शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

शेतकऱ्यांमधील अज्ञानाचा विकास संस्थांकडून गैरफायदा, पाच संस्थांत कोट्यवधीचा अपहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 12:14 IST

क्षेत्र एकाचे, कर्ज दुसऱ्याचे

काेल्हापूर : शेतकऱ्यांमधील अज्ञान व सचिवांवर गरजेपेक्षा ठेवलेला अधिक विश्वास यामुळेच सहकारी संस्थांमध्ये अपहार होताना दिसत आहेत. गेल्या दीड वर्षात जिल्ह्यातील पाच मोठ्या विकास संस्थांमध्ये कोट्यवधी रुपयांचे अपहार झाले आहेत. संबधित दोषींवर अपहार रकमेबाबत फौजदारी झाली, संस्थेवर कलम ८८ ची कारवाई झाली. मात्र, वसुलीचे काय? कायदेशीर प्रक्रियेत वसुली अडकली आहे.

सहकारी संस्थांमुळे कोल्हापूरची प्रगती झाली. खऱ्या अर्थाने सहकारामुळेच कोल्हापूर जिल्हा समृध्द झाला. कोल्हापुरातील सहकार चळवळ आजही महाराष्ट्राला दिशादर्शक आहे. मात्र, काही अपप्रवृत्तीमुळे सहकार चळवळ काहीसी बदनाम होताना दिसत आहे. विकास संस्था या ग्रामीण भागातील अर्थवाहिन्या आहेत. मात्र, काही तालुक्यांत या वाहिन्या खिळखिळी करण्याचा प्रयत्न होतो. त्यातूनच दीड वर्षात करवीर, पन्हाळा, चंदगड, हातकणंगले तालुक्यातील पाच संस्थांमध्ये कोट्यवधीचा अपहार झाला आहे. संबधितांवर कारवाई झाली, मात्र वसुली झालेली नाही. एखाद्या संस्थेत अपहार झाला तर दहा-दहा वर्षे वसुली होत नाही. परिणामी, संस्थेचे कामकाज ठप्प होतेच. मात्र, यामध्ये शेतकरी अडकतो.

क्षेत्र एकाचे, कर्ज दुसऱ्याचे

गावातील अनेक शेतकरी विकास संस्थेकडून नियमित कर्ज उचल करतात असे नाही. शासनाकडून बिनव्याजी कर्ज मिळत असल्याने संबंधित व्यक्तीच्या क्षेत्रावर कर्ज उचल करण्याचे प्रकार अनेक ठिकाणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी जागरुक राहिले पाहिजे.

गवती जमिनीवर उसाची उचल

वास्तविक उभ्या पिकांवर शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्याचे धोरण बँकांचे आहे. मात्र अनेक संस्थांमध्ये गवती जमिनीवर ऊस दाखवून पीक उचल केली जाते.

शेतकऱ्यांनी अशी दक्षता घ्यावी...

  • कर्जाची उचल करताना मंजुरी आणि उचलीची खात्री करावी.
  • पीक कर्जाचे पैसे भरताना त्याची पावती घेणे व ती जतन करून ठेवावी.
  • संपूर्ण कर्ज परतफेड केल्यानंतर तसा दाखला घेतला पाहिजे.
  • साखर कारखान्यांकडून परस्पर वसुलीदार येत असेल तर त्याची वेळेत खातरजमा करावी. 

या संस्थांत झाला अपहार -

  • विठ्ठल विकास दिंडनेर्ली, ता. करवीर.
  • विठ्ठल विकास, उंड्री ता. पन्हाळा
  • रवळनाथ विकास, मुगळी ता. चंदगड
  • शिवक्रांती विकास, सावर्डे ता. हातकणंगले
  • दत्त विकास, सावर्डे ता. हातकणंगले 

अपहार झालेल्या संस्थांची चौकशी करून दोषींवर निलंबनाची कारवाई केलेली आहे. मुळात शेतकऱ्यांनी जागरुक राहून व्यवहार केला पाहिजे, चुकीचे आढळत असेल तर संबंधित निबंधक कार्यालयात कळवले पाहिजे. - प्रदीप मालगावे (सचिव, काेल्हापूर जिल्हा देखरेख संघ).

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी