शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मृताचा अंत्यविधी सन्मानपूर्वक करणारी कोल्हापुरातील ‘मानवसेवा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 00:39 IST

भरत बुटाले‘कोणत्याही मृताचा अंत्यविधी सन्मानपूर्वकच झाला पाहिजे,’ असं मुलखावेगळं ब्रीद घेऊन १९९९ मध्ये कोल्हापुरात मानवसेवा सेकंड इनिंग्ां होम्स ही नोंदणीकृत संस्था उदयाला आली. शहाजी माळी यांनी मित्र किशोर नैनवाणींसोबत या सेवेला प्रारंभ केला. संस्थेने १९ वर्षांत सुमारे ४,000 बेवारस मृतांना सन्मानपूर्वक अखेरचा निरोप दिला; तेही कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून...‘जिसका कोई ...

भरत बुटाले‘कोणत्याही मृताचा अंत्यविधी सन्मानपूर्वकच झाला पाहिजे,’ असं मुलखावेगळं ब्रीद घेऊन १९९९ मध्ये कोल्हापुरात मानवसेवा सेकंड इनिंग्ां होम्स ही नोंदणीकृत संस्था उदयाला आली. शहाजी माळी यांनी मित्र किशोर नैनवाणींसोबत या सेवेला प्रारंभ केला. संस्थेने १९ वर्षांत सुमारे ४,000 बेवारस मृतांना सन्मानपूर्वक अखेरचा निरोप दिला; तेही कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून...‘जिसका कोई नही होता, उसका खुदा होता है...’ असं म्हणावं असं काम करणारी ही आदर्श संस्था. नैसर्गिक मृतांव्यतिरिक्त गळफास घेतलेले, जळालेले, पाण्यात बुडालेले, रेल्वे रुळावर तुकडे होऊन पडलेले, सडलेले अशा कोणत्याही अवस्थेत असलेल्या बेवारस मृतदेहांवर सोपस्कार पार पाडण्यात संस्थेचे कार्यकर्ते आघाडीवर असतात.‘मानवसेवा’चे कार्य थक्क करणारे आहे. मार्च २०१७मधील ही घटना. येथील कात्यायनी मंदिरासमोर निर्जन स्थळी घरात वितळलेल्या अवस्थेत लटकलेला मृतदेह होता. पोलिसांकडून बोलावणे येताच किशोर नैनवाणी, अर्जुन कांबळे, अंजूम शेख यांच्यासह कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले. तो मृतदेह खाली उतरवून सीपीआरमध्ये नेला. तेथे कायदेशीर प्रक्रियेनंतर स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. हे झाले एक उदाहरण.मृताच्या घटना शक्यतो पोलिसांकडून समजतात. त्यावेळी संस्थेचे उपलब्ध कार्यकर्ते घटनास्थळी जातात. मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांच्या हवाली करतात, तेथून तो मृतदेह सीपीआरमध्ये नेला जातो. त्याची छायाचित्रे काढली जातात. तेथील पोलीस चौकीत हरविलेल्यांची यादी तपासली जाते. त्यात मिळतं-जुळतं कोण असेल, तर संबंधितांच्या नातेवाइकांना फोन केला जातो. त्यांच्याशी संपर्क झाला नाही किंंवा त्यांनी माहिती ऐकून फोन बंद केलाच तर तो मृतदेह बेवारस ठरवून शवविच्छेदन केले जाते. सर्व कायदेशीर प्रक्रियेनंतर मृतदेह संस्थेच्या ताब्यात दिला जातो. पंचगंगा स्मशानभूमीतील स्वतंत्र बेडवर त्यावर अंत्यसंस्कार केले जातात.अंत्यविधी सन्मानपूर्वक...मृतदेह सरणावर ठेवल्यानंतर कार्यकर्ते, पोलीस, कर्मचारी, आदी सर्व ओळीत उभारून मानवंदना देतात. गीतेतल्या ‘वासाशी जिरर्नानी....’ श्लोकामध्ये सांगितलेल्या ‘देह नश्वर आहे, पण आत्मा अमर आहे’ या वचनाचा उल्लेख करून अंत्यसंस्कार पार पाडले जातात.‘मानवसेवा’चे अन्य कार्यकर्तेमाजी सैनिक श्रीकांत चव्हाण, सचिन राऊत, प्रमोद चरणकर, कॉ. रघुनाथ कांबळे, योगेश अग्रवाल, गौरीशंकर संगोळी, पंडित मस्कर, सुप्रिया देशपांडे, आदी कार्यकर्ते ‘मानवसेवा’भावी कार्य करतात. या कार्यात रेल्वे स्थानकावरील संकटविमोचक मारुती मंदिर ट्रस्ट तसेच द्वारकादास शामकुमार कापड दुकान, यांचेही सहकार्य लाभते.हवा आर्थिक हातभार!आपत्कालीन परिस्थितीत २०० वर अंत्यविधीसाठीचे साहित्य तयार असते.ते मोफत दिले जाते. प्रत्येक मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी २५० रुपये खर्चहोतो. मृतदेह हाताळताना संसर्गजन्य आजारापासून संरक्षणासाठी मास्क, हँडग्लोज आदी साहित्य वापरावे लागते. मृतदेहासाठी कापड व इतर साहित्यही लागते. हा खर्च कार्यकर्तेच करतात. समाजाने पुढाकार घेऊन यासाठी आर्थिक पाठबळ देण्याची गरज कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.बेवारस मृतदेहाचे नातेवाईक सापडावेत व आपली व्यक्ती शेवटच्या क्षणी तरी मिळावी, या हेतूने ६६६.२ीूङ्मल्ल्िरल्लल्ल्रल्लॅँङ्मेी२.ूङ्मे नावाने संस्थेने वेबसाईट तयार केली आहे.