शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भाजपाने शंभरचा आकडा केला पार, काँग्रेस १९, ठाकरेंची शिवसेना ९; जाणून घ्या नगर पंचायत अन् नगर परिषदेचे निकाल
2
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
3
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
4
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
5
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
6
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
7
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
8
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
9
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
10
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
11
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
12
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
13
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
14
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
15
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
16
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
17
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
18
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
19
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
20
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
Daily Top 2Weekly Top 5

..तर भविष्यात सत्ता स्थापणे अवघड, अजित पवारांचे सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2022 16:18 IST

शिंदे-फडणवीस सरकार जाती-धर्मात तेढ निर्माण करणारे सरकार आहे. जातिभेदाचा विचार पुढे घेऊन जाणारे सरकार फार काळ टिकणार नाही.

सरदार चौगुलेकोल्हापूर : आमदार फुटून जर सरकार कोसळायला लागले तर भविष्यात सत्ता स्थापन करणे अवघड आहे. ज्या गद्दारांमुळे आघाडी सरकार पडले, त्या आमदारांसह कोल्हापुरातील गद्दारांनासुद्धा येत्या निवडणुकीत जागा दाखवू. आता मॅच फिक्सिंग न करता एकाच विचारधारेने आणि समजुतीचे राजकारण करूया. त्याची प्रचिती दसऱ्या मेळाव्यात सर्वांना अनुभवायला मिळाली. कोणाचे भाषण सुरू असताना लोक निघून गेले, पैसे देऊन कोणी लोक जमवले आणि पदरमोड करून कोण शिवतीर्थावर आले याकडे राज्यांतील जनतेचे चांगले लक्ष आहे, असा टोला विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लगावला.पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले येथील ग्रामपंचायत सचिवालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ होते. मेळाव्याचे आयोजन बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांनी केले.पवार म्हणाले, राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अजून झालेला नाही. तो कधी होणार हे माहीत नाही; पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच राज्याचा कारभार हाताळत आहेत. सहा जिल्ह्याचे पालमंत्र्यांची जबाबदारी एकट्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे.महाआघाडीचे सरकार असताना निधी वाटपात, विकासकामात कधीही भेदभाव केला नाही. आघाडी सरकारच्या काळात आम्ही आमदार निधी एक कोटीवरून पाच कोटी केला; मात्र हे सरकार निधी वाटपात भेदभाव करत आहे. बरोबरीने राहू दे, विरोधी आमदारांना निम्म्याने तरी विकास निधी द्या. शिंदे-फडणवीस सरकार जाती-धर्मात तेढ निर्माण करणारे सरकार आहे. जातिभेदाचा विचार पुढे घेऊन जाणारे सरकार फार काळ टिकणार नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका महाविकास आघाडीने एकत्र लढविण्यासाठी प्रयत्न करूया.यावेळी माजी मंत्री मुश्रीफ यांचेही भाषण झाले. आमदार राजेश पाटील, शिवसेनेचे माजी आमदार सत्यजीत पाटील, संध्यादेवी कुपेकर, राजू आवळे, जिल्हा अध्यक्ष ए. वाय. पाटील, मानसिंगराव कुपेकर, संतोष धुमाळ उपस्थित होते.

हे असे म्हणाले.. ते असे म्हणाले..

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलायला पाहिजे होते. ते सोडून हे असे म्हणाले आणि ते असे म्हणाले यातच त्यांनी सव्वा तास घेतला, अशी टोला पवार यांनी लगावला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAjit Pawarअजित पवार