शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
3
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
4
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
5
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
6
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
7
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
8
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
9
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
10
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
11
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
12
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
13
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
14
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
15
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
16
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
17
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
18
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
19
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
20
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  

उन्हाळ्यात दररोज पाणी किती प्यावे?, जाणून घ्या; अतिपाणीही ठरु शकते शरीराला धोकादायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 13:01 IST

दिवसाला किती प्रमाणात पाणी प्यावे, हे तुमच्या वजनावर अवलंबून

संदीप आडनाईककोल्हापूर : आपले शरीर हे ६५ ते ७० टक्के पाण्याने भरलेले आहे. रोज रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत आपण झोपेच्या स्वाधीन असतो. तेव्हा या काळात पाणी शरीरात जात नाही; मात्र तुम्ही दिवसाला किती प्रमाणात पाणी प्यावे, हे तुमच्या वजनावर अवलंबून असते. उन्हाळा आहे, म्हणून जास्तीचे पाणी पिणेदेखील अपायकारक ठरू शकते.प्रथम तुमचे वजन मोजा. एकदा शरीराचं वजन (किलोग्रॅममध्ये) तपासलं गेल्यानंतर त्या संख्येला ०.६ ने भागा. येणारी संख्या ही रोज किती लीटर पाणी प्यायला हवं याची गणना आहे. समजा वजन ७० किलो असेल तर ते ०.६ ने भागाकार केल्यास ४२ ही संख्या मिळेल. म्हणजेच, या वजनाच्या व्यक्तीने रोज ४ लीटर २०० मिली पाणी प्यावे.

कमी पाणी प्यायल्याने काय होते?पाणी कमी पिण्यामुळे वाढत्या वयाच्या खुणा लवकर दिसू लागतात. सुरकुत्या लवकर येतात. त्वचेची चमक निघून जाते आणि ती सैल पडू लागते. शरीरात पाण्याची कमतरता असेल तर मेटाबॉलिजमची प्रक्रिया नीट होत नाही आणि शरीरात फॅट जमण्यास सुरुवात होते.जास्त पाणी प्यायल्याने काय होते?जास्त पाणी प्यायल्याने शरीरातील इलेक्ट्रोलाईट्सचे संतुलन बिघडू शकते. तसेच यामुळे रक्तातील सोडियमचे प्रमाण कमी होऊ शकते. यामुळे हायपोनेट्रेमिया ही स्थिती उद्भवू शकते. यामध्ये अस्वस्थ वाटणे, डोकेदुखी, चिडचिड होणे ही लक्षणं दिसून येतात.

पाणीदार फळेदेखील आवश्यकउन्हाळ्यात कलिंगड, द्राक्षे, लिंबू, मोसंबी, संत्री, टरबूज, शहाळी, जांभूळ, किवी यासारखी पाणीदार फळे खावीत. कलिंगडामध्ये ९० टक्के पाणी असते. शिवाय पोटातील टॉक्झिक युरिनवाटे बाहेर पडण्यास मदत होते, त्वचा तजेलदार राहते. टरबूजाचे सेवन केल्याने प्रतिकारशक्ती वाढते. रक्तदाब नियंत्रण आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी ते फायदेशीर ठरतं.द्राक्षांमध्येही पोटॅशिअम आणि अँटीऑक्सिडंट असतात. शरीर हायड्रेट राहते, तसेच रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, हृदयविकारांसारख्या समस्यांवर आराम मिळतो. मेंदूला योग्य रक्तपुरवठा करण्याचे कामही द्राक्षं करतात. शहाळ्यातील पोटॅशिअममुळे रक्तदाब नियंत्रित राहतो.

वयोगट दिवसाला किती लिटर?

  • ० ते ६ महिने : ४०० मिली
  • ७ महिने ते १ वर्ष : ६०० मिली
  • १ ते ३ वर्षे : ७३८ मिली
  • ३ ते ८ वर्षे : १ लीटर १२२ मिली
  • ८ ते १३ वर्षे : १ लीटर ९३२ मिली
  • १३ ते १८ वर्षे : ३ लीटर ७३२ मिली
  • १८ पेक्षा जास्त : ५ लीटर ४०० मिली

सामान्यत: ज्यांच्या हृदयाचे पंपिंग फंक्शन सामान्य म्हणजे ६० टक्के असते आणि लघवीही सामान्य असते, त्यांनी चार लीटर पाणी प्यायले पाहिजे. इतरांनी वैद्यकीय सल्ल्यानुसार वजनानुसार पाणी घ्यावे. जे खाल ते पचण्यासाठी आणि मिश्रण होण्यासाठी पाणी गरजेचे आहे. -डॉ. अक्षय बाफना, हृदयरोगतज्ज्ञ, सीपीआर, कोल्हापूर.पाणी किती महत्त्वाचे आहे ते आपल्या सर्वांना समजले असेलच. त्यामुळे दररोज भरपूर पाणी प्या व निरोगी आयुष्य जगा. -डॉ. उमेश कदम, वैद्यकीय अधीक्षक, कसबा बावडा, सेवा रुग्णालय.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर