शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Kolhapur: इचलकरंजी महापालिकेला अद्याप जीएसटी परतावा नाही, १,१४८ कोटी राज्य सरकारकडे थकीत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 13:53 IST

विकासकामांना खीळ

अरुण काशीदइचलकरंजी : महापालिका स्थापन होऊन दोन वर्षांचा कालावधी लोटला तरी अद्याप जीएसटीच्या परताव्यामध्ये महापालिकेचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे विकासकामांना खीळ बसत आहे. १,१४८ कोटी रुपये परतावा शासनाकडून येणे अपेक्षित आहे. सरकारने तातडीने निर्णय घेऊन महापालिकेला जीएसटी परतावा देणे गरजेचे आहे.

राज्यातील ‘अ’ वर्ग नगरपालिका असलेल्या इचलकरंजीचे महापालिकेत रूपांतर करण्यात आले. त्यानंतर राज्य सरकारकडून जीएसटीचा परतावा मिळतो. त्यातून कर्मचाऱ्यांचा पगार आणि विकासकामे केली जातात. महापालिका होऊन दोन वर्षे लोटले तरी जीएसटीचा परतावा मिळालेला नाही. नगरपालिका असताना दरमहा सोळा कोटी अनुदान शासनाकडून देणे अपेक्षित होते. परंतु त्यातही कपात करून दरमहा आठ ते नऊ कोटी रुपये देण्यात येत आहेत. त्यातून पगार करणेही मुश्कील बनले आहे.जीएसटीचा परतावा ही महापालिकेची हक्काची रक्कम आहे. शासनाकडून सन २०२२-२०२३ पासून जीएसटीचा परतावा मिळणे अपेक्षित आहे. प्रत्येक वर्षी जीएसटीच्या रकमेत आठ टक्के वाढ होत असते. सन २०२२-२०२३ मध्ये ३५३.८० कोटी, सन २०२३-२०२४ मध्ये ४१२.६७ कोटी, असे ७३५.९० कोटी रुपये अद्याप मिळालेले नाहीत. चालू वर्षाचा विचार केला तर राज्य सरकारकडून ११४८.५७ कोटी रुपये येणे अपेक्षित आहे. ही रक्कम आल्यानंतर महापालिकेची प्रकृती सुधारणार आहे. यापूर्वीचेही २४८ कोटी रुपये शासनाकडून येणे बाकी आहे.त्या रकमेपैकी सहायक अनुदानातून सुमारे ४० कोटी रुपये सरकार देण्यासंदर्भात हालचाली सुरू केल्या आहेत. ही रक्कम कर्मचाऱ्यांची देणी भागविण्यासाठी उपयोगी पडणार आहे. राज्य सरकारने तातडीने हालचाल करून महापालिकेच्या जीएसटी परताव्याची रक्कम देणे आवश्यक बनले आहे.

जीएसटी परताव्यासाठी नेत्यांचे प्रयत्न आवश्यकमहापालिका स्थापन करण्यासाठी गडबड करणाऱ्या नेत्यांनी आता महापालिकेला जीएसटी परतावा मिळण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसेच सध्या राज्यामध्ये आमदार आणि खासदार या दोघांची सत्ता आहे. दोघांनीही जीएसटीचा परतावा आणण्यासाठी शासन दरबारी आपली ताकद दाखवून रक्कम आणली पाहिजे. तरच महापालिकेचा गाडा सुरळीत चालणार आहे...तर विकासकामे करता येणार?शासनाकडून जीएसटीची रक्कम आल्यानंतर त्यातील काही रक्कम भुयारी गटार, रस्ते बांधणी, जलकुंभ उभारणीचा हिस्सा आणि कर्मचाऱ्यांची देणी भागविण्यासाठी खर्च होईल. त्यानंतरही मोठी रक्कम शिल्लक राहील. ती रक्कम ठेव म्हणून ठेवली तरी त्या रकमेच्या व्याजातून महापालिकेला विकासकामे करता येणार आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरichalkaranji-acइचलकरंजीGSTजीएसटीfundsनिधी