शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार
2
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
3
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
4
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
5
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
6
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
7
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
8
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
9
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
10
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
11
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
12
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
13
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
14
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
15
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
16
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
17
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
18
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
19
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!

कुसूर, तारूखच्या डोंगरात प्राण्यांसह पक्ष्यांची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 00:23 IST

कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील कुसूर तसेच तारूख परिसरातील डोंगर बंदूकधारी शिकाºयांकडून पिंजला जातोय. दिवसा आणि रात्रीही येथे शिकारी केल्या जात आहेत.

ठळक मुद्देबंदूकधारी शिकाऱ्यांमुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण- टोळीचा वावर

गणेश काटेकर ।कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील कुसूर तसेच तारूख परिसरातील डोंगर बंदूकधारी शिकाºयांकडून पिंजला जातोय. दिवसा आणि रात्रीही येथे शिकारी केल्या जात आहेत. मात्र, या शिकाऱ्यांना कसलीही भीती नसल्याने शिवारात काम करणाºया शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

कुसूरसह तारूख विभाग संपूर्ण डोंगराने वेढला आहे. डोंगरात घनदाट झाडी असल्याने वन्य प्राण्यांची संख्याही समाधानकारक आहे. परिणामी वन्य प्राण्यांची शिकार करणाºयांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. स्थानिकांनपेक्षा बाहेरील अनोळखी बंदूकधारी शिकाºयांचा वावर वाढलेला दिसतो. हे शिकारी सावजासाठी रात्रीच काय पण दिवसाही उघड्यावर बंदूक घेऊन फिरताना दिसत आहेत. त्यांना कसलाही धाक अथवा भीती दिसत नाही. परिणामी शिवारात सावजाची शिकार करताना अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

डोंगरात घनदाट झाडी असल्यामुळे वन्य प्राण्यांची संख्या चांगलीच वाढताना दिसत आहे. बिबट्या, साळींदर, ससा, कोल्हा, खवले मांजर, मोर-लांडोर, रानडुक्कर आदी वन्यप्राण्यांची संख्या चांगली आहे. सध्या डोंगरतील खाद्य, पाणी कमी झाल्याने या प्राण्यांनी खाद्याच्या शोधात आपला मोर्चा डोंगर पायथ्यालगतच्या बागायती शिवारात वळविला असल्याने अनेकदा रस्ता ओलंडताना या प्राण्यांचे दर्शन लोकांना होत आहे. हीच संधी साधून जिभेचे चोचले भागविण्यासाठी काही लोकांनी वन्य प्राण्यांना आपले लक्ष्य बनवले आहे. मोर, लांडोरी पक्ष्यांना दिवसा टिपले जात आहे. तर ससे, साळींदर, खवले मांजर, रानडुक्कर यांचा माग घेऊन रात्रीच्या वेळी कधी जाळ्यात तर कधी बंदुकीच्या निशाण्यावर टिपले जात आहे.

शिकाऱ्यांच्या या वर्तनामुळे शेतात काम करणारा शेतकरीच सावज होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उघड्यावर बंदूक घेऊन फिरणारे हे शिकारी वनविभागाच्या निदर्शनास आले नसतील का?असाही सवाल उपस्थित केला जात आहे.रिक्षाच्या केबलचा शिकारीसाठी वापरसध्या सोशल मीडियावर पशु-पक्षांना पकडण्यासाठी नवनवीन शक्कल लढवून त्यांना जाळ्यात ओढल्याचे व्हिडीओ सर्रास दाखवले जात आहेत. त्याचप्रमाणे अनेक शिकाºयांकडून हे प्रयोग केले जात आहेत. तर सर्वात जास्त रिक्षांना वापरण्यात येणाºया केबलचा फास तयार करून पशुपक्ष्यांची शिकार केली जात असल्याचे दिसून येत आहे.साळींदर पकडण्यासाठी त्याने काढलेल्या बिळाच्या तोंडावर तारेचा फास तयार करून ठेवला जातो तर दुसरीकडे असलेल्या बिळाच्या तोंडावर आग पेटवून धूर सोडला जातो. धुरामुळे साळींदर बाहेर पडते आणि अलगद फासामधे अडकते. मात्र उन्हामुळे डोंगरातील पालापाखोळा वाळल्यामुळे लगेच पेट घेऊन डोंगरांना वणवे लागत आहेत. परिणामी वनसंपत्ती नष्ट होत आहे.