शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur:..नाहीतर मुश्रीफ, महाडिक यांच्या दारात बसू; भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव यांनी दिला इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 12:22 IST

विधानसभेला एकदिलाने सामोरे गेलो तरच महाराष्ट्र जिंकू

कोल्हापूर : राज्यात आमचे सरकार असतानाही शासकीय समित्यांवर नियुक्त्या होत नसल्याने कार्यकर्त्यांत नाराजी आहे. विधानसभा निवडणुकीनंतर ही प्रक्रिया पार पाडली नाहीतर पालकमंत्री हसन मुश्रीफ व खासदार धनंजय महाडिक यांच्या दारात जाऊन बसूया, असा इशारा भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव यांनी दिला. महायुतीतील तिन्ही पक्षांत समन्वय नाही, विधानसभेला एकदिलाने सामोरे गेलो तरच महाराष्ट्र जिंकू, असेही त्यांनी सांगितले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बुधवारी होणाऱ्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते.मेळावा यशस्वी करण्यासाठी काही सूचना असतील तर मांडा, असे पालकमंत्री मुश्रीफ यांनी सांगितल्यानंतर खासदार धनंजय महाडिक, माजी खासदार संजय मंडलिक बोलले. मंडलिक आपले बोलणे संपवत असताना, ‘महेशरावां’च्या मनात अनेक प्रश्न आहेत, त्याची उघड चर्चा करू नका, मंत्री मुश्रीफ यांच्या कानात सांगा’, असा टोला लगावला.त्यानंतर बोलण्यास सुरुवात केल्यानंतर महेश जाधव म्हणाले, सकाळीच रंकाळ्यावर एका वृत्तवाहिनीने चर्चेसाठी सर्वपक्षियांना बोलावले होते. महायुतीकडून आपण एकटाच होतो. शिंदेसेनेबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसची खुर्ची मोकळी होती. मग, आपली कामे लोकांपर्यंत पोहोचणार कशी? विधानसभा निवडणुकीला आपण एकदिलाने सामोरे गेलो तर महाराष्ट्र जिंकू. शासकीय समित्यांवरील नियुक्त्याबाबत आता बोलणार नाही. विधानसभेनंतर नियुक्त्या केल्या नाही तर मंत्री मुश्रीफ व खासदार महाडिक यांच्या दारात जाऊन बसूया, असे सांगत असताना मंत्री चंद्रकांत पाटील हे पुण्यात असल्याने त्यांना सोडल्याचेही जाधव यांनी सांगितले.फडणवीस यांचे आश्वासन अन्..देवेंद्र फडणवीस २०१४ ला सत्तेवर आल्यानंतर शासकीय समित्यांबाबत कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. पण, त्यांनी पाच वर्षांत न करता २०१९ नंतर करण्याचे आश्वासन दिले. ही पाच वर्षेही गेली, आता २०२४ चे आश्वासन दिल्याचे महेश जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणBJPभाजपाHasan Mushrifहसन मुश्रीफDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिकMahesh Jadhavमहेश जाधव