शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

जगण्याची उमेद - भाग २

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 4:27 AM

प्रवासी वाहतूक व्यवस्था, हाॅटेल व्यवसाय, करमणुकीशी संबंधित सगळे व्यवसाय आजही अंधारात चाचपडत आहेत. पर्यायी व्यवस्था उभी राहिली. वैयक्तिक वाहनखरेदी ...

प्रवासी वाहतूक व्यवस्था, हाॅटेल व्यवसाय, करमणुकीशी संबंधित सगळे व्यवसाय आजही अंधारात चाचपडत आहेत. पर्यायी व्यवस्था उभी राहिली. वैयक्तिक वाहनखरेदी वाढली. पार्सल सुविधा उपलब्ध झाली. ओटीटीद्वारे करमणूक होत आहे. यातून एक गोष्ट लक्षात येते की प्रत्येक गोष्टीला पर्याय आहे. जीवनगाडा सुरूच राहणार मग यात आपण कुठे आहोत हे सिद्ध केले पाहिजे. बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेत नावीन्याच्या शोध घेतला पाहिजे. पूर्णपणे नोकरी व्यवसाय करणाऱ्या मंडळींना एक गोष्ट लक्षात आली की रोजच्या जीवनात अन्नाला पर्याय नाही. आपल्याकडे थोडीफार जरी शेती असेल तर किमान पोटाला लागणारे धान्य पिकवून जगता येईल. वाढत्या लोकसंख्येची गरज भागविण्यासाठी उपलब्ध शेतात जस्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी औषध आणि खतांचा मारा करून हायब्रिड पीक घेण्यापेक्षा जास्त शेती ओलिताखाली आणून सकस सेंद्रिय शेतीवर भर दिला पाहिजे. शहराकडे येणारा लोंढा कमी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव दिला तरच लोकांना शेती करायला परवडेल आणि बेरोजगार तरुण तुटपुंज्या पगारासाठी घरदार सोडून शहरात उदरनिर्वाहासाठी येण्यापेक्षा शेतात काबाडकष्ट करून शहरवासीयांना पोटभर खायला मिळेल. शेतमालाच्या वितरणात ठराविक व्यापारी मंडळींच्या मनमानी कारभारामुळे शेतकरीवर्ग अडचणीत येताना दिसला. मालाचा उठाव न करता भाव पाडून घेण्यासाठी कोंडी करण्याचा प्रयत्न केला जातो. यावर पर्याय म्हणून शेतकऱ्यांच्या सुशिक्षित मुलांनी स्वतःची वितरण व्यवस्था सुरू केली तर हाताला काम आणि शेतमालाला योग्य भाव दिला जाऊ शकतो.

व्यवसाय बंद होते. व्यवहार बंद केले. जीवनावश्यक सोडून सगळी कार्य थांबवली. एरवी अविश्रांत धडपडणाऱ्या लोकांनी स्वतःला परिवारासोबत चार भिंतींच्या आत कोंडून घेतले. आज कामावर गेला नाही तर संध्याकाळी चूल पटणार नाही अशा हातावर पोट असणाऱ्या लोकांनीसुद्धा घरात शांत बसून धैर्य दाखवले. अशा अस्थिर वातावरणातसुद्धा लोकांनी मनोनिग्रह दाखवून निराशेच्या गर्तेत न जाता उष:काल होण्याची वाट बघितली. राज्यकर्ते, प्रशासकीय यंत्रणा, वैद्यकीय व्यवस्था, शास्त्रज्ञ सामाजिक सेवाभावी संस्था आपापल्या परीने मार्ग शोधू लागले. सरकारचे आणि जनतेचे उत्पन्न थांबले तरी खर्च वाढले. पण रहाटगाडगे थांबले नाही. टाळ्या वाजवल्या, थाळ्या वाजवल्या, दिवे लावले त्याचवेळी मास्क, पीपीई किट आणि सॅनिटायझर तयार केले, वापरले. शाळा बंद होत्या तरी शिक्षण चालू आहे. मंदिर मशीद गुरुद्वारा चर्च बंद आहेत तरी भक्ती उपासना चालू आहे. देव पावतोय. दैवी कृपा होतच आहेत.