शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

उन्हाळ्यात दररोज पाणी किती प्यावे?, जाणून घ्या; अतिपाणीही ठरु शकते शरीराला धोकादायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 13:01 IST

दिवसाला किती प्रमाणात पाणी प्यावे, हे तुमच्या वजनावर अवलंबून

संदीप आडनाईककोल्हापूर : आपले शरीर हे ६५ ते ७० टक्के पाण्याने भरलेले आहे. रोज रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत आपण झोपेच्या स्वाधीन असतो. तेव्हा या काळात पाणी शरीरात जात नाही; मात्र तुम्ही दिवसाला किती प्रमाणात पाणी प्यावे, हे तुमच्या वजनावर अवलंबून असते. उन्हाळा आहे, म्हणून जास्तीचे पाणी पिणेदेखील अपायकारक ठरू शकते.प्रथम तुमचे वजन मोजा. एकदा शरीराचं वजन (किलोग्रॅममध्ये) तपासलं गेल्यानंतर त्या संख्येला ०.६ ने भागा. येणारी संख्या ही रोज किती लीटर पाणी प्यायला हवं याची गणना आहे. समजा वजन ७० किलो असेल तर ते ०.६ ने भागाकार केल्यास ४२ ही संख्या मिळेल. म्हणजेच, या वजनाच्या व्यक्तीने रोज ४ लीटर २०० मिली पाणी प्यावे.

कमी पाणी प्यायल्याने काय होते?पाणी कमी पिण्यामुळे वाढत्या वयाच्या खुणा लवकर दिसू लागतात. सुरकुत्या लवकर येतात. त्वचेची चमक निघून जाते आणि ती सैल पडू लागते. शरीरात पाण्याची कमतरता असेल तर मेटाबॉलिजमची प्रक्रिया नीट होत नाही आणि शरीरात फॅट जमण्यास सुरुवात होते.जास्त पाणी प्यायल्याने काय होते?जास्त पाणी प्यायल्याने शरीरातील इलेक्ट्रोलाईट्सचे संतुलन बिघडू शकते. तसेच यामुळे रक्तातील सोडियमचे प्रमाण कमी होऊ शकते. यामुळे हायपोनेट्रेमिया ही स्थिती उद्भवू शकते. यामध्ये अस्वस्थ वाटणे, डोकेदुखी, चिडचिड होणे ही लक्षणं दिसून येतात.

पाणीदार फळेदेखील आवश्यकउन्हाळ्यात कलिंगड, द्राक्षे, लिंबू, मोसंबी, संत्री, टरबूज, शहाळी, जांभूळ, किवी यासारखी पाणीदार फळे खावीत. कलिंगडामध्ये ९० टक्के पाणी असते. शिवाय पोटातील टॉक्झिक युरिनवाटे बाहेर पडण्यास मदत होते, त्वचा तजेलदार राहते. टरबूजाचे सेवन केल्याने प्रतिकारशक्ती वाढते. रक्तदाब नियंत्रण आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी ते फायदेशीर ठरतं.द्राक्षांमध्येही पोटॅशिअम आणि अँटीऑक्सिडंट असतात. शरीर हायड्रेट राहते, तसेच रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, हृदयविकारांसारख्या समस्यांवर आराम मिळतो. मेंदूला योग्य रक्तपुरवठा करण्याचे कामही द्राक्षं करतात. शहाळ्यातील पोटॅशिअममुळे रक्तदाब नियंत्रित राहतो.

वयोगट दिवसाला किती लिटर?

  • ० ते ६ महिने : ४०० मिली
  • ७ महिने ते १ वर्ष : ६०० मिली
  • १ ते ३ वर्षे : ७३८ मिली
  • ३ ते ८ वर्षे : १ लीटर १२२ मिली
  • ८ ते १३ वर्षे : १ लीटर ९३२ मिली
  • १३ ते १८ वर्षे : ३ लीटर ७३२ मिली
  • १८ पेक्षा जास्त : ५ लीटर ४०० मिली

सामान्यत: ज्यांच्या हृदयाचे पंपिंग फंक्शन सामान्य म्हणजे ६० टक्के असते आणि लघवीही सामान्य असते, त्यांनी चार लीटर पाणी प्यायले पाहिजे. इतरांनी वैद्यकीय सल्ल्यानुसार वजनानुसार पाणी घ्यावे. जे खाल ते पचण्यासाठी आणि मिश्रण होण्यासाठी पाणी गरजेचे आहे. -डॉ. अक्षय बाफना, हृदयरोगतज्ज्ञ, सीपीआर, कोल्हापूर.पाणी किती महत्त्वाचे आहे ते आपल्या सर्वांना समजले असेलच. त्यामुळे दररोज भरपूर पाणी प्या व निरोगी आयुष्य जगा. -डॉ. उमेश कदम, वैद्यकीय अधीक्षक, कसबा बावडा, सेवा रुग्णालय.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर