० कोटी रुपयांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली; परंतु त्यांनी त्याची फारशी दखल घेतली नाही.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरChief Ministerमुख्यमंत्रीEknath Shindeएकनाथ शिंदे