शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
2
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
3
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
4
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
5
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
6
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
7
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
8
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
9
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
10
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
11
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
12
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
13
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
14
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
15
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
16
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
17
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
18
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
19
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
20
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 

..तर भविष्यात सत्ता स्थापणे अवघड, अजित पवारांचे सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2022 16:18 IST

शिंदे-फडणवीस सरकार जाती-धर्मात तेढ निर्माण करणारे सरकार आहे. जातिभेदाचा विचार पुढे घेऊन जाणारे सरकार फार काळ टिकणार नाही.

सरदार चौगुलेकोल्हापूर : आमदार फुटून जर सरकार कोसळायला लागले तर भविष्यात सत्ता स्थापन करणे अवघड आहे. ज्या गद्दारांमुळे आघाडी सरकार पडले, त्या आमदारांसह कोल्हापुरातील गद्दारांनासुद्धा येत्या निवडणुकीत जागा दाखवू. आता मॅच फिक्सिंग न करता एकाच विचारधारेने आणि समजुतीचे राजकारण करूया. त्याची प्रचिती दसऱ्या मेळाव्यात सर्वांना अनुभवायला मिळाली. कोणाचे भाषण सुरू असताना लोक निघून गेले, पैसे देऊन कोणी लोक जमवले आणि पदरमोड करून कोण शिवतीर्थावर आले याकडे राज्यांतील जनतेचे चांगले लक्ष आहे, असा टोला विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लगावला.पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले येथील ग्रामपंचायत सचिवालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ होते. मेळाव्याचे आयोजन बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांनी केले.पवार म्हणाले, राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अजून झालेला नाही. तो कधी होणार हे माहीत नाही; पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच राज्याचा कारभार हाताळत आहेत. सहा जिल्ह्याचे पालमंत्र्यांची जबाबदारी एकट्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे.महाआघाडीचे सरकार असताना निधी वाटपात, विकासकामात कधीही भेदभाव केला नाही. आघाडी सरकारच्या काळात आम्ही आमदार निधी एक कोटीवरून पाच कोटी केला; मात्र हे सरकार निधी वाटपात भेदभाव करत आहे. बरोबरीने राहू दे, विरोधी आमदारांना निम्म्याने तरी विकास निधी द्या. शिंदे-फडणवीस सरकार जाती-धर्मात तेढ निर्माण करणारे सरकार आहे. जातिभेदाचा विचार पुढे घेऊन जाणारे सरकार फार काळ टिकणार नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका महाविकास आघाडीने एकत्र लढविण्यासाठी प्रयत्न करूया.यावेळी माजी मंत्री मुश्रीफ यांचेही भाषण झाले. आमदार राजेश पाटील, शिवसेनेचे माजी आमदार सत्यजीत पाटील, संध्यादेवी कुपेकर, राजू आवळे, जिल्हा अध्यक्ष ए. वाय. पाटील, मानसिंगराव कुपेकर, संतोष धुमाळ उपस्थित होते.

हे असे म्हणाले.. ते असे म्हणाले..

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलायला पाहिजे होते. ते सोडून हे असे म्हणाले आणि ते असे म्हणाले यातच त्यांनी सव्वा तास घेतला, अशी टोला पवार यांनी लगावला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAjit Pawarअजित पवार