शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
5
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
6
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
7
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
8
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
9
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
10
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
11
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
12
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
13
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
14
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
15
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
16
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
17
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
18
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
19
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
20
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!

पंचगंगा प्रदूषण रोखण्यात सुधारणा

By admin | Updated: June 19, 2015 00:36 IST

चोक्कलिंगम् : ‘एसटीपी’ पूर्ण क्षमतेने सहा महिन्यांत सुरू

कोल्हापूर : पंचगंगा प्रदूषण रोखण्यासंदर्भात राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत आपण पूर्णत: समाधानी नसलो तरी या कामात सुधारणा मात्र नक्की झाल्या आहेत, असा दावा पुणे विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम् यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी बोलताना केला. शहरातील सर्व प्रकारच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यास अद्याप सहा महिन्यांचा कालावधी लागेल, असेही चोक्कलिंगम् यांनी सांगितले. पंचगंगा प्रदूषणाचा आढावा घेण्यासाठी चोक्कलिंगम् कोल्हापुरात आले होते. बैठक झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मागीलवेळी मी जेव्हा आलो होतो, त्यापेक्षा यावेळी सुधारणा झाली असल्याचे आपणाला पाहायला मिळाले. मनपाच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील (एसटीपी) पाणी बाहेर पडणार आहे, तेथून पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. सध्याच्या एसटीपीमधून पन्नास टक्के पाण्यावर प्रक्रिया होत असून तो पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करायचा झाला तर त्यासाठी आणखी सहा महिने लागणार आहेत. प्रदूषणाची पातळी कमी झाली आहे, असे आमचे मत असले तरी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी पाण्यात बीओडीचे प्रमाण जास्त असल्याचे सांगतात. त्यामुळे संयुक्तपणे पाहणी करून बीओडी तपासणीसाठी नमुने घेण्यास सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)मनपा आणखी एक एसटीपी उभारणार दुधाळी नाला अडविण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून या नाल्याच्या जवळच एक १७ एमएलडी क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्यात येत आहे. लवकरच त्याचे काम पूर्ण होईल शिवाय लाईन बाजार व बापट कॅम्प येथे सांडपाणी उचलण्याकरिता पंपिंग स्टेशन उभारले जाणार असून, त्याच्यासाठीच्या जागा संपादनाची कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना मनपाला दिल्या आहेत, असे सांगून चोक्कलिंगम् म्हणाले की, पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील सांडपाणी प्रक्रिया करण्याबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे जुलै महिन्यापर्यंत पूर्ण सांडपाण्यावर प्रक्रिया करायची आहे. सध्या केवळ पंचवीस टक्के सांडपाण्यावरच प्रक्रिया केली जाते. त्यासाठी उपलब्ध यंत्रणेची पाहणी करून एप्रिल २०१६ पर्यंत मुदत देणे शक्य आहे का, याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाला निर्णय घेण्यास सांगितले. इचलकरंजीतील कामावर लक्ष ठेवा इचलकरंजी शहरातील सांडपाणी वाहून नेण्यासाठी भूमिगत पाईपलाईन टाकण्यात येत असून, या कामाची गती फारशी समाधानकारक नाही. त्यामुळे या कामांवर लक्ष ठेवून सतत आढावा घ्यावा, कामावर लक्ष ठेवावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, मनपा आयुक्त पी. शिवशंकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, अप्पर पोलीस अधीक्षक एस. चैतन्या, आदी उपस्थित होते. साखर कारखान्यांनी क्षमता वाढवावीसाखर कारखान्यांचे सांडपाणी प्रक्रिया आहेत का, असतील तर ते पूर्ण क्षमतेचे आहेत का याची तपासणी करण्यास सांगण्यात आले आहे. ज्या कारखान्यांकडे पुरेशा क्षमतेचे प्रक्रिया केंद्र नसेल त्यांनी पुढील हंगाम सुरू होण्यापूर्वी पूर्ण क्षमतेची करावीत, अशा सूचना देण्यात आल्याचेही चोक्कलिंगम् यांनी सांगितले. जिल्हा परिषदेला निधी मिळण्यात अडचणीजिल्हा परिषदेने नदीकाठावर असणाऱ्या ३४ गावांतील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याकरिता १०८ कोटींचा प्रस्ताव तयार करून तो कें द्र सरकारकडे पाठविण्यात आला असला तरी त्याला निधी मिळण्यात अडचणी आहेत. त्यामुळे दहा ते पंधरा हजार लोकसंख्या असणाऱ्या पाच ते दहा गावांची निवड करून त्यांना डीपीडीसीमधून किंवा ‘नाबार्ड’कडून निधी घेऊन यंत्रणा उभी करता येईल का, याचा विचार आम्ही करत आहेत, असे चोक्कलिंगम् यांनी सांगितले.