शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'या भीषण संकटसमयी निवडणुकांचा विचारच कुणाच्या डोक्यात कसा येऊ शकतो'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 14:09 IST

राज ठाकरेंच्या मागणीवरील प्रश्नाला उत्तर देताना उद्धव यांनी राज ठाकरेंना चांगलाच टोला लगावला.

ठळक मुद्देराज ठाकरेंच्या मागणीवरील प्रश्नाला उत्तर देताना उद्धव यांनी राज ठाकरेंना चांगलाच टोला लगावला. मुसळधार पावसामुळे राज्यातील 10 जिल्हे आणि 64 तालुक्यात पूरस्थिती असून तिथे शिवसेना मदतकार्यासाठी पोहोचत आहे.

मुंबई - कोल्हापूर आणि सांगलीतील नागरिकांसाठी आणि जनावरांसाठी डॉक्टरांची टीम पाठविण्यात येत आहे. तसेच, औषधांचा साठाही उपलब्ध करुन दिला जाणार आहे. या नैसर्गित आपत्तीमध्ये राजकारण न आणता, खंबीर मनाने सर्वांनीची या पूरस्थितीचा सामना केला पाहिजे. आपण आपल्या माता-भगिनींच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. 

राज ठाकरेंच्या मागणीवरील प्रश्नाला उत्तर देताना उद्धव यांनी राज ठाकरेंना चांगलाच टोला लगावला. हे संकट एवढं भीषण आहे की, निवडणुकांचा विषयच कुणाच्या डोक्यात कसा येऊ शकतो हेच मला कळत नाही, अशा शब्दात उत्तर दिले. राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करणार असल्याचं जाहीर केलं होतं. तसेच, आयोगाला याबाबत पत्रही लिहिणार असल्याचं राज यांनी शनिवारी पत्रकारांना सांगितलं होतं. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, नाव न घेता उद्धव यांनी राज ठाकरेंना टोला लगावला. 

राष्ट्रीय आपत्तीच्या शब्दात अडकण्याची मला आवश्यकता वाटत नाही. सध्या तिथं तात्काळ मदत मिळाली पाहिजे, हेच मला वाटतंय. तेथील लोकांच्या मदतीसाठी काय गरजेचं आहे, हे ओळखून आपण काम केलं पाहिजे, बाकी मला कशात अडकायचं नाही, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले. आलमट्टी धरणातील पाण्याबद्दल बोलताना, सत्य असेल ते उघड होईल, कर्नाटक सरकार काही पाप करत असेल तर तेही उघड होईल, असे ठाकरे म्हणाले. दरम्यान, तुम्ही पाहणीसाठी का गेला नाहीत? या प्रश्नावरही उद्धव यांनी भाष्य केलं. तिथ जाऊन कोरडी सहानुभूती दाखविण्याच काम मी करणार नाही. इथ राहून जे शक्य ते आणि शिवेसना काय करायचंय ते मदतकार्य करत आहे, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. 

मुसळधार पावसामुळे राज्यातील 10 जिल्हे आणि 64 तालुक्यात पूरस्थिती असून तिथे शिवसेना मदतकार्यासाठी पोहोचत आहे. शिवसेनेला राज्यभरातून मदत येत आहे. त्यामध्ये, कपडे, अन्नधान्य, पिण्याचं पाणी, जीवनावश्यक वस्तू आणि किराणा पॅकींग यांचा समावेश आहे. या सर्व वस्तू कोल्हापूर आणि सांगलीतील नागरिकांसाठी पोहोचविण्यात येणार आहेत. शिवसेनेचे मंत्री, आमदार, खासदार आणि सर्वच पदाधिकारी याकामी उतरले आहेत, असे शिवसेना नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.   

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेनाkolhapurकोल्हापूर