शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांमधील अज्ञानाचा विकास संस्थांकडून गैरफायदा, पाच संस्थांत कोट्यवधीचा अपहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 12:14 IST

क्षेत्र एकाचे, कर्ज दुसऱ्याचे

काेल्हापूर : शेतकऱ्यांमधील अज्ञान व सचिवांवर गरजेपेक्षा ठेवलेला अधिक विश्वास यामुळेच सहकारी संस्थांमध्ये अपहार होताना दिसत आहेत. गेल्या दीड वर्षात जिल्ह्यातील पाच मोठ्या विकास संस्थांमध्ये कोट्यवधी रुपयांचे अपहार झाले आहेत. संबधित दोषींवर अपहार रकमेबाबत फौजदारी झाली, संस्थेवर कलम ८८ ची कारवाई झाली. मात्र, वसुलीचे काय? कायदेशीर प्रक्रियेत वसुली अडकली आहे.

सहकारी संस्थांमुळे कोल्हापूरची प्रगती झाली. खऱ्या अर्थाने सहकारामुळेच कोल्हापूर जिल्हा समृध्द झाला. कोल्हापुरातील सहकार चळवळ आजही महाराष्ट्राला दिशादर्शक आहे. मात्र, काही अपप्रवृत्तीमुळे सहकार चळवळ काहीसी बदनाम होताना दिसत आहे. विकास संस्था या ग्रामीण भागातील अर्थवाहिन्या आहेत. मात्र, काही तालुक्यांत या वाहिन्या खिळखिळी करण्याचा प्रयत्न होतो. त्यातूनच दीड वर्षात करवीर, पन्हाळा, चंदगड, हातकणंगले तालुक्यातील पाच संस्थांमध्ये कोट्यवधीचा अपहार झाला आहे. संबधितांवर कारवाई झाली, मात्र वसुली झालेली नाही. एखाद्या संस्थेत अपहार झाला तर दहा-दहा वर्षे वसुली होत नाही. परिणामी, संस्थेचे कामकाज ठप्प होतेच. मात्र, यामध्ये शेतकरी अडकतो.

क्षेत्र एकाचे, कर्ज दुसऱ्याचे

गावातील अनेक शेतकरी विकास संस्थेकडून नियमित कर्ज उचल करतात असे नाही. शासनाकडून बिनव्याजी कर्ज मिळत असल्याने संबंधित व्यक्तीच्या क्षेत्रावर कर्ज उचल करण्याचे प्रकार अनेक ठिकाणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी जागरुक राहिले पाहिजे.

गवती जमिनीवर उसाची उचल

वास्तविक उभ्या पिकांवर शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्याचे धोरण बँकांचे आहे. मात्र अनेक संस्थांमध्ये गवती जमिनीवर ऊस दाखवून पीक उचल केली जाते.

शेतकऱ्यांनी अशी दक्षता घ्यावी...

  • कर्जाची उचल करताना मंजुरी आणि उचलीची खात्री करावी.
  • पीक कर्जाचे पैसे भरताना त्याची पावती घेणे व ती जतन करून ठेवावी.
  • संपूर्ण कर्ज परतफेड केल्यानंतर तसा दाखला घेतला पाहिजे.
  • साखर कारखान्यांकडून परस्पर वसुलीदार येत असेल तर त्याची वेळेत खातरजमा करावी. 

या संस्थांत झाला अपहार -

  • विठ्ठल विकास दिंडनेर्ली, ता. करवीर.
  • विठ्ठल विकास, उंड्री ता. पन्हाळा
  • रवळनाथ विकास, मुगळी ता. चंदगड
  • शिवक्रांती विकास, सावर्डे ता. हातकणंगले
  • दत्त विकास, सावर्डे ता. हातकणंगले 

अपहार झालेल्या संस्थांची चौकशी करून दोषींवर निलंबनाची कारवाई केलेली आहे. मुळात शेतकऱ्यांनी जागरुक राहून व्यवहार केला पाहिजे, चुकीचे आढळत असेल तर संबंधित निबंधक कार्यालयात कळवले पाहिजे. - प्रदीप मालगावे (सचिव, काेल्हापूर जिल्हा देखरेख संघ).

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी