शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

Kolhapur: इचलकरंजी महापालिकेला अद्याप जीएसटी परतावा नाही, १,१४८ कोटी राज्य सरकारकडे थकीत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 13:53 IST

विकासकामांना खीळ

अरुण काशीदइचलकरंजी : महापालिका स्थापन होऊन दोन वर्षांचा कालावधी लोटला तरी अद्याप जीएसटीच्या परताव्यामध्ये महापालिकेचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे विकासकामांना खीळ बसत आहे. १,१४८ कोटी रुपये परतावा शासनाकडून येणे अपेक्षित आहे. सरकारने तातडीने निर्णय घेऊन महापालिकेला जीएसटी परतावा देणे गरजेचे आहे.

राज्यातील ‘अ’ वर्ग नगरपालिका असलेल्या इचलकरंजीचे महापालिकेत रूपांतर करण्यात आले. त्यानंतर राज्य सरकारकडून जीएसटीचा परतावा मिळतो. त्यातून कर्मचाऱ्यांचा पगार आणि विकासकामे केली जातात. महापालिका होऊन दोन वर्षे लोटले तरी जीएसटीचा परतावा मिळालेला नाही. नगरपालिका असताना दरमहा सोळा कोटी अनुदान शासनाकडून देणे अपेक्षित होते. परंतु त्यातही कपात करून दरमहा आठ ते नऊ कोटी रुपये देण्यात येत आहेत. त्यातून पगार करणेही मुश्कील बनले आहे.जीएसटीचा परतावा ही महापालिकेची हक्काची रक्कम आहे. शासनाकडून सन २०२२-२०२३ पासून जीएसटीचा परतावा मिळणे अपेक्षित आहे. प्रत्येक वर्षी जीएसटीच्या रकमेत आठ टक्के वाढ होत असते. सन २०२२-२०२३ मध्ये ३५३.८० कोटी, सन २०२३-२०२४ मध्ये ४१२.६७ कोटी, असे ७३५.९० कोटी रुपये अद्याप मिळालेले नाहीत. चालू वर्षाचा विचार केला तर राज्य सरकारकडून ११४८.५७ कोटी रुपये येणे अपेक्षित आहे. ही रक्कम आल्यानंतर महापालिकेची प्रकृती सुधारणार आहे. यापूर्वीचेही २४८ कोटी रुपये शासनाकडून येणे बाकी आहे.त्या रकमेपैकी सहायक अनुदानातून सुमारे ४० कोटी रुपये सरकार देण्यासंदर्भात हालचाली सुरू केल्या आहेत. ही रक्कम कर्मचाऱ्यांची देणी भागविण्यासाठी उपयोगी पडणार आहे. राज्य सरकारने तातडीने हालचाल करून महापालिकेच्या जीएसटी परताव्याची रक्कम देणे आवश्यक बनले आहे.

जीएसटी परताव्यासाठी नेत्यांचे प्रयत्न आवश्यकमहापालिका स्थापन करण्यासाठी गडबड करणाऱ्या नेत्यांनी आता महापालिकेला जीएसटी परतावा मिळण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसेच सध्या राज्यामध्ये आमदार आणि खासदार या दोघांची सत्ता आहे. दोघांनीही जीएसटीचा परतावा आणण्यासाठी शासन दरबारी आपली ताकद दाखवून रक्कम आणली पाहिजे. तरच महापालिकेचा गाडा सुरळीत चालणार आहे...तर विकासकामे करता येणार?शासनाकडून जीएसटीची रक्कम आल्यानंतर त्यातील काही रक्कम भुयारी गटार, रस्ते बांधणी, जलकुंभ उभारणीचा हिस्सा आणि कर्मचाऱ्यांची देणी भागविण्यासाठी खर्च होईल. त्यानंतरही मोठी रक्कम शिल्लक राहील. ती रक्कम ठेव म्हणून ठेवली तरी त्या रकमेच्या व्याजातून महापालिकेला विकासकामे करता येणार आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरichalkaranji-acइचलकरंजीGSTजीएसटीfundsनिधी