शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
2
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
3
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

मूर्तीसाठी सकारात्मक बाब : अंबाबाई मंदिरातील आर्द्रतेत २५ टक्क्यांनी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 00:25 IST

तज्ज्ञांच्या मतानुसार मूर्तीची झीज होण्यामागे गाभाºयातील व परिसरातील आर्द्रता हे महत्त्वाचे कारण होते. ही आर्द्रता कमी करण्यासाठीच्या काही उपाययोजना त्यांनी सुचविल्या होत्या. त्यात गाभा-यातील व मंदिरातील गर्दी कमी करणे, पाणी, फुलं, फळांचा कमीत कमी वापर, हवा खेळती राहण्यासाठी खिडक्यांसह झरोखे खुले करणे, अशा उपायांचा समावेश होता.

ठळक मुद्दे गर्दी नसल्याचा परिणाम :तापमानातही ०.८ डिग्री सेल्सिअसची घट

कोल्हापूर : कोरोनामुळे जगभरातील नागरिकांना अनेक गंभीर परिणामांना सामोरे जावे लागत असले तरी यानिमित्ताने कोल्हापुरातील श्री अंबाबाईच्या गाभाऱ्यातील आर्द्रता एकदम २५ टक्क्यांनी कमी झाली आहे. अंबाबाई मूर्तीची झीज होण्यामागे आर्द्रतेचे वाढते प्रमाण हे महत्त्वाचे कारण असून, गेले महिनाभर भाविकच नसल्याने आर्द्रतेत घट झाली आहे तर तापमानदेखील ०. ८ डिग्री सेल्सिअसने कमी झाले आहे.

महाराष्ट्रातील साडेतील शक्तीपीठातील प्रमुख देवता असलेल्या श्री अंबाबाईची सध्याची मूर्ती किमान १५०० वर्षांपूर्वीची आहे. पुरातत्त्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी स्वत:हून याबाबतची माहिती दिली आहे. मूर्तीची मोठ्या प्रमाणात झीज झाल्याने पूर्वी १९५५ मध्ये मूर्तीवर वज्रलेप करण्यात आला होता. मात्र, सुमार दर्जाच्या वज्रलेपामुळे मूर्तीची आणखीनच झीज झाली. त्यावर उपाय म्हणून वैकल्पिक वाद निवारण केंद्राच्या मदतीने वर्षानुवर्षे सुरू असलेला वज्रलेपाचा वाद सामंजस्याने मिटला आणि आॅगस्ट २०१५मध्ये अंबाबाईच्या मूर्तीचे रासायनिक संवर्धन करण्यात आले. त्यानंतर मूर्ती पूर्वपदावर आली असली तरी संवर्धन करणाºया अधिकाºयांनी परत जाताना श्रीपूजक व देवस्थान समितीला काही नियमावली घालून दिली होती.

तज्ज्ञांच्या मतानुसार मूर्तीची झीज होण्यामागे गाभाºयातील व परिसरातील आर्द्रता हे महत्त्वाचे कारण होते. ही आर्द्रता कमी करण्यासाठीच्या काही उपाययोजना त्यांनी सुचविल्या होत्या. त्यात गाभा-यातील व मंदिरातील गर्दी कमी करणे, पाणी, फुलं, फळांचा कमीत कमी वापर, हवा खेळती राहण्यासाठी खिडक्यांसह झरोखे खुले करणे, अशा उपायांचा समावेश होता. मात्र, रोज येणाºया भाविकांची संख्या हजारात, तर नवरात्रौत्सव व सणावाराच्या काळात लाखोंमध्ये असते. त्यामुळे या काळात कितीही उपाययोजना केल्या तरी आर्द्रता वाढतेच.

कोरोनामुळे गेले महिनाभर मंदिर बंद आहे. देवीचे रोजचे धार्मिक विधी पार पाडणारे श्रीपूजक, देवस्थान समितीचे मोजके कर्मचारी व सुरक्षा रक्षकवगळता मंदिरात शुकशुकाट आहे. त्यामुळे गाभाºयातील आर्द्रता ५५ टक्क्यांवर आली आहे. हीच आर्द्रता गर्दीच्या वेळी ८० टक्क्यांपर्यंत असते तर तापमान ३३ ते ३४ डिग्री सेल्सिअस इतकी असे, तीदेखील ०.८ टक्क्यांनी कमी झाली आहे. ही आर्द्रता कमी झाल्याने त्याचा सकारात्मक परिणाम देवीच्या मूर्तीवर होणार आहे.

आर्द्रता अशीगर्दीच्या वेळी सध्याच्या काळातगाभारा ७० ते ८० टक्के ५० ते ५५ टक्केपितळी उंबरा ८० ते ८५ टक्के ४० ते ४५ टक्केकासव चौक २८ ते ३२ टक्के २८ ते ३२ टक्के

 

भाविकांचा श्वासोच्छवास, पाणी, हार, फुलं, फळं या कारणांमुळे गाभाऱ्यातील आर्द्रता वाढते. त्यावर समितीकडून उपाययोजना सुरू आहेत. सध्या लॉकडाऊनमुळे मंदिर पूर्ण बंद असल्याने आर्द्रतेत कमालीची घट झाली आहे.- महेश जाधव, अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTempleमंदिर