शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
3
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
4
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
5
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
6
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
7
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
8
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
9
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
10
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
11
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
12
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
13
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
14
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
15
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
16
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
17
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
18
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
19
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
20
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...

Kolhapur:..नाहीतर मुश्रीफ, महाडिक यांच्या दारात बसू; भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव यांनी दिला इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 12:22 IST

विधानसभेला एकदिलाने सामोरे गेलो तरच महाराष्ट्र जिंकू

कोल्हापूर : राज्यात आमचे सरकार असतानाही शासकीय समित्यांवर नियुक्त्या होत नसल्याने कार्यकर्त्यांत नाराजी आहे. विधानसभा निवडणुकीनंतर ही प्रक्रिया पार पाडली नाहीतर पालकमंत्री हसन मुश्रीफ व खासदार धनंजय महाडिक यांच्या दारात जाऊन बसूया, असा इशारा भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव यांनी दिला. महायुतीतील तिन्ही पक्षांत समन्वय नाही, विधानसभेला एकदिलाने सामोरे गेलो तरच महाराष्ट्र जिंकू, असेही त्यांनी सांगितले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बुधवारी होणाऱ्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते.मेळावा यशस्वी करण्यासाठी काही सूचना असतील तर मांडा, असे पालकमंत्री मुश्रीफ यांनी सांगितल्यानंतर खासदार धनंजय महाडिक, माजी खासदार संजय मंडलिक बोलले. मंडलिक आपले बोलणे संपवत असताना, ‘महेशरावां’च्या मनात अनेक प्रश्न आहेत, त्याची उघड चर्चा करू नका, मंत्री मुश्रीफ यांच्या कानात सांगा’, असा टोला लगावला.त्यानंतर बोलण्यास सुरुवात केल्यानंतर महेश जाधव म्हणाले, सकाळीच रंकाळ्यावर एका वृत्तवाहिनीने चर्चेसाठी सर्वपक्षियांना बोलावले होते. महायुतीकडून आपण एकटाच होतो. शिंदेसेनेबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसची खुर्ची मोकळी होती. मग, आपली कामे लोकांपर्यंत पोहोचणार कशी? विधानसभा निवडणुकीला आपण एकदिलाने सामोरे गेलो तर महाराष्ट्र जिंकू. शासकीय समित्यांवरील नियुक्त्याबाबत आता बोलणार नाही. विधानसभेनंतर नियुक्त्या केल्या नाही तर मंत्री मुश्रीफ व खासदार महाडिक यांच्या दारात जाऊन बसूया, असे सांगत असताना मंत्री चंद्रकांत पाटील हे पुण्यात असल्याने त्यांना सोडल्याचेही जाधव यांनी सांगितले.फडणवीस यांचे आश्वासन अन्..देवेंद्र फडणवीस २०१४ ला सत्तेवर आल्यानंतर शासकीय समित्यांबाबत कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. पण, त्यांनी पाच वर्षांत न करता २०१९ नंतर करण्याचे आश्वासन दिले. ही पाच वर्षेही गेली, आता २०२४ चे आश्वासन दिल्याचे महेश जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणBJPभाजपाHasan Mushrifहसन मुश्रीफDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिकMahesh Jadhavमहेश जाधव