शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

मूर्तीसाठी सकारात्मक बाब : अंबाबाई मंदिरातील आर्द्रतेत २५ टक्क्यांनी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 00:25 IST

तज्ज्ञांच्या मतानुसार मूर्तीची झीज होण्यामागे गाभाºयातील व परिसरातील आर्द्रता हे महत्त्वाचे कारण होते. ही आर्द्रता कमी करण्यासाठीच्या काही उपाययोजना त्यांनी सुचविल्या होत्या. त्यात गाभा-यातील व मंदिरातील गर्दी कमी करणे, पाणी, फुलं, फळांचा कमीत कमी वापर, हवा खेळती राहण्यासाठी खिडक्यांसह झरोखे खुले करणे, अशा उपायांचा समावेश होता.

ठळक मुद्दे गर्दी नसल्याचा परिणाम :तापमानातही ०.८ डिग्री सेल्सिअसची घट

कोल्हापूर : कोरोनामुळे जगभरातील नागरिकांना अनेक गंभीर परिणामांना सामोरे जावे लागत असले तरी यानिमित्ताने कोल्हापुरातील श्री अंबाबाईच्या गाभाऱ्यातील आर्द्रता एकदम २५ टक्क्यांनी कमी झाली आहे. अंबाबाई मूर्तीची झीज होण्यामागे आर्द्रतेचे वाढते प्रमाण हे महत्त्वाचे कारण असून, गेले महिनाभर भाविकच नसल्याने आर्द्रतेत घट झाली आहे तर तापमानदेखील ०. ८ डिग्री सेल्सिअसने कमी झाले आहे.

महाराष्ट्रातील साडेतील शक्तीपीठातील प्रमुख देवता असलेल्या श्री अंबाबाईची सध्याची मूर्ती किमान १५०० वर्षांपूर्वीची आहे. पुरातत्त्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी स्वत:हून याबाबतची माहिती दिली आहे. मूर्तीची मोठ्या प्रमाणात झीज झाल्याने पूर्वी १९५५ मध्ये मूर्तीवर वज्रलेप करण्यात आला होता. मात्र, सुमार दर्जाच्या वज्रलेपामुळे मूर्तीची आणखीनच झीज झाली. त्यावर उपाय म्हणून वैकल्पिक वाद निवारण केंद्राच्या मदतीने वर्षानुवर्षे सुरू असलेला वज्रलेपाचा वाद सामंजस्याने मिटला आणि आॅगस्ट २०१५मध्ये अंबाबाईच्या मूर्तीचे रासायनिक संवर्धन करण्यात आले. त्यानंतर मूर्ती पूर्वपदावर आली असली तरी संवर्धन करणाºया अधिकाºयांनी परत जाताना श्रीपूजक व देवस्थान समितीला काही नियमावली घालून दिली होती.

तज्ज्ञांच्या मतानुसार मूर्तीची झीज होण्यामागे गाभाºयातील व परिसरातील आर्द्रता हे महत्त्वाचे कारण होते. ही आर्द्रता कमी करण्यासाठीच्या काही उपाययोजना त्यांनी सुचविल्या होत्या. त्यात गाभा-यातील व मंदिरातील गर्दी कमी करणे, पाणी, फुलं, फळांचा कमीत कमी वापर, हवा खेळती राहण्यासाठी खिडक्यांसह झरोखे खुले करणे, अशा उपायांचा समावेश होता. मात्र, रोज येणाºया भाविकांची संख्या हजारात, तर नवरात्रौत्सव व सणावाराच्या काळात लाखोंमध्ये असते. त्यामुळे या काळात कितीही उपाययोजना केल्या तरी आर्द्रता वाढतेच.

कोरोनामुळे गेले महिनाभर मंदिर बंद आहे. देवीचे रोजचे धार्मिक विधी पार पाडणारे श्रीपूजक, देवस्थान समितीचे मोजके कर्मचारी व सुरक्षा रक्षकवगळता मंदिरात शुकशुकाट आहे. त्यामुळे गाभाºयातील आर्द्रता ५५ टक्क्यांवर आली आहे. हीच आर्द्रता गर्दीच्या वेळी ८० टक्क्यांपर्यंत असते तर तापमान ३३ ते ३४ डिग्री सेल्सिअस इतकी असे, तीदेखील ०.८ टक्क्यांनी कमी झाली आहे. ही आर्द्रता कमी झाल्याने त्याचा सकारात्मक परिणाम देवीच्या मूर्तीवर होणार आहे.

आर्द्रता अशीगर्दीच्या वेळी सध्याच्या काळातगाभारा ७० ते ८० टक्के ५० ते ५५ टक्केपितळी उंबरा ८० ते ८५ टक्के ४० ते ४५ टक्केकासव चौक २८ ते ३२ टक्के २८ ते ३२ टक्के

 

भाविकांचा श्वासोच्छवास, पाणी, हार, फुलं, फळं या कारणांमुळे गाभाऱ्यातील आर्द्रता वाढते. त्यावर समितीकडून उपाययोजना सुरू आहेत. सध्या लॉकडाऊनमुळे मंदिर पूर्ण बंद असल्याने आर्द्रतेत कमालीची घट झाली आहे.- महेश जाधव, अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTempleमंदिर