शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पंचगंगा प्रदूषण रोखण्यात सुधारणा

By admin | Updated: June 19, 2015 00:36 IST

चोक्कलिंगम् : ‘एसटीपी’ पूर्ण क्षमतेने सहा महिन्यांत सुरू

कोल्हापूर : पंचगंगा प्रदूषण रोखण्यासंदर्भात राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत आपण पूर्णत: समाधानी नसलो तरी या कामात सुधारणा मात्र नक्की झाल्या आहेत, असा दावा पुणे विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम् यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी बोलताना केला. शहरातील सर्व प्रकारच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यास अद्याप सहा महिन्यांचा कालावधी लागेल, असेही चोक्कलिंगम् यांनी सांगितले. पंचगंगा प्रदूषणाचा आढावा घेण्यासाठी चोक्कलिंगम् कोल्हापुरात आले होते. बैठक झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मागीलवेळी मी जेव्हा आलो होतो, त्यापेक्षा यावेळी सुधारणा झाली असल्याचे आपणाला पाहायला मिळाले. मनपाच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील (एसटीपी) पाणी बाहेर पडणार आहे, तेथून पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. सध्याच्या एसटीपीमधून पन्नास टक्के पाण्यावर प्रक्रिया होत असून तो पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करायचा झाला तर त्यासाठी आणखी सहा महिने लागणार आहेत. प्रदूषणाची पातळी कमी झाली आहे, असे आमचे मत असले तरी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी पाण्यात बीओडीचे प्रमाण जास्त असल्याचे सांगतात. त्यामुळे संयुक्तपणे पाहणी करून बीओडी तपासणीसाठी नमुने घेण्यास सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)मनपा आणखी एक एसटीपी उभारणार दुधाळी नाला अडविण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून या नाल्याच्या जवळच एक १७ एमएलडी क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्यात येत आहे. लवकरच त्याचे काम पूर्ण होईल शिवाय लाईन बाजार व बापट कॅम्प येथे सांडपाणी उचलण्याकरिता पंपिंग स्टेशन उभारले जाणार असून, त्याच्यासाठीच्या जागा संपादनाची कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना मनपाला दिल्या आहेत, असे सांगून चोक्कलिंगम् म्हणाले की, पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील सांडपाणी प्रक्रिया करण्याबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे जुलै महिन्यापर्यंत पूर्ण सांडपाण्यावर प्रक्रिया करायची आहे. सध्या केवळ पंचवीस टक्के सांडपाण्यावरच प्रक्रिया केली जाते. त्यासाठी उपलब्ध यंत्रणेची पाहणी करून एप्रिल २०१६ पर्यंत मुदत देणे शक्य आहे का, याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाला निर्णय घेण्यास सांगितले. इचलकरंजीतील कामावर लक्ष ठेवा इचलकरंजी शहरातील सांडपाणी वाहून नेण्यासाठी भूमिगत पाईपलाईन टाकण्यात येत असून, या कामाची गती फारशी समाधानकारक नाही. त्यामुळे या कामांवर लक्ष ठेवून सतत आढावा घ्यावा, कामावर लक्ष ठेवावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, मनपा आयुक्त पी. शिवशंकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, अप्पर पोलीस अधीक्षक एस. चैतन्या, आदी उपस्थित होते. साखर कारखान्यांनी क्षमता वाढवावीसाखर कारखान्यांचे सांडपाणी प्रक्रिया आहेत का, असतील तर ते पूर्ण क्षमतेचे आहेत का याची तपासणी करण्यास सांगण्यात आले आहे. ज्या कारखान्यांकडे पुरेशा क्षमतेचे प्रक्रिया केंद्र नसेल त्यांनी पुढील हंगाम सुरू होण्यापूर्वी पूर्ण क्षमतेची करावीत, अशा सूचना देण्यात आल्याचेही चोक्कलिंगम् यांनी सांगितले. जिल्हा परिषदेला निधी मिळण्यात अडचणीजिल्हा परिषदेने नदीकाठावर असणाऱ्या ३४ गावांतील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याकरिता १०८ कोटींचा प्रस्ताव तयार करून तो कें द्र सरकारकडे पाठविण्यात आला असला तरी त्याला निधी मिळण्यात अडचणी आहेत. त्यामुळे दहा ते पंधरा हजार लोकसंख्या असणाऱ्या पाच ते दहा गावांची निवड करून त्यांना डीपीडीसीमधून किंवा ‘नाबार्ड’कडून निधी घेऊन यंत्रणा उभी करता येईल का, याचा विचार आम्ही करत आहेत, असे चोक्कलिंगम् यांनी सांगितले.