शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

लोकसभेवेळी शक्तीपीठला विरोध करणाऱ्यांचे आता समर्थन कसे ?, खासदार शाहू छत्रपती यांची विचारणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 12:04 IST

विकासात राजकारण नको, शेतकरी हिताचाही विचार व्हावा

कोल्हापूर : शक्तीपीठ महामार्गाला लोकसभा निवडणुकीत विरोध करणारे आता अचानकपणे समर्थन करीत आहेत. इतका बदल कसा झाला ? शक्तीपीठचे फायदे काय, याचा विचार करून निर्णय घेतला पाहिजे, असे मत खासदार शाहू छत्रपती यांनी रविवारी मांडले. विकासात राजकारण नको, अशी भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली.कोल्हापूर फर्स्ट फोरमच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, विकास करताना शेतकरी हित, त्यांच्या मागणीचाही विचार झाला पाहिजे. येथे खंडपीठ व्हावे, विभागीय आयुक्तालय व्हावे, अशी मागणी आहे. पण, कोल्हापुरातील पोलिस आयुक्तालय येथून हलवण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्याला आमचा विरोध आहे. हद्दवाढ सर्वांना विश्वासात घेऊन झाली पाहिजे, यासाठी आजी, माजी आमदार, सरपंच यांची व्यापक बैठक बोलवावी.शाहू मिलच्या जागेचा विकास करण्यासाठी त्यावरील कर्ज शासनाने माफ केले पाहिजे. यासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी पुढाकार घ्यावा. पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर आहे. जोपर्यंत या नदीतील पाणी पिण्याच्या योग्यतेचे होईल, त्याच वेळी प्रदूषण मुक्त नदी होईल, असे म्हणता येईल. म्हणून, नदी प्रदूषणासाठी भरीव निधीची गरज आहे.

विमानतळ चांगले, पण दिवसात तीनच विमान..नुकतेच ग्वाल्हेरला जाऊन आलो. तेथील विमानतळाचा विकास अतिशय चांगला झाला आहे, पण दिवसभरात केवळ तीनच विमाने उड्डाण करतात, असा खिस्सा खासदार छत्रपती यांनी स्पष्ट केला. कोल्हापूरच्या विमान तिकिटाचे दर कमी झाले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

एमएच झिरो नाइन विरुद्ध एकावन्नकोल्हापूर फर्स्ट फोरममध्ये शेतकरी प्रतिनिधी का नाही, अशी विचारणा खासदार छत्रपती यांनी विचारणा केली. यावर आमदार राहुल आवाडे यांनी वस्त्रोद्योगचेही कोणी नाही. एमएच झेरो नाइन (कोल्हापूर) विरुद्ध एमएच एकावन्न (इचलकरंजी) असे झाले आहे, असा उपरोधिक टोला आवाडे यांनी लगावला. खासदार छत्रपती यांनी असे काही नाही, माझी शेवटची गाडी एमएच एकावन्न आहे, असे स्पष्ट केले.

१४ संघटना एकत्र आणि ११ प्रमुख विषयांची मांडणीकोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी १४ नामांकित संघटना एकत्र येऊन कोल्हापूर फर्स्ट फोरम सुरू केली आहे. या फोरमच्या माध्यमातून हद्दवाढ, मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच, शंभर एकर क्षेत्रावर आधुनिक आयटी पार्क विकसित करणे असे ११ विकासाचे विषय हाती घेऊन लोकप्रतिनिधींतर्फे पाठपुरावा करण्यात येणार आहे.

दाजीपूर प्राधिकरणसिमेंटच्या जंगलातून खऱ्या जंगलाकडे लोक मोठ्या संख्येने वळत आहेत. म्हणून विधानसभा निवडणुकीत दाजीपूर विकास प्राधिकरण हाती घेतले होते; पण त्याला राजकीय विरोध होईल म्हणून पुढे काही केले नाही. पण आता दाजीपूर परिसराचा विकास करण्यासाठी प्राधिकरण करणार असल्याची घोषणा पालकमंत्री आबिटकर यांनी केली.

आधी कोठे होतो, आता कोठे?मी आधी कोठे होतो. कोठे गेलो आणि आता कोठे आहे याकडे पाहिले तर गेल्या काही वर्षांत राजकीय उलथापालथी झाल्या. सत्ता अस्थिर होते; पण आता देश, राज्यात सत्ता स्थीर सरकार आहे. त्यामुळे विकास कामांना गती येईल, असे आश्वासन आबिटकर यांनी दिले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhighwayमहामार्गShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपतीShaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्ग